शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

अवकाळी पावसाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार, सदाभाऊ खोत आज नाशिकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 11:03 IST

गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावासामुळे जिल्ह्यात सुमारे ५० टक्के खरीप पिकाचे नुकसान झाले आहे.

नाशिक- गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावासामुळे जिल्ह्यात सुमारे ५० टक्के खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूही थांबेनासे झाले आहेत. या पावसाचा साडेलाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत नाशिक मध्ये असून दुपारी ते विविध भागात पाहणी करणार आहेत.

 नुकसानीमुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कालच सटाणा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. आज सायंकाळपर्यंत नुकसानीबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध होणार आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला असून एकुर दीडशे टक्के अधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबर अखेरनंतर ऑक्टोबर संपतानाचा सुद्धा पाऊस सुरूच असून त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सोयाबीन, मका, द्राक्ष आणि कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र ७ लाख ४० हजार  हेक्टर इतके असून त्यापैकी ३लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. म्हणजेच सरासरी ५० टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. विशेषत: मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या पीकाचे क्षेत्र २.२५ लाख हेक्टर असून त्याच्या ६० टक्के  क्षेत्राचे नुकसान झाले आहे. दर  द्राक्षाचे एकूण क्षेत्र ६० हजार हेक्टर इतके असून  ७० टक्के पिकाचे नुकसान झालेआहे. बाजारीचे क्षेत्र १ लाख १० लाख हजार हेक्टर असून ६० टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे क्षेत्र ७३ हजार हेक्टर असूनत्यात८० टक्के नुकसान झाल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. लेटखरीप कांद्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान मालेगाव, सिन्नर, निफाड, त्र्यंबक, सटाणा आणि देवळा तालुक्यात झाले आहेत.