शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
4
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
5
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
6
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
7
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
8
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
9
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
10
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
11
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
12
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
13
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
14
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
15
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
16
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
17
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
18
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
19
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
20
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

राज्यकर्त्यांचा पोरखेळ सुरू शरद पवार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 02:04 IST

विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेला जनतेने कौल दिलेला असताना पदे वाटण्यावरून दोन्ही पक्षात जे काही चालू आहे तो निव्वळ पोरखेळ असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेला जनतेने कौल दिलेला असताना पदे वाटण्यावरून दोन्ही पक्षात जे काही चालू आहे तो निव्वळ पोरखेळ असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली. शेतकरी संकटात असताना सत्तेतील लोकांनी असं वागणं बरं नव्हे असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.पवार यांनी, विधानसभा निवडणुकीत जनतेने दोन्ही पक्षांना सरकार बनविण्याची संधी दिली व सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्हाला विधिमंडळात पाठविले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सरकार स्थापन करावे, राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला असताना त्यांनी सरकार बनविण्याची जबाबदारी पार पाडण्याऐवजी दोन्ही बाजूंनी गेल्या आठ दिवसांपासून निव्वळ पोरखेळ सुरू आहे असे सांगणाºया पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपल्याला येऊन भेटून गेल्याचे सांगितले; मात्र त्या भेटीबाबत अधिक बोलण्याचे टाळले. राज्यात भाजपची भरभराट झाल्याचे आपल्याला तरी या निवडणुकीत दिसले नाही, असे सांगून पवार यांनी ‘अबकी बार २२० पार’ अशी वल्गना त्यांनी केली होती; परंतु मतदारांनी त्यांना तशी संधी दिली नसल्याचे सांगितले.राज्यातील शेतकरी संकटात असून, अशा वेळी त्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे पण सरकार याकामी अपयशी ठरले आहे असे सांगून, संपूर्ण पीक नष्ट झाले, डोक्यावर बँकांचे कर्ज आहे, पुढचे पीक घेणे अवघड आहे अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, त्यांना एकरी नुकसानीच्या प्रमाणात भरपाई द्यावी, शेतकºयांना पुढील पिकासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे तसेच त्यांची सर्व प्रकारची वसुली स्थगित करून त्यांना पुढील पाच ते सात वर्षाचे हप्ते बांधून द्यावेत, यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.नाशिक जिल्ह्णातील तरुण पिढीने साथ दिलीविधानसभा निवडणुकीच्या आपल्या दौºयाला नाशिकपासून सुरुवात झाली व त्यानंतर आपण राज्यभर फिरलो. या दरम्यान, मी सुरू केलेल्या निवडणूक कॅम्पेनिंगला नाशिक जिल्ह्णातील तरुण पिढीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व त्यांनी संपूर्ण महाराष्टत जो संदेश द्यायचा तो दिला. त्यानंतर राज्यात तरुण पिढी आपल्या पाठीशी उभी राहिल्याचे गौरवोद्गारही पवार यांनी काढले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार