शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सेट, नेट, पीएच.डी. धारकांकडून प्राध्यापक भरतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:07 IST

नाशिक : गेल्या दहा ते बारा वर्षांपासून बंद असलेली वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांची भरती पुन्हा सुरू करण्याची मागणी सेट, नेट ...

नाशिक : गेल्या दहा ते बारा वर्षांपासून बंद असलेली वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांची भरती पुन्हा सुरू करण्याची मागणी सेट, नेट व पीएच.डी.धारक संघर्ष समितीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य उदय सामंत यांच्याकडे केली आहे. नाशिक दौऱ्यावर असताना संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.२३) उदय सामंत यांची भेट घेत त्यांना मागण्यांविषयी निवेदन देत रिक्त असलेल्या जागांवर शंभर टक्के भरतीप्रक्रिया राबविण्याची मागणी केली.

प्राध्यापक भरतीप्रकिया बंद असल्याने अनेक प्राध्यापकांवर सध्या तासिका तत्त्वावर जीवन जगावे लागत आहे. त्यामुळे सीएचबी म्हणजेच तासिका तत्त्व पूर्णत: बंद करून समान काम समान वेतन या आपल्या मुद्द्यावर संघर्ष समिती ठाम असून, याविषयी चर्चा करण्यासाठी समितीने दिलेल्या निवेदनाद्वारे वेळ मागतानाच सरकारने रिक्त जागांवर १०० टक्के प्राध्यापक भरती करावी, अशी मागणी केली आहे. अनेक तासिका तत्त्वावर शिकविणाऱ्यांचे वय ४५ ते ५०पर्यंत पोहोचूनही प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. त्यामुळे संपूर्ण आयुष्यच तसिका तत्त्वावर जाणार की काय, याची चिंता आता प्राध्यापकांना लागली आहे. प्राध्यापकांच्या या अवस्थेला सरकारी निर्णय जबाबदार असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी सेट,नेट व पीएच.डी.धारक संघर्ष समितीचे नाशिक विभाग समन्वयक प्रा.सतीश घोटेकर प्रा. दर्शन देवढे, डॉ. संभाजी पगार, प्रा. शशी माळोदे उपस्थित होते.

(आरफोटो-२३नेट सेट)- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना सेट, नेट व पीएच.डी.धारक संघर्ष समितीचे नाशिक विभाग समन्वयक प्रा. सतीश घोटेकर, प्रा. दर्शन देवढे, डॉ. संभाजी पगार, प्रा. शशी माळोदे आदी.