शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मानवसेवेसाठी संवेदना जागृत होणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:38 IST

समाजातील विविध प्रश्नांप्रती कळवळा असणारे अनेकजण आहेत. परंतु, समाजातील समस्या सोडविण्यासाठी आणि पीडितांच्या सेवेसाठी आपण काय करू शकतो याविषयी पुरेशी जागृती नसल्याने अनेकजण इच्छा असूनही कोणाच्या मदतीला उभे राहू शकत नाही.

नाशिक : समाजातील विविध प्रश्नांप्रती कळवळा असणारे अनेकजण आहेत. परंतु, समाजातील समस्या सोडविण्यासाठी आणि पीडितांच्या सेवेसाठी आपण काय करू शकतो याविषयी पुरेशी जागृती नसल्याने अनेकजण इच्छा असूनही कोणाच्या मदतीला उभे राहू शकत नाही. अथवा उभे राहिले तरी पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात माघार घेतात. त्यामुळे पीडित आणि वंचित घटकांतील मानवसेवेसाठी समाजातील संवेदना जागृत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन हजारो मनोरुग्णांचे पुनर्वसन करणारे डॉ. भरत वाटवानी यांनी केले.महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये फ्युचर आॅफ सोशल वर्कतर्फे रविवारी (दि. ३१) कालिदास कलामंदिरमध्ये ‘एक संवाद-एक उकल’ कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. भरत वाटवाणी यांच्यासह युद्धभूमीवरील रुग्णांना सेवा देणारे डॉ. भरत केळकर व सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर काम करणारे प्रमोद गायकवाड यांच्याशी प्रा. वृंदा भार्गवे व पत्रकार वैशाली बालाजीवाले यांनी संवाद साधत त्यांच्या सामाजिक जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला.आत्मिक समाधान महत्त्वाचेसमाजसेवेत आत्मिक समाधान महत्त्वाचे असते. सिरियात युद्धजन्य परिस्थितीत रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे केल्याचे समाधान सर्वांत मोठे असल्याचे डॉ. भरत केळकर यांनी सांगितले. त्यासोबतच यमन मोसूल मध्येही युद्धभूमीवरील रुग्णांची सेवा करण्याचा अनुभव आपल्याला आत्मिक समाधान मिळवून देणारा असल्याचे ते म्हणाले, तर सोशल मीडियाचा चांगला वापर झाला तर निश्चितच चांगले कार्य उभे करणे शक्य असल्याचा विश्वास व्यक्त करताना प्रमोद गायकवाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पाणी या क्षेत्रांत मूलभूत काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक