शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

तारवालानगरला अपघातांची मालिका

By admin | Updated: February 3, 2016 22:38 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : दिवसाआड घडताय अपघात

पंचवटी : दिंडोरीरोडवरील रस्त्यांचे रुंदीकरण झाले असले तरी सध्या या रस्त्यांवर वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. तारवालानगर चौफुलीवर अपघातांची मालिका सुरू असली तरी या अपघातांवर नियंत्रण बसावे यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दिवसाआड घडणाऱ्या अपघातात कधी वाहनांचे नुकसान, तर कधी वाहनधारक जखमी होण्याच्या घटना घडत असल्याने या अपघाताच्या मालिकांना ब्रेक कधी लागणार, असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. तारवालानगर चौफुलीवर प्रशासनाच्या वतीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. याशिवाय वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलीसही नेमण्यात आलेले आहेत. वाहतूक पोलीस तर केवळ रस्त्याच्या कडेला झाडाखाली सावलीत थांबतात. तेच जर वाहतुकीच्या रस्त्यावर थांबले तर अपघातांना आळा बसेल. याशिवाय सिग्नल चालू असताना अनेक बेशिस्त वाहनधारक सिग्नलकडे दुर्लक्ष करून वाहने भरधाव वेगाने नेतात व अपघात घडतात. कधी चारचाकी दुभाजकाला जाऊन धडकतात तर कधी चारचाकीवर दुसऱ्या चारचाकी येऊन धडकतात, असे वारंवार घडत असल्याने अपघातांची मालिका ही सुरूच आहे. तारवालानगर चौफुली असल्याने या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी गतिरोधक अत्यंत गरजेचे आहे आणि विशेष म्हणजे गतिरोधक टाकावेत यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावादेखील केलेला आहे. मात्र प्रशासन गांभीर्याने दखल घेतच नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. या तारवालानगर परिसरातील रस्त्यावर सिग्नल, तसेच दुभाजकावरच वाहने येऊन आदळत असल्याने प्रशासनाचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार घडणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्यास व प्रशासनाने गतिरोधक बसविल्यास अपघातांवर निश्चितच नियंत्रण बसू शकते, असे परिसरातील नागरिकांकडून सांगितले जात आहे. (वार्ताहर)