शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

बियाण्यांचा जाणवला तुटवडा

By admin | Updated: October 17, 2014 00:09 IST

बियाण्यांचा जाणवला तुटवडा

खामखेडा : चालू वर्षी सुरुवातीला पावसाने ओढ दिले. त्यामुळे खरीप पिकांची उशिरा पेरणी झाली. नंतर मात्र परतीच्या पावसाने खामखेडा परिसरामध्ये हुलवणी दिली आणि ऐन दाणे भरण्याच्या स्थितीत पिके असताना त्यांना पाण्याची गरज भासू लागली आहे. खामखेडा परिसरामध्ये उन्हाळी कांद्याकडे नगदी पिके म्हणून पाहिले जाते.मार्चमध्ये गारपिटीमुळे कांदा बियाणे ढोगळ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे चालू वर्षी उन्हाळी कांदा बियाण्याची उणीव भासू लागली आहे. देवळा-सटाणा, कळवण आदि तालुक्यांमध्ये कांद्याचे बियाणे तयार झाले नाहीत. त्यामुळे शेतकरी उन्हाळी कांद्याच्या बियाणे शोधत होता. औरंगाबाद जिल्ह्यातून काही शेतकऱ्यांनी कांद्याचे बियाणे आणले आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी औरंगाबाद-जालना आदि भागांमध्ये जाऊ लागल्याने सुरुवातीच्या किमतीमध्ये तेथेही वाढ करण्यात आली; परंतु आता काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा बियाणे टाकण्यास सुरुवात केली असता काही शेतकऱ्यांची बियाणे उगवले नाहीत, तर काही शेतकऱ्यांची बियाणे कमी प्रमाणात उगवली. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात क्षेत्र लागवड होणार नाही म्हणून पुन्हा कांदा बियाणाच्या शोधार्थ शेतकरी दिसून येत आहे.काही शेतकरी विविध कंपनीची बियाणे विकत घेत आहेत. परंतु गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षीपेक्षा किमतीमध्ये वाढ झाली आहे. परंतु एवढे करून पुढे कोणत्या प्रतीचा निघेल याची खात्री शेतकऱ्यांना नाही. या कांदा बियाण्याच्या तुटवड्यामुळे उन्हाळी कांद्याच्या क्षेत्रात घट होणार असा अंदाज दिसून येत आहे. (वार्ताहर)