शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शहीद स्वाभिमान यात्रा : नाशिकच्या तोफखाना केंद्रात भव्य स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:51 IST

देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर वीरगती प्राप्त करणा-या शहीद जवानांच्या स्मृतींचे विस्मरण कालांतराने सरकारला पडते. त्यामुळे शहिदांच्या कुटुंबीयांना सर्वत्र संघर्ष करावा लागतो. शहिदांच्या कुटुंबीयांना समाज व सरकारकडून सन्मान मिळावा, या मुख्य उद्देशाने ‘स्वाभिमान देश का’ या संघटनेची स्थापना केली.

ठळक मुद्दे२९ राज्यांमधून ९९ दिवस १५ हजार किलोमीटरचा प्रवास करत भारतभ्रमंतीचे उद्दिष्ट शहिदांच्या कुटुंबीयांना समाज व सरकारकडून सन्मान मिळावाशहरातून यात्रा मुंबईच्या दिशेने रवाना

नाशिक : ‘भारत माता की जय, शहीद जवान अमर रहें’चा जयघोष करीत ऐतिहासिक ‘शहीद स्वाभिमान यात्रा’ नाशिकरोड येथील भारतीय तोफखाना कें द्रात दाखल झाली. ‘राष्टपुत्र से हो सन्मान, मांग रहा हैं हिंदुस्तान’ हे ब्रीद घेऊन प्रवास करणाऱ्या यात्रेचे केंद्रातील वरिष्ठ अधिका-यांनी स्वागत केले. यावेळी जवानांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या.२९ राज्यांमधून ९९ दिवस १५ हजार किलोमीटरचा प्रवास करत भारतभ्रमंतीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर असलेल्या शहीद स्वाभिमान यात्रेचे बुधवारी (दि.४) रात्री नऊ वाजता तोफखाना केंद्रात आगमन झाले. भारतीय सैन्यदलातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तोफखाना दलाने या यात्रेचे जोरदार स्वागत केले. गुरुवारी (दि.५) सकाळी मेजर जनरल अशोक नरुला यांनी यात्रेला झेंडा दाखवत पुढील मार्गासाठी रवाना केले. यावेळी तोफखाना केंद्राचे जवान मोठ्या संख्येने प्रवेशद्वारावर उपस्थित होते.

देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर वीरगती प्राप्त करणा-या शहीद जवानांच्या स्मृतींचे विस्मरण कालांतराने सरकारला पडते. त्यामुळे शहिदांच्या कुटुंबीयांना सर्वत्र संघर्ष करावा लागतो. शहिदांच्या कुटुंबीयांना समाज व सरकारकडून सन्मान मिळावा, या मुख्य उद्देशाने सर्वसामान्य १८ नागरिकांनी दिल्लीमध्ये एकत्र येत सुरेंद्रसिंह बिधुडी यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्वाभिमान देश का’ या संघटनेची स्थापना के ली. २३ मार्च २०१८ रोजी भारतीय लष्करप्रमुख विपीन रावत यांनी दिल्ली येथील इंडिया गेटवर शहीद स्वाभिमान यात्रेला हिरवा झेंडा दाखवून पाठिंबा दिला. ही यात्रा मध्य प्रदेशमधील भोपाळ, इंदूरमार्गे नाशिकमध्ये पोहचली होती. सकाळी शहरातून यात्रा मुंबईच्या दिशेने रवाना झाली. यात्रेमध्ये सहभागी वाहनावर आकर्षक पद्धतीने शहीद भगतसिंग, शहीद चंद्रशेखर आझाद, शहीद राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची छायाचित्रे सजविण्यात आली आहेत.

साडेतीन हजार कि.मी.चा प्रवास पूर्ण२३ मार्च रोजी सुरू झालेली शहीद स्वाभिमान यात्रा दिल्लीहून राजस्थान राज्यात दाखल होऊन उदयपूरमार्गे गुजरात राज्यात ३१ मार्च रोजी पोहचली. अहमदाबाद येथून यात्रा उज्जैनमार्गे मध्य प्रदेश राज्याच्या सीमेतून प्रवास नाशिकमध्ये दाखल झाली. यात्रेचा एकू ण साडेतीन हजार कि.मी.चा प्रवास पूर्ण झाला आहे. यात्रा १० एप्रिल रोजी पुण्यात दाखल होणार आहे. यात्रेचा समारोप पंजाब राज्यातून मार्गक्रमणानंतर २४ जून रोजी दिल्लीच्या इंडिया गेटवर होणार आहे.

असे आहे ‘मिशन’शहीद स्वाभिमान यात्रेचे प्रमुख मिशन म्हणजे शहीद भगतसिंग यांना देशाचे राष्टपुत्र म्हणून सन्मान द्यावा. तसेच देशाच्या सर्व शहिदांना सर्वोच्च सन्मान द्यावा.शहीद भगतसिंग यांची मोठी प्रतिमा उभारण्याचे लक्ष्य. त्यासाठी देशाच्या प्रत्येक राज्यामधून माती संकलित करणे. याबरोबरच शहीद संस्थांची स्थापना करण्याचा मानस.राष्टच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या सैनिक, अर्धसैनिक व पोलिसांना एकसमान स्वरूपात सन्मान द्यावा. त्यांच्या कुटुंबीयांना सर्वसमान सुविधांचा लाभ द्यावा. तसेच ‘शहीद स्वाभिमान कार्ड’ देऊन त्यांचा सन्मान सरकारने करावा, अशा प्रमुख मागण्यांचे मिशन घेऊन यात्रा मार्गक्रमण करीत असल्याची माहिती यात्रेचे समन्वयक संतोष सिंह यांनी दिली.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करNashikनाशिक