शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

पुराचा धोका ओळखणारे सेन्सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 04:35 IST

सावित्री नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेल्यानंतरच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे.

संदीप भालेरावनाशिक : सावित्री नदीवरील पूल पुरामुळे वाहून गेल्यानंतरच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पुलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात २८ पुलांना पुराचा धोका ओळखणारे सेन्सर लावण्यात आले आहे. पुलाच्या गर्डरला पुराचे पाणी धडकल्यानंतर लागलीच संबंधितांना सेन्सर अलर्ट करते. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करणे शक्य होऊन दुर्घटना रोखण्यासही मदत होणार आहे.राज्यात हजारो ब्रिटिशकालीन पूल आहेत. त्यांना पुराचा धोका असतो. पुलाच्या सरफेसखाली दोन ते तीन फुटांवर गर्डरला सेन्सर लावले जाते. सेन्सरला पाणी लागल्यानंतर तीन अभियंत्यांना एसएमएस जातो. यंदाच्या पावसाळ्यात नांदूरमधमेश्वर येथील पुलाजवळ पाण्याची पातळी वाढल्यानंतर सेन्सरद्वारे अलर्टमिळाला होता.त्यानंतर पुलाच्या दोन्ही बाजूंनी सुरक्षारक्षक तैनात करून वाहनांना हा पूल बंद करण्यात आला, पुलावर जाण्यासही मज्जाव करण्यात आला. जिल्ह्यातील केवळ एक पूल वगळता इतर १७७ पूल पाण्यापासून सुरक्षित आहेत.नाशिक जिल्ह्यातील गोदावरी, गिरणा, दारणा, नार-पार, कडवा, मोसम, कश्यपी, अळवंडी या नद्यांवरील एकूण २८ पुलांवर सेन्सर बसविण्यात आले आहेत.यंदा नांदूरमधमेश्वर येथील पुलाला पाणी लागण्याच्या अगोदर सेन्सरद्वारे अलर्ट मिळाला होता.सावित्री नदीवरील पुलालाही सेन्सर प्रणालीमहाड येथील सावित्री नदीवरील पुलाला पुराच्या पातळीची माहिती देणारे सेन्सर बसविण्यात आले आहे. मागील वर्षी २ आॅगस्टला पूल वाहून गेल्यानंतर १२ जणांना जलसमाधी मिळाली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत नवा पूल बांधण्यात आला.