शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आत्म्यात परमात्मा पहा

By admin | Updated: July 10, 2016 21:02 IST

आचार्य रत्नसेन सुरीश्वर : चतुर्मास प्रवेश सोहळा उत्साहात

नाशिक : जैन समाजाचा चतुर्मास प्रवेश सोहळा येथील भाविक आराधना भवन येथे रविवारच्या संततधारेत उत्साहात पार पडला. जैन धर्मात आत्म्यात परमात्मा पाहण्याची शिकवण दिली असल्याचे प्रतिपादन मरुधररत्न जैन आचार्य रत्नसेन सुरीश्वर महाराज यांनी याप्रसंगी केले. सुमती सोसायटी कॅनडा कॉर्नर येथून रविवारी सकाळी जैन बांधवांनी मिरवणूक काढली. महावीर सोसायटी, राका कॉलनीमार्गे भाविक आराधना भवन येथे आल्यानंतर चतुर्मास प्रवेश सोहळ्यास प्रारंभ झाला. याप्रसंगी आचार्य रत्नसेन सुरीश्वरजी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पैसा मानसाला सुखी बनवतो, हा भ्रम सर्वांनी मनातून काढला पाहिजे. घरामध्ये देवदर्शन, गुरुदर्शन यापेक्षा ‘दूरदर्शन’ला महत्त्व आल्याने मानवीमूल्यांची पायमल्ली झाल्याचे त्यांनी सांगितले. जीवनात सुख-दु:खाच्या अनेक प्रसंगांनी मन विचलित होते. अशा वेळी आपला आत्माच आपल्याला मार्गदर्शक ठरतो, असे त्यांनी सांगितले. त्यांचे येथे विविध विषयांवर दैनंदिन प्रवचन होणार आहे. याप्रसंगी प्रवीणचंद शाह, हस्तीमल चोपडा, गौतम सुराणा, अनुज शाह, शैलेश शाह, भूपेंद्र शाह, प्रकाश बोथरा, पृथ्वीराज बोरा, बाबूलाल पटवा आदिंसह इंदौर, मुंबई, पुणे, राजस्थानमधील बाली आदि ठिकाणांहून जैनबांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. आर. गर्ग यांनी केले. (प्रतिनिधी)