शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

माझी वसुंधरासाठी १३ ग्रामपंचायतींची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:14 IST

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहामध्ये बुधवारी माझी वसुंधरा अभियानाबाबत निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांची आढावा ...

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहामध्ये बुधवारी माझी वसुंधरा अभियानाबाबत निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामविकास अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना बनसोड यांनी प्रत्येक गावाने पाण्याचा ताळेबंद तयार करणे आवश्यक असल्याचे सांगत नवीन घरांच्या बांधकामांना परवानगी देताना रेन वॉटर हार्वेस्टिंगची अट बंधनकारक करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्लास्टिकचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जेचा वापर, वृक्षांची लागवड आदी घटकांवर त्यांनी माहिती दिली.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनीदेखील याबाबत आढावा घेताना या अभियानासाठी महिला व शालेय मुलांना सहभागी करून घेण्याच्या सूचना देतानाच सार्वजनिक ठिकाण, सार्वजनिक संस्था तसेच घरगुती स्तरावर वृक्षलागवड करण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून घ्यावयाच्या विविध घटकांविषयी माहिती दिली. यावेळी नमामि गोदा फाउंडेशनचे राजेश पंडित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, कार्यकारी अभियंता मंगेश खैरनार आदी उपस्थित होते.

चौकट==

निवड झालेल्या ग्रामपंचायती

माझी वसुंधरा अभियानांतर्गत जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींची शासनाकडून निवड करण्यात आली आहे. यामध्ये नगरसुल, अंदरसूल (ता. येवला); प्रिंप्री सैय्यद, पळसे (ता. नाशिक); उमराणे (ता. देवळा); कसबेसुकेणे, चांदोरी, विंचूर, पिंपळगाव बसवंत (ता. निफाड), नामपूर (ता. बागलाण), कसबेवणी (ता. दिंडोरी), वडनेर भैरव (ता. चांदवड) व दाभाडी (ता. मालेगाव) ग्रामपंचायतींचा समावेश आहे.