शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

राज्यकर्त्यांचा पोरखेळ सुरू शरद पवार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 02:04 IST

विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेला जनतेने कौल दिलेला असताना पदे वाटण्यावरून दोन्ही पक्षात जे काही चालू आहे तो निव्वळ पोरखेळ असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेला जनतेने कौल दिलेला असताना पदे वाटण्यावरून दोन्ही पक्षात जे काही चालू आहे तो निव्वळ पोरखेळ असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली. शेतकरी संकटात असताना सत्तेतील लोकांनी असं वागणं बरं नव्हे असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.पवार यांनी, विधानसभा निवडणुकीत जनतेने दोन्ही पक्षांना सरकार बनविण्याची संधी दिली व सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्हाला विधिमंडळात पाठविले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सरकार स्थापन करावे, राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला असताना त्यांनी सरकार बनविण्याची जबाबदारी पार पाडण्याऐवजी दोन्ही बाजूंनी गेल्या आठ दिवसांपासून निव्वळ पोरखेळ सुरू आहे असे सांगणाºया पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपल्याला येऊन भेटून गेल्याचे सांगितले; मात्र त्या भेटीबाबत अधिक बोलण्याचे टाळले. राज्यात भाजपची भरभराट झाल्याचे आपल्याला तरी या निवडणुकीत दिसले नाही, असे सांगून पवार यांनी ‘अबकी बार २२० पार’ अशी वल्गना त्यांनी केली होती; परंतु मतदारांनी त्यांना तशी संधी दिली नसल्याचे सांगितले.राज्यातील शेतकरी संकटात असून, अशा वेळी त्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे पण सरकार याकामी अपयशी ठरले आहे असे सांगून, संपूर्ण पीक नष्ट झाले, डोक्यावर बँकांचे कर्ज आहे, पुढचे पीक घेणे अवघड आहे अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, त्यांना एकरी नुकसानीच्या प्रमाणात भरपाई द्यावी, शेतकºयांना पुढील पिकासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे तसेच त्यांची सर्व प्रकारची वसुली स्थगित करून त्यांना पुढील पाच ते सात वर्षाचे हप्ते बांधून द्यावेत, यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.नाशिक जिल्ह्णातील तरुण पिढीने साथ दिलीविधानसभा निवडणुकीच्या आपल्या दौºयाला नाशिकपासून सुरुवात झाली व त्यानंतर आपण राज्यभर फिरलो. या दरम्यान, मी सुरू केलेल्या निवडणूक कॅम्पेनिंगला नाशिक जिल्ह्णातील तरुण पिढीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व त्यांनी संपूर्ण महाराष्टत जो संदेश द्यायचा तो दिला. त्यानंतर राज्यात तरुण पिढी आपल्या पाठीशी उभी राहिल्याचे गौरवोद्गारही पवार यांनी काढले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार