शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘शक्ती’ पणास !

By किरण अग्रवाल | Updated: August 5, 2018 01:49 IST

जुनं ते सोनं असे नेहमीच म्हटले जाते; परंतु प्रत्यक्षात जुन्या लोकांकडे घरात व बाहेरही दुर्लक्षच होत असल्याचे अधिकतर दिसून येते. राजकारणात तर जुनी माणसं अडगळीत टाकली गेल्याचेच पहावयास मिळते. आपल्या मताला किंमत नाही किंवा आपल्याला साधा सन्मानही मिळत नाही, या भावनेतून तसेच नवीन लोकांशी सांधा जुळत नाही म्हणून ही मंडळी बाद झाल्यागत स्वत:ला अलिप्त करून घेतात. जुन्या जाणत्यांची, ज्येष्ठांची ही अलिप्तता कोणत्याही पक्ष-संघटनेसाठी मारकच ठरणारी असते.

जुनं ते सोनं असे नेहमीच म्हटले जाते; परंतु प्रत्यक्षात जुन्या लोकांकडे घरात व बाहेरही दुर्लक्षच होत असल्याचे अधिकतर दिसून येते. राजकारणात तर जुनी माणसं अडगळीत टाकली गेल्याचेच पहावयास मिळते. आपल्या मताला किंमत नाही किंवा आपल्याला साधा सन्मानही मिळत नाही, या भावनेतून तसेच नवीन लोकांशी सांधा जुळत नाही म्हणून ही मंडळी बाद झाल्यागत स्वत:ला अलिप्त करून घेतात. जुन्या जाणत्यांची, ज्येष्ठांची ही अलिप्तता कोणत्याही पक्ष-संघटनेसाठी मारकच ठरणारी असते. हेच लक्षात घेत आता बहुतेक पक्षांनी जुन्यांना जोडण्याच्या मोहिमा हाती घेतल्या आहेत. नव्यांना युक्तीच्या चार गोष्टी सांगण्याची त्यांची उपयोगीता त्या त्या पक्षासाठी लाभदायीच ठरावी. काँग्रेसनेही आपल्या ‘शक्ती प्रोजेक्ट’ अंतर्गत जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांकडे याचदृष्टीने बघता यावे.काँग्रेसला घराघरात पोहचण्यासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कल्पनेतून थेट त्यांच्याशी संपर्क करता यावा व त्यांची भूमिका विविध माध्यमातून समजून घेता यावी म्हणून ‘प्रोजेक्ट शक्ती’ राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातील नोंदणीचा शुभारंभ नाशकातील पंचवटीत करताना पक्षाच्या जुन्या जाणत्या नेत्या-कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षप्रवाहात आणण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याची भूमिका मांडली गेल्याने, या पक्षात अडगळीत पडलेल्यांमध्ये ‘अच्छे दिन’ येण्याची अपेक्षा उंचावून गेली आहे. काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष असल्याने, काळ जसा जसा बदलत गेला तसतसे नवे नेतृत्व पुढे येऊन जुने बाजूला सारले गेल्याचे दिसून येते. नवे लोक नवी संकल्पना व ऊर्जा घेऊन येतात, त्याचा पक्षाला लाभ होतोच; परंतु ते होताना जुन्यांचे विस्मरण घडून आले तर मार्गदर्शनाची प्रक्रिया अडखळते. काँग्रेसमध्ये स्थानिक पातळीवर तेच होताना दिसते. एकेकाळी पक्षातर्फे आमदारकी-खासदारकी भूषविलेले अनेक मान्यवर केवळ सभा-समारंभात व्यासपीठाची शोभा वाढविण्यापुरते औपचारिक अस्तित्व दर्शवताना दिसून येतात. नेतृत्व करणारे बदलले की, हल्ली त्यांचे कार्यकर्तेही बदलतात, त्यामुळे जुने कार्यकर्तेही अशात बाजूलाच पडतात. नवीन लोकांकडून गरजेव्यतिरिक्त त्यांना सोबत अगर विश्वासात घेण्याची प्रक्रियाच घडून येत नाही. त्यामुळे पक्षाचे असूनही ते पक्षापासून दुरावल्यासारखे राहतात. या दुरावलेल्यांना व अडगळीत पडल्याची भावना झालेल्यांना पुन्हा पक्षप्रवाहात आणण्यासाठी ‘प्रोजेक्ट शक्ती’च्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याने त्याचा लाभ काँग्रेसला होण्याची अपेक्षा करता यावी. माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीतही मध्य नाशकात झालेल्या एका कार्यक्रमात जनसंपर्काची शक्ती पक्षाला लाभदायी ठरण्याची अपेक्षा त्यांनी बोलुन दाखविली. अर्थात, प्रोजेक्टमध्ये नोंदणी केली म्हणजे झाले; असे न करता जुन्यांसह नव्यांना काही कृती कार्यक्रम दिला गेला तरच त्यांच्या ‘शक्ती’चा पक्षासाठी उपयोग घडून येऊ शकेल. पक्षाचे शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष आता या ‘शक्ती प्रोजेक्ट’च्या माध्यमातून काँग्रेसचे शक्ती वाढीस लावण्यासाठी कितपत परिश्रम घेतात, हेच आता पाहायचे. त्याअर्थाने त्यांचीच शक्ती पणास लागल्याचे म्हणता यावे.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेस