शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शरद पवारांनी सद्सद्विवेकबुद्धी गमावली ! : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 01:28 IST

नरेंद्र मोदी यांची हवा इतकी जोरात आहे की, महाराष्टत ज्यांना जाणता राजा म्हटले जाते ते शरद पवार हे काहीही विधाने करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना सद्सद्विवेकबुद्धी राहिली नसल्याचे दिसत आहे,

नरेंद्र मोदी यांची हवा इतकी जोरात आहे की, महाराष्टत ज्यांना जाणता राजा म्हटले जाते ते शरद पवार हे काहीही विधाने करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना सद्सद्विवेकबुद्धी राहिली नसल्याचे दिसत आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आमच्यावर आरोप करणारे स्वातंत्र्य सैनिक म्हणून जेलमध्ये गेले नव्हते तर भ्रष्टाचारामुळे गेले होते, अशी टोलेबाजीही त्यांनी भुजबळ यांचे नाव न घेता केली.फडणवीस यांनी जाहीर सभेत बोलताना मोदी यांच्या हवेमुळे शरद पवार यांच्यासह राष्टÑवादीसारखे विरोधक अस्वस्थ झाले आहेत. शरद पवार यांनी तर बॅट, ग्लोज, हेल्मेट घातले; परंतु नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी गुगली टाकली की ते बारावे खेळाडू झाले आहेत, असे सांगितले. काहीजण आमच्यावर आरोप करीत आहेत. मात्र, असे राष्टÑवादीचे बहुरूपी जेलमध्ये जाऊन आले आहेत, अशांनी असे आरोप करू नये, असेही ते म्हणाले.नारपारच्या पाण्याबद्दल काहीजण दिशाभूल करीत आहेत. उलट कॉँग्रेस काळात केलेला करार मोडीत काढून नव्याने करार करण्यात येणार आहे आणि १७ धरणे बांधून हे पाणी आता महाराष्टÑाला वापरता येणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.हे तयार आहेत भजी तळायला; पण तुम्ही तयार आहात का पीठ मळायला?आपल्या खास शैलीत शीघ्र कवी आणि केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली. मध्यंतरी बेरोजगारांनी पकोडे तळण्याचा सल्ला देणारा भाजप नेत्यांचा सल्ला गाजला होता. यावर कॉँग्रेसने टीका केली होती. त्यांचा संदर्भ घेत आठवले यांनी खास काव्यातून टीका केली. यावेळी मोदी तसेच गांधी यांची त्यांनी काव्यात्मक तुलना केली. कॉँग्रेस पक्ष आता पाच वर्षांत भाजप सरकारने काय केले विचारतात; परंतु ७० वर्षांत त्यांनी काय केले असा प्रश्न करताना या पक्षांनी जातीयवाद आणि धर्मवादच पेरला, असाही आरोप आठवले यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdindori-pcदिंडोरीnashik-pcनाशिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी