शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

ज्येष्ठ साहित्यिक गो. तु. पाटील यांचे निधन; त्यांच्या निधनाने एक व्यासंगी साहित्यिक व संपादक हरपला

By धनंजय वाखारे | Updated: August 19, 2024 00:00 IST

त्यांच्या निधनाने एक व्यासंगी साहित्यिक व संपादक हरपला आहे.

नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक व अनुष्टुभ परिवारातील ज्येष्ठ संपादक गोविंदा तुकाराम तथा गो. तु. पाटील यांचे रविवारी (दि.१८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज, सोमवारी (दि.१९) सकाळी ११ वाजता येवला येथील त्यांच्या कृतज्ञता निवासस्थानापासून निघणार आहे. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी साहित्यिक व संपादक हरपला आहे.

त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. गो. तु. पाटील यांचे मूळगाव सूनसगाव खुर्द, ता.जामनेर असून, त्यांचे माध्यमिक शिक्षण कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ येथे बहिणीकडे झाले. त्यानंतर त्यांनी उच्चशिक्षण घेतले. याचवेळी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. तीच त्यांची कर्मभूमी झाली. नोकरी सांभाळतांनाच त्यांनी मराठी साहित्यातदेखील आपले कार्य सुरू केले. अनुष्टुभ सारखे दर्जेदार नियतकालिक त्यांनी चालविले.

त्याबरोबरच स्तंभलेखन, संपादन, मुलांसाठी संतचरित्र लिहिणारे गो. तु. पाटील यांनी वि. वा. शिरवाडकरांच्या हयातीत ’नटसम्राट समीक्षा’ या पुस्तकांचे संपादन केले आहे. ’ओल अंतरीची’ ही त्यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे. चार दशके सांस्कृतिक विश्वात वावरणारे गो. तु. पाटील अजातशत्रू, व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जायचे. गेवराई (बीड), मालेगाव, येवला या ठिकाणी त्यांनी महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. विद्यार्थिप्रिय शिक्षक ही त्यांची ओळख असून, ते प्रगत विचारांचा सतत पाठपुरावा करीत राहिले.