शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

आनंदवली परिसरातून गोदावरी नदीत जाणारे मलजल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:15 IST

नाशिक : गोदावरी आणि उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नाल्यांमध्ये जाणारे पाणी अडवून ते वळविले जात आहे. त्यामुळे ...

नाशिक : गोदावरी आणि उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नाल्यांमध्ये जाणारे पाणी अडवून ते वळविले जात आहे. त्यामुळे आनंदवली परिसरातील नाल्यांमधून नदीपात्राचे होणारे प्रदूषण थांबवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तपोवन मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर ओझोनायझेशनची प्रक्रिया केली जात आहे. या प्रयोगामुळे गोदावरी नदितील फेसाळलेले पाणी कमी होणयास मदत हेाईल, असे मत गोदावरी शुद्धीकरणासाठी गठीत उपसमितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

गोदावरी शुद्धीकरणासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्य अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठित करण्यात आली असून, या समितीची उपसमिती असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य समिती सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली यावेळी याबाबत माहिती देण्यात आली. औद्योगिक प्रदूषणाविषयी बैठकीत नेहमीच चर्चा होते. मात्र औद्योगिक क्षेत्रात गटारी आणि मलनिस्सारण प्रकल्प केंद्रांची जबाबदारी उच्च न्यायालयाने प्रदूषण मंडळाकडे दिली असताना मंडळ आणि महापालिका यांच्यात जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप यावेळी याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी केला.

नाल्यांच्या माध्यमातून गोदावरी नदीत होणारे प्रदूषण यावर चर्चा करताना गंगापूररोड परिसरातून जाणारे नाल्यांचे पाणी मलवाहिकेतून गंगापूर मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्यात आले आहे. १८ एमएलडी क्षमता असलेल्या केंद्रामुळे बारदान फाटा नाला आणि सोमेश्वर नाला कोरडा पडलेला आहे. कारण या नाल्यातील सांडपाणी गटार व्यवस्थेला जोडण्यात आले आहे. आनंदवल्ली बंधाऱ्यातही येऊन मिसळणारा नाला, चिखली नाला, आसाराम बापू पुलालगतच्या नाल्यातून होणारे प्रदूषण थांबल्याची यावेळी माहिती देण्यात आली.

चोपडा नाल्यातून गटारीचे पाणी पात्रात मिसळत असल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या होत्या. मात्र या भागातील मलजल पाणी गटारीत वळविण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. लेंडी नाल्यातून पात्रात सांडपाणी मिसळू नये म्हणून महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काम हाती घेतले आहे. हे काम ४० टक्के पूर्ण झाल्याची माहिती या बैठकीत महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

इन्फो...

तपोवन येथे ओझोनायझेशन प्रक्रिया

नेरीच्या नव्या निकषानुसार सर्व मलनिससारण प्रक्रिया केंद्रांमधून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त मलजलाचा बीओडी दहापेक्षा कमी करावा लागणार आहे. हे खूप खर्चिक काम असल्याने सध्या तपोवन मलनिस्सारण केंद्रात ओझोनायझेशनची प्रक्रिया करण्याचा अनोखा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.