शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

जिल्ह्यातील १२ पुलांना अलर्ट देणारे सेन्सर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:49 IST

पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने नदीवरील ब्रिटिशकालीन पुलांना धोका होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने पुराचा धोका वेळीच ओळखण्यासाठी जिल्ह्यातील १२ पुलांना सेन्सर्स लावण्यात आले आहेत.

नाशिक : पावसाळ्यात नद्यांना पूर आल्याने नदीवरील ब्रिटिशकालीन पुलांना धोका होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने पुराचा धोका वेळीच ओळखण्यासाठी जिल्ह्यातील १२ पुलांना सेन्सर्स लावण्यात आले आहेत. पुलाला धोकादायक पातळीपर्यंत पाणी लागल्यास सेन्सर्सद्वारे त्याची माहिती वेळीच संबंधित कक्षेतील अभियंत्याला भ्रमणध्वनीवर कळणार असून, त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे शक्य होणार आहे.रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीला पूर आल्यामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा नदीवरील पूल कोसळून अनेकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यभर ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात येऊन पावसाळ्यात विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिटदेखील पूर्ण झाले असून, पुराचा धोका ओळखणारे सेन्सर्स पुलांना बसविण्यात आले आहेत. मागील वर्षीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतची खबरदारी घेतली होती.जिल्ह्यातील १०० ते २०० आणि २०० मीटरवरील ब्रिटिशकालीन पुलांना अशा प्रकारचे सेन्सर्स लावण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मालेगाव, सुरगाणा, दिंडोरी, त्र्यंबक तसेच साउथ उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पुलांना सेन्सर्स लावण्यात आलेले आहेत.मालेगाव उपविभागातील गिरणा नदीवरील मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन्ही पूल तसेच काथरे दिगर-सटाणा-मालेगाव- चाळीसगाव रस्त्यावरील पूल, नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीवरील काचनगाव- काळुस्ते तसेच नाशिक रिंगरोड (मोडाडी फाटा, सय्यद पिंप्री, लाखलगाव) येथील पूल, व नानेगाव पळस, पार नदीवरील करंजूल उंबरपेठ पळसन बाºहे, अंबेपेठ रोड, नार नदीवरील पळसन आमधा, पूनद नदीवरील मोकभनगी, कळवण, ओतूर, मुळाणे, बारी रोड, कडवा नदीवरील नाशिक-दिंडोरी-वणी रोड, सुखी नदीवरील मालेगाव-नांदगाव-शिऊर-औरंगाबादरोड या पुलांना सेन्सर लावण्यात आले आहेत. मालेगाव सबडिव्हीजनमधील मोसम नदीवरील सटाणा-अजमिर-सौंदाणे-रावळगावरोड, त्याचप्रमाणे रावळगाव-वडनेर-गरेगाव-पोहणे-झोडगे, नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीवरील डुबेर-सोनांबे-शिवदे-पांढुर्ली-भगूररोड, त्र्यंबक सबडिव्हिजनमधील आडगाव वाघेरे-गिरणारे-हरसूल-ओझरखेड या ब्रिटिशकालीन पुलांना सेन्सर्स बसविण्यात आले आहेत.धोकादायक स्थितीत पूल बंद करणारपुलाची परिस्थिती पाहून पुलाच्या किती अंतरावर सेन्सर्स बसवावे याचा निर्णय घेतला जातो. त्यानुसार पुलावरून पाणी जाण्यापूर्वीच अलर्ट मिळू शकेल, अशा अंतरावर सेन्सर्स बसविले जातात. जेणेकरून पुलावरून पाणी जाण्यापूर्वीच सदर पुलावरून होणारी वाहतूक तातडीने बंद केली जाणार आहे. सेन्सर्सचे संदेश हे संबंधित कार्यकारी अभियंत्याच्या भ्रमणध्वनीशी जोडण्यात आले आहेत.

टॅग्स :floodपूरNashikनाशिक