शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

जीएसटी बदलांबाबत ठेवा श्रद्धा-सबुरी केसरकर : चेंबरच्या परिषदेत सावध भूमिका, स्वस्ताई अवतरणार असल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 19:51 IST

नाशिक : देशाने स्वीकारलेल्या जीएसटी प्रणालीमुळे दुहेरी करपद्धती संपुष्टात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गॅस्केटिंग इफेक्ट संपल्याने अनेक वस्तूंचे दर ३५ ते ५५ टक्क्यांनी कमी होतील. त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत न पोहोचवणाºयांविरुद्ध नफेखोरीविरोधी कारवाई करण्यात येईल, असे संकेत राज्याचे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. मात्र, जकात रद्दच्या एका निर्णयामुळे ...

नाशिक : देशाने स्वीकारलेल्या जीएसटी प्रणालीमुळे दुहेरी करपद्धती संपुष्टात येणार आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत गॅस्केटिंग इफेक्ट संपल्याने अनेक वस्तूंचे दर ३५ ते ५५ टक्क्यांनी कमी होतील. त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत न पोहोचवणाºयांविरुद्ध नफेखोरीविरोधी कारवाई करण्यात येईल, असे संकेत राज्याचे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. मात्र, जकात रद्दच्या एका निर्णयामुळे राज्याचे साडेसात हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याने आता कोणताही आर्थिक निर्णय घाईने होणार नाही, असे स्पष्ट करतानाच व्यापारी आणि उद्योजकांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी, धीरापोटी फळे रसाळ गोमटीच मिळतील, असे आशादायी चित्रदेखील निर्माण केले.जीएसटीच्या अडचणींंसंदर्भात महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीजच्या वतीने नाशिक येथे राज्यस्तरीय व्यापारी परिषद संपन्न झाली. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी केसरकर बोलत होते. कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, जीएसटी आयुक्त राजीव जलोटा, नाशिकमधील सहआयुक्त चित्रा कुलकर्णी तसेच महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्यासह अन्य पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.जीएसटीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने केंद्र सरकारने तयार केलेल्या कॉन्सीलमध्ये महाराष्टÑाचा वाटा आणि प्रभाव मोठा असल्याने काजूवरील १२ टक्क्यांऐवजी पाच टक्के इतका कमी करण्यात आला. तसेच कंपोझिंग स्कीमचा लाभ हा पन्नास लाख रुपयांपर्यंतची उलाढाल असणाºयांना दिला जाणार होता. महाराष्टÑाच्या आग्रहामुळे ही मर्यादा वाढवून ७५ लाख इतकी करण्यात आली. जीएसटीतील बदल ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असे सांगून दीपक केसरकर यांनी काही बदल प्रस्तावित असल्याचे नमूद केले. जीएसटीची अंमलबजावणी करताना राज्य सरकारच्या उत्पन्नात घट येऊ नये याची चिंता होती, त्यामुळे सावध बदल केले गेले, परंतु आता राज्याला कर वसुलीच्या उद्दिष्टापैकी पन्नास टक्के कर संकलन झाल्याचे ते म्हणाले. जीएसटीमुळे कराच्या जाळ्यात अडकण्यासारखी वगैरे धास्ती बाळगू नये, असे सांगतानाच अनेक शंकांचे निरसन त्यांनी केले.दिवसभराच्या सत्रात व्यापाºयांनी विविध अडचणी मांडल्या. संतोष मंडलेचा यांनी प्रास्ताविक केले तर माजी अध्यक्ष खुशालभाई पोद्दार यांनी प्रास्ताविक केले.