शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

आनंदवली परिसरातून गोदावरी नदीत जाणारे मलजल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:15 IST

नाशिक : गोदावरी आणि उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नाल्यांमध्ये जाणारे पाणी अडवून ते वळविले जात आहे. त्यामुळे ...

नाशिक : गोदावरी आणि उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नाल्यांमध्ये जाणारे पाणी अडवून ते वळविले जात आहे. त्यामुळे आनंदवली परिसरातील नाल्यांमधून नदीपात्राचे होणारे प्रदूषण थांबवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तपोवन मलनिस्सारण केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर ओझोनायझेशनची प्रक्रिया केली जात आहे. या प्रयोगामुळे गोदावरी नदितील फेसाळलेले पाणी कमी होणयास मदत हेाईल, असे मत गोदावरी शुद्धीकरणासाठी गठीत उपसमितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

गोदावरी शुद्धीकरणासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांच्य अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती गठित करण्यात आली असून, या समितीची उपसमिती असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य समिती सदस्यांची बैठक नुकतीच पार पडली यावेळी याबाबत माहिती देण्यात आली. औद्योगिक प्रदूषणाविषयी बैठकीत नेहमीच चर्चा होते. मात्र औद्योगिक क्षेत्रात गटारी आणि मलनिस्सारण प्रकल्प केंद्रांची जबाबदारी उच्च न्यायालयाने प्रदूषण मंडळाकडे दिली असताना मंडळ आणि महापालिका यांच्यात जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप यावेळी याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी केला.

नाल्यांच्या माध्यमातून गोदावरी नदीत होणारे प्रदूषण यावर चर्चा करताना गंगापूररोड परिसरातून जाणारे नाल्यांचे पाणी मलवाहिकेतून गंगापूर मलनिस्सारण केंद्राकडे वळविण्यात आले आहे. १८ एमएलडी क्षमता असलेल्या केंद्रामुळे बारदान फाटा नाला आणि सोमेश्वर नाला कोरडा पडलेला आहे. कारण या नाल्यातील सांडपाणी गटार व्यवस्थेला जोडण्यात आले आहे. आनंदवल्ली बंधाऱ्यातही येऊन मिसळणारा नाला, चिखली नाला, आसाराम बापू पुलालगतच्या नाल्यातून होणारे प्रदूषण थांबल्याची यावेळी माहिती देण्यात आली.

चोपडा नाल्यातून गटारीचे पाणी पात्रात मिसळत असल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्या होत्या. मात्र या भागातील मलजल पाणी गटारीत वळविण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. लेंडी नाल्यातून पात्रात सांडपाणी मिसळू नये म्हणून महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काम हाती घेतले आहे. हे काम ४० टक्के पूर्ण झाल्याची माहिती या बैठकीत महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

इन्फो...

तपोवन येथे ओझोनायझेशन प्रक्रिया

नेरीच्या नव्या निकषानुसार सर्व मलनिससारण प्रक्रिया केंद्रांमधून बाहेर पडणाऱ्या प्रक्रियायुक्त मलजलाचा बीओडी दहापेक्षा कमी करावा लागणार आहे. हे खूप खर्चिक काम असल्याने सध्या तपोवन मलनिस्सारण केंद्रात ओझोनायझेशनची प्रक्रिया करण्याचा अनोखा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.