शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
4
काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
6
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
7
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
8
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
9
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
10
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
11
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
12
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
13
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
14
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
15
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
16
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
17
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
19
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
20
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी

स्वनिर्मितीचा आनंद प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाचा अनुभव रामनगर शाळेत आनंद मेळाव्यानिमित्त कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:24 IST

सायखेडा : स्वनिर्मितीचा आनंद प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाचा अनुभव देत असल्याने शालेय जीवनात विद्यार्थीकेंद्रित अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब केला.

ठळक मुद्देज्ञानाच्या कक्षा रुंदावतातनागरिक शाळेतील बाजारात उपस्थित

सायखेडा : स्वनिर्मितीचा आनंद प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनाचा अनुभव देत असल्याने शालेय जीवनात विद्यार्थीकेंद्रित अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब केला तर मुलांमध्ये सृजनशीलता आणि व्यावहारिक दृष्टिकोन निर्माण होत असतो याचा प्रत्यक्ष अनुभव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आनंद मेळाव्याचे आयोजन करून प्रत्यक्ष आर्थिक व्यवहाराचा अनुभव घेतला.विद्यार्थ्याला पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून घेतलेले आनंददायी शिक्षण मिळाल्यास ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, स्वनिर्मितीचा आनंद मिळतो. विद्यार्थी सामाजिकदृष्ट्या, व्यावहारिकदृष्ट्या परिपूर्ण होतो हा अभिनव उपक्रामद्वारे सकाळी सर्व विद्यार्थी शाळेत घरातील खाद्य पदार्थ, आपल्या शेतात असलेला भाजीपाला, घरात असलेले धान्य घेऊन शाळेत आले. बाजार बसण्यासाठी घरातून पोती, बरदान घेऊन डोक्यावर भाजीपाल्याची घमेली, हातात वजन काट्याची पिशवी, गिºहायकाला सुटे पैसे देण्यासाठी काही पैसे घेऊन मुले १० वाजता शाळेत दाखल झाले. ११ वाजता मुलांनी घरी निरोप दिल्याप्रमाणे घरची माणसे, गावातील पदाधिकारी, नागरिक शाळेतील बाजारात उपस्थित झाले. अचूक रचना आणि मुलांचा उत्साह पाहून ग्रामस्थांनी घरी लागणारा भाजीपाला आणि किराणा वस्तू शालेय आठवडे बाजारात खरेदी केल्या. मुलांनी प्रत्यक्ष व्यवहार केले. पैशाच्या बदल्यात वस्तू देऊन अदान-प्रधान क्रि या अनुभवली. बेरीज, वजाबाकी, नफा-तोटा, असे व्यावहारिक उदाहरणे यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. शाळेच्या उपक्र माचे ग्रामस्थ, सायखेडा केंद्र आणि परिसरातील शिक्षकांनी कौतुक केले. यावेळी शांताराम पवार,सुनील बाविस्कर, नामदेव ठाकूर, संजीव बच्छाव, सुकदेव डोंगरे, सोनाली नाठे, पवार, राजभोज आदी उपस्थित होते. आठवडे बाजार ज्या प्रमाणे भरतो त्याप्रमाणे एका रांगेत भाजीपाला, दुसºया रांगेत फळे, तिसºया रांगेत धान्य, चौथ्या रांगेत किराणा वस्तू, अशी सुबक रचना करून बाजार मांडला.अचूक रचना आणि मुलांचा उत्साह पाहून ग्रामस्थांनी घरी लागणारा भाजीपाला आणि किराणा वस्तू शालेय आठवडे बाजारात खरेदी केल्या.