शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

मानवसेवेसाठी संवेदना जागृत होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:38 IST

समाजातील विविध प्रश्नांप्रती कळवळा असणारे अनेकजण आहेत. परंतु, समाजातील समस्या सोडविण्यासाठी आणि पीडितांच्या सेवेसाठी आपण काय करू शकतो याविषयी पुरेशी जागृती नसल्याने अनेकजण इच्छा असूनही कोणाच्या मदतीला उभे राहू शकत नाही.

नाशिक : समाजातील विविध प्रश्नांप्रती कळवळा असणारे अनेकजण आहेत. परंतु, समाजातील समस्या सोडविण्यासाठी आणि पीडितांच्या सेवेसाठी आपण काय करू शकतो याविषयी पुरेशी जागृती नसल्याने अनेकजण इच्छा असूनही कोणाच्या मदतीला उभे राहू शकत नाही. अथवा उभे राहिले तरी पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात माघार घेतात. त्यामुळे पीडित आणि वंचित घटकांतील मानवसेवेसाठी समाजातील संवेदना जागृत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन हजारो मनोरुग्णांचे पुनर्वसन करणारे डॉ. भरत वाटवानी यांनी केले.महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये फ्युचर आॅफ सोशल वर्कतर्फे रविवारी (दि. ३१) कालिदास कलामंदिरमध्ये ‘एक संवाद-एक उकल’ कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. भरत वाटवाणी यांच्यासह युद्धभूमीवरील रुग्णांना सेवा देणारे डॉ. भरत केळकर व सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर काम करणारे प्रमोद गायकवाड यांच्याशी प्रा. वृंदा भार्गवे व पत्रकार वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधत त्यांच्या सामाजिक जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला.आत्मिक समाधान महत्त्वाचेसमाजसेवेत आत्मिक समाधान महत्त्वाचे असते. सिरियात युद्धजन्य परिस्थितीत रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे केल्याचे समाधान सर्वांत मोठे असल्याचे डॉ. भरत केळकर यांनी सांगितले. त्यासोबतच यमन मोसूल मध्येही युद्धभूमीवरील रुग्णांची सेवा करण्याचा अनुभव आपल्याला आत्मिक समाधान मिळवून देणारा असल्याचे ते म्हणाले, तर सोशल मीडियाचा चांगला वापर झाला तर निश्चितच चांगले कार्य उभे करणे शक्य असल्याचा विश्वास व्यक्त करताना प्रमोद गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पाणी या क्षेत्रांत मूलभूत काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक