शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

राज्यकर्त्यांचा पोरखेळ सुरू शरद पवार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 02:04 IST

विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेला जनतेने कौल दिलेला असताना पदे वाटण्यावरून दोन्ही पक्षात जे काही चालू आहे तो निव्वळ पोरखेळ असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेला जनतेने कौल दिलेला असताना पदे वाटण्यावरून दोन्ही पक्षात जे काही चालू आहे तो निव्वळ पोरखेळ असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली. शेतकरी संकटात असताना सत्तेतील लोकांनी असं वागणं बरं नव्हे असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.पवार यांनी, विधानसभा निवडणुकीत जनतेने दोन्ही पक्षांना सरकार बनविण्याची संधी दिली व सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्हाला विधिमंडळात पाठविले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सरकार स्थापन करावे, राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला असताना त्यांनी सरकार बनविण्याची जबाबदारी पार पाडण्याऐवजी दोन्ही बाजूंनी गेल्या आठ दिवसांपासून निव्वळ पोरखेळ सुरू आहे असे सांगणाºया पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपल्याला येऊन भेटून गेल्याचे सांगितले; मात्र त्या भेटीबाबत अधिक बोलण्याचे टाळले. राज्यात भाजपची भरभराट झाल्याचे आपल्याला तरी या निवडणुकीत दिसले नाही, असे सांगून पवार यांनी ‘अबकी बार २२० पार’ अशी वल्गना त्यांनी केली होती; परंतु मतदारांनी त्यांना तशी संधी दिली नसल्याचे सांगितले.राज्यातील शेतकरी संकटात असून, अशा वेळी त्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे पण सरकार याकामी अपयशी ठरले आहे असे सांगून, संपूर्ण पीक नष्ट झाले, डोक्यावर बँकांचे कर्ज आहे, पुढचे पीक घेणे अवघड आहे अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, त्यांना एकरी नुकसानीच्या प्रमाणात भरपाई द्यावी, शेतकºयांना पुढील पिकासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे तसेच त्यांची सर्व प्रकारची वसुली स्थगित करून त्यांना पुढील पाच ते सात वर्षाचे हप्ते बांधून द्यावेत, यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.नाशिक जिल्ह्णातील तरुण पिढीने साथ दिलीविधानसभा निवडणुकीच्या आपल्या दौºयाला नाशिकपासून सुरुवात झाली व त्यानंतर आपण राज्यभर फिरलो. या दरम्यान, मी सुरू केलेल्या निवडणूक कॅम्पेनिंगला नाशिक जिल्ह्णातील तरुण पिढीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व त्यांनी संपूर्ण महाराष्टत जो संदेश द्यायचा तो दिला. त्यानंतर राज्यात तरुण पिढी आपल्या पाठीशी उभी राहिल्याचे गौरवोद्गारही पवार यांनी काढले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार