शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी बदलांबाबत ठेवा श्रद्धा-सबुरी केसरकर : चेंबरच्या परिषदेत सावध भूमिका, स्वस्ताई अवतरणार असल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:51 IST

नाशिक : देशाने स्वीकारलेल्या जीएसटी प्रणालीमुळे दुहेरी करपद्धती संपुष्टात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गॅस्केटिंग इफेक्ट संपल्याने अनेक वस्तूंचे दर ३५ ते ५५ टक्क्यांनी कमी होतील. त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत न पोहोचवणाºयांविरुद्ध नफेखोरीविरोधी कारवाई करण्यात येईल, असे संकेत राज्याचे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. मात्र, जकात रद्दच्या एका निर्णयामुळे ...

नाशिक : देशाने स्वीकारलेल्या जीएसटी प्रणालीमुळे दुहेरी करपद्धती संपुष्टात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गॅस्केटिंग इफेक्ट संपल्याने अनेक वस्तूंचे दर ३५ ते ५५ टक्क्यांनी कमी होतील. त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत न पोहोचवणाºयांविरुद्ध नफेखोरीविरोधी कारवाई करण्यात येईल, असे संकेत राज्याचे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. मात्र, जकात रद्दच्या एका निर्णयामुळे राज्याचे साडेसात हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याने आता कोणताही आर्थिक निर्णय घाईने होणार नाही, असे स्पष्ट करतानाच व्यापारी आणि उद्योजकांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी, धीरापोटी फळे रसाळ गोमटीच मिळतील, असे आशादायी चित्रदेखील निर्माण केले.जीएसटीच्या अडचणींंसंदर्भात महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्या वतीने नाशिक येथे राज्यस्तरीय व्यापारी परिषद संपन्न झाली. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केसरकर बोलत होते. कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, जीएसटी आयुक्त राजीव जलोटा, नाशिकमधील सहआयुक्त चित्रा कुलकर्णी तसेच महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्यासह अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.जीएसटीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने केंद्र सरकारने तयार केलेल्या कॉन्सीलमध्ये महाराष्टÑाचा वाटा आणि प्रभाव मोठा असल्याने काजूवरील १२ टक्क्यांऐवजी पाच टक्के इतका कमी करण्यात आला. तसेच कंपोझिंग स्कीमचा लाभ हा पन्नास लाख रुपयांपर्यंतची उलाढाल असणाºयांना दिला जाणार होता. महाराष्टÑाच्या आग्रहामुळे ही मर्यादा वाढवून ७५ लाख इतकी करण्यात आली. जीएसटीतील बदल ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असे सांगून दीपक केसरकर यांनी काही बदल प्रस्तावित असल्याचे नमूद केले. जीएसटीची अंमलबजावणी करताना राज्य सरकारच्या उत्पन्नात घट येऊ नये याची चिंता होती, त्यामुळे सावध बदल केले गेले, परंतु आता राज्याला कर वसुलीच्या उद्दिष्टापैकी पन्नास टक्के कर संकलन झाल्याचे ते म्हणाले. जीएसटीमुळे कराच्या जाळ्यात अडकण्यासारखी वगैरे धास्ती बाळगू नये, असे सांगतानाच अनेक शंकांचे निरसन त्यांनी केले.दिवसभराच्या सत्रात व्यापाºयांनी विविध अडचणी मांडल्या. संतोष मंडलेचा यांनी प्रास्ताविक केले तर माजी अध्यक्ष खुशालभाई पोद्दार यांनी प्रास्ताविक केले.