शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एसटीला ज्येष्ठ नागरिकांचे वय अजूनही ६५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:16 IST

शासनाकडून ६० वर्ष वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते. मात्र एसटी बसमध्ये तिकिटावरील ५० टक्केसवलत घेण्यासाठी ६५ वयाची अट असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र असूनही त्यांना लाभ मिळत नसल्याने ज्येष्ठांमध्ये काहीशी नाराजी आहे.

एकलहरा : शासनाकडून ६० वर्ष वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते. मात्र एसटी बसमध्ये तिकिटावरील ५० टक्केसवलत घेण्यासाठी ६५ वयाची अट असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र असूनही त्यांना लाभ मिळत नसल्याने ज्येष्ठांमध्ये काहीशी नाराजी आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवासी सवलत मिळविण्यासाठी वयाच्या अटीवरून अनेक मतप्रवाह आहेत. काही वाहक ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत देतात, तर काही वाहक ६५ वर्षांची अट घालतात. याबरोबरच ज्येष्ठ नागरिक म्हणून असलेल्या ओळखपत्राच्या सतत्येबाबतही वाहकांकडून विचारणा होत असल्याने अनेकदा ओळखपत्रामधील वय आणि फोटोतील चेहरा यावरून वयाचा अंदाज लावून प्रवासाची सवलत नाकारली जात असल्याचेही प्रकार घडतात. काही ज्येष्ठ नागरिक ६० वर्ष असल्याने सवलतीसाठी आडून बसतात. शासनाकडून मिळालेल्या ओळखपत्राबाबतही अनेकदा प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतात.एस.टी. बसने प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वय लागते, असे अनेकदा वाहकाकडून सांगितले जाते. एवढेच नाही तर बसस्थानकात विनावाहक-विनाथांबा बससाठी आगाऊ तिकीट बुकिंगसाठीही असाच अनुभव येतो.विधानसभेत यासंदर्भात उपस्थित लक्षवेधी सूचनेवरील उत्तरात त्यांनी यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित केल्याचे सांगितले होते. यामध्ये ज्येष्ठांसाठी सवलतींच्या अनेक विभागांबरोबरच एस.टी. विभागाचाही समावेश आहे, असे असतानाही एस.टी.ने प्रवास करताना ६० ते ६५च्या मधील वयोमर्यादा असणाऱ्या ज्येष्ठांची अजूनही कुचंबणा होते. ज्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिकांची ओळखपत्रे (जी शासनाने निर्गमित केलेली आहेत.) ती दाखविल्यानंतर त्यांना ६५ वर्षे पूर्ण असल्याशिवाय ५० टक्के सवलतीचे तिकीट दिले जात नाही. याबाबत नेमके काय धोरण आहे. ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० वर्षे केल्याचा आदेश अद्याप एस.टी. महामंडळाकडे आला नाही काय? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.गोंधळाची परिस्थिती कायम४ ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक उन्नती, त्ाणतणावातून मुक्त, उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विषेश सहाय्य विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत. सर्व प्रकारच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६५ वरून ६० वर्षे करण्यात आली असल्याची घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी जुलै २०१८ मध्ये केली होती.

टॅग्स :Nashikनाशिक