शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 01:57 IST

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत बुलडाण्याच्या ‘बीजेएस’ कार्यपद्धतीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातही ही योजना राबविण्यात येणार असून, खासगी संस्थांकडून या कामासाठी यंत्रसामग्री पुरविण्यात येणार असल्याने जनतेच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी केले.

नाशिक : ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत बुलडाण्याच्या ‘बीजेएस’ कार्यपद्धतीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातही ही योजना राबविण्यात येणार असून, खासगी संस्थांकडून या कामासाठी यंत्रसामग्री पुरविण्यात येणार असल्याने जनतेच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी केले.या योजनेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नाईस सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचा समारोप जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियान राबविण्यासाठी बीजेएसचे सहकार्य लाभणार आहे. या संस्थेकडूनमोठ्या प्रमाणात यंत्रसामग्रीमिळणार असल्याने ही मोठी संधी समजून यंत्रणांनी अधिक प्रयत्न करावे व योजनेच्या अंमलबजावणीत प्रथम क्रमांकावर आणावा,असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.अभियान राबविताना प्रस्ताव मान्यता प्रक्रिया वेगाने करणे तसेच लोकसहभाग वाढविणे या बाबींवर अधिक भर देणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले. बुलडाणाचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वराडे यांनी सादरीकरणाद्वारे ह्यबीजेएस पॅटर्नह्णची माहिती दिली. लोकसहभाग वाढविण्याचे प्रयत्न केल्याने आणि प्रस्तावाची मान्यता प्रक्रिया वेगवान केल्याने बुलडाणा जिल्हा या अभियानात राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला, असे त्यांनी सांगितले. अपर सचिव ताशिलवार यांनी अभियानाची माहिती दिली.बुलडाणा येथील उप अभियंता क्षितीजा गायकवाड यांनी जलसंपदा विभागाने केलेल्या कामाचे सादरीकरण केले. कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, प्रकल्प अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, बीजेएसचे जिल्हा समन्वयक नंदकुमार साखला, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ आदी उपस्थित होते. कार्यशाळेला जिल्ह्णातील उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच कृषी व जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.इंधन खर्च शासनाचाअभियानासाठी यंत्र सीएसआरमधून, इंधन शासनाकडून आणि वाहतूक खर्च शेतकºयांकडून करावयाचा आहे. राज्यात काढलेल्या एक कोटी ९० लाख घनमीटर गाळापैकी ५० लाख घनमीटर गाळ बुलडाण्यात काढण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा युवा मित्र संघटनेचे सहकार्य लाभत आहे.

टॅग्स :Governmentसरकारcollectorजिल्हाधिकारी