शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पीकविमा न काढलेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळवून देणार-शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:53 IST

घोटी : परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोटी येथे सांगितले. टाके घोटी येथील शेतक-यांच्या शेतात जाऊन पवार यांनी पाहणी करीत शासकीय अधिकाºयांकडून अधिक माहिती घेतली. पीकविमा आणि नुकसानभरपाई हे स्वतंत्र विषय असून पीकविमा न काढलेल्या शेतकºयांंवरही कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

घोटी : परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोटी येथे सांगितले. टाके घोटी येथील शेतक-यांच्या शेतात जाऊन पवार यांनी पाहणी करीत शासकीय अधिकाºयांकडून अधिक माहिती घेतली. पीकविमा आणि नुकसानभरपाई हे स्वतंत्र विषय असून पीकविमा न काढलेल्या शेतक-यांंवरही कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.  इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकरी हैराण झाले आहेत. पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भातासह इतर पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. खरिपाचे पीक या सततच्या पावसाने भिजून गेले आहे. कापणी करण्यात आलेले पीक अक्षरश: खराब झाले आहे. खरीप हंगामातील सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्यातील शेतकरी वैफल्यग्रस्त झाले असल्याने ह्या शेतकर्यांना न्याय द्यावा, तातडीने नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांचे निवेदन पवार यांना यावेळी देण्यात आले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माणिकराव कोकाटे,सरोज अिहरे, माजी खासदार देविदास पिंगळे आदींच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि पदाधिकाºयांनी निवेदन देऊन लक्ष घालण्याची मागणी केली. माजी उपसभापती पांडुरंग वारु ंगसे यांनी पवार यांना इगतपुरी तालुक्यातील पाऊस ह्यावर्षी प्रचंड प्रमाणात सरासरी ओलांडून झाला असल्याचे सांगून सर्व शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी केली.------------------------------गुळवे यांना आदरांजलीमुंबईहून शरद पवार इगतपुरी जवळील टोल नाका भागात शेतकर्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी अल्पवेळ थांबणार होते. मात्र शेतकर्यांच्या प्रश्नांवर न्याय देण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष शेतात घुसून पाहणी केली. आमदार हिरामण खोसकर यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्ह्याचे दिवंगत काँग्रेस नेते गोपाळराव गुळवे यांचा आज स्मृतिदिन असल्याचे समजताच पवार यांनी बाजार समिती आवारातील गुळवे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आदरांजली वाहिली. यावेळी प्रदेश सरचिटणीस संदीप गुळवे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, गोरख बोडके, जनार्दन माळी, ज्ञानेश्वर लहाने, माजी उपसभापती पांडुरंग वारु ंगसे, कचरू पाटील शिंदे, तहसीलदार अर्चना भाकड, तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर आदींसह शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.--------------------------------वरिष्ठ स्तरावरून शासनाने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने सर्वेक्षण करावे. नियमात अत्यल्प भरपाई देण्याची तरतूद काढून परिस्थितीशी सामना करणाºया शेतकºयांना तात्काळ भरपाई देण्यासाठी शासनाला भाग पाडू. आम्ही शेतकºयांच्या सोबत आहोत.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Nashikनाशिक