शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

रोपे लागवडीतून करा स्त्रीजन्माचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:13 IST

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींच्या हद्दींमधील गावांमध्ये ज्या शेतकरी कुटुंबाला या दोन वर्षांत कन्यारत्न प्राप्त झाले आहे, अशा शेतकरी कुटुंबांनी स्त्रीजन्माचे स्वागत शेतजमिनीच्या बांधावर दहा रोपांच्या लागवडीने करावे, यासाठी ‘कन्या वनसमृद्धी’ योजना वनमंत्रालयाने सुरू केली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींच्या हद्दींमधील गावांमध्ये ज्या शेतकरी कुटुंबाला या दोन वर्षांत कन्यारत्न प्राप्त झाले आहे, अशा शेतकरी कुटुंबांनी स्त्रीजन्माचे स्वागत शेतजमिनीच्या बांधावर दहा रोपांच्या लागवडीने करावे, यासाठी ‘कन्या वनसमृद्धी’ योजना वनमंत्रालयाने सुरू केली आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून ही योजना राबविली जात असून, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना शेतकरी कुटुंबाने येत्या जूनपूर्वी रितसर अर्ज जमा करावे, असे आवाहन विभागीय वनअधिकारी श्याम रनाळकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाच्छादित करण्यासाठी वनविभागाकडून नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. शासनाने याबाबत अध्यादेश काढला असून ‘कन्या वनसमृद्धी’ योजनेअंतर्गत ज्या शेतकरी कुटुंबाला कन्या रत्न प्राप्त होईल त्या कुटुंबाने त्या कन्येच्या नावाने बांधावर दहा रोपे लावावी. अर्जाचे नमुने सामाजिक वनीकरण विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना उपलब्ध क रून दिले जात आहे. त्या नमुना अर्जात आवश्यक ती माहिती भरून संबंधित कुटुंबाने ग्रामपंचायतीकडे जमा करावे. ग्रामपंचायतींना जवळच्या रोपवाटिकेतून प्रती कुटुंबप्रमाणे दहा रोपे पुरविली जाणार आहे. यामध्ये सागाची पाच तर आंबा-२, फणस, जांभूळ, चिंच प्रत्येकी १ अशी दहा रोपे दिली जाणार असल्याचे रनाळकर म्हणाले. जुलै महिन्यात रोपांची लागवड बांधावर करावी. जूनअखेर रोपांची उपलब्धता ग्रामपंचायतींना केली जाणार असल्याचे ते म्हणाले. २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलींच्या नावाने रोपे लागवड करता येणार आहे.वृक्षलागवडीतून अल्पभूधारकांना १०० टक्के लाभमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना १०० टक्के लाभ मिळवून देणारी रोपे लागवड व संवर्धन योजना राबविण्यात येत आहे. १ जून ते ३० नोव्हेंबर या कालावधीत वृक्षलागवड शेतजमिनीवर किंवा बांधावर करण्याची मुदत आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून प्रती रोपाप्रमाणे तीन वर्षे संगोपन केल्यास ५०७ रुपये तर तसेच प्रतिहेक्टरवर किमान अडीच हजार रोपांची लागवड लाभार्थी करू शकतात. यामध्ये फळझाडांसह सागासारख्या टिंबर वृक्षांच्या प्रजातींचा समावेश असेल. सर्व रोपांचा पुरवठा मोफत केला जाणार आहे.शहराजवळील खेडींचाही समावेशमहापालिका हद्दीतील गंगापूर, आनंदवल्ली, मखमलाबाद, चेहेडी, एकलहरे, पाथर्डी, पिंपळगाव खांब, म्हसरुळ अशा खेडींमधील शेतकरी कुटुंबेदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. शहराजवळ असलेल्या या खेड्यांमध्ये ज्या शेतकरी कुटुंबात मागील वर्षी तसेच चालू वर्षी कन्यारत्न जन्माला आले आहे. त्यांनी थेट नाशिकरोड येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात संपर्क साधून नमूना अर्ज जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Womenमहिलाforestजंगल