शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

अवकाळी पावसाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार, सदाभाऊ खोत आज नाशिकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 11:03 IST

गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावासामुळे जिल्ह्यात सुमारे ५० टक्के खरीप पिकाचे नुकसान झाले आहे.

नाशिक- गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावासामुळे जिल्ह्यात सुमारे ५० टक्के खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. पाऊस थांबत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूही थांबेनासे झाले आहेत. या पावसाचा साडेलाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत नाशिक मध्ये असून दुपारी ते विविध भागात पाहणी करणार आहेत.

 नुकसानीमुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कालच सटाणा येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. आज सायंकाळपर्यंत नुकसानीबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध होणार आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला असून एकुर दीडशे टक्के अधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबर अखेरनंतर ऑक्टोबर संपतानाचा सुद्धा पाऊस सुरूच असून त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सोयाबीन, मका, द्राक्ष आणि कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र ७ लाख ४० हजार  हेक्टर इतके असून त्यापैकी ३लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. म्हणजेच सरासरी ५० टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. विशेषत: मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या पीकाचे क्षेत्र २.२५ लाख हेक्टर असून त्याच्या ६० टक्के  क्षेत्राचे नुकसान झाले आहे. दर  द्राक्षाचे एकूण क्षेत्र ६० हजार हेक्टर इतके असून  ७० टक्के पिकाचे नुकसान झालेआहे. बाजारीचे क्षेत्र १ लाख १० लाख हजार हेक्टर असून ६० टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे क्षेत्र ७३ हजार हेक्टर असूनत्यात८० टक्के नुकसान झाल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. लेटखरीप कांद्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान मालेगाव, सिन्नर, निफाड, त्र्यंबक, सटाणा आणि देवळा तालुक्यात झाले आहेत.