शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:42 IST

लोहोणेर : नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील चार तालुक्यांचे विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना अर्थात ‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. कारखान्याच्या संरक्षक भिंतींना अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे, तर अनेक ठिकाणी भिंतच पडल्याने कारखान्यातील कोट्यवधींची मालमत्ता धोक्यात आली असून, येथील प्रशासनाने तत्काळ भिंतींची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लोहोणेर : नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील चार तालुक्यांचे विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना अर्थात ‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. कारखान्याच्या संरक्षक भिंतींना अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे, तर अनेक ठिकाणी भिंतच पडल्याने कारखान्यातील कोट्यवधींची मालमत्ता धोक्यात आली असून, येथील प्रशासनाने तत्काळ भिंतींची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.‘वसाका’तील सुरक्षा कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने ते पुरेशा संख्येने कामांवर येत नाहीत. २८ हजार सभासद असलेल्या व ३०० कोटींची स्थावर मालमत्ता असलेल्या वसाकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सन २०१७-२०१८ मध्ये धाराशिव या उद्योग समूहाला महाराष्ट्र राज्य शिखर बॅँकेने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने २५ वर्षांसाठी भाडे कराराने कारखाना चालावयास दिला. सन २०१७-२०१८ मध्ये कामगारांशी करार करण्यावरून वाद निर्माण झाले. त्यामुळे हंगाम संपण्यापूर्वीच कारखाना बंद पडला.वसाका सुरू करण्याची मागणीएकीकडे वसाकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, एक नव्हे तर तबल पाच ते सहा ठिकाणी या भिंतीला भगदाड पडले आहे. सध्या बंदावस्थेत असतानाही वसाका सुरू करण्यासाठी कामगारांच्या वतीने शर्र्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.धाराशिव कारखाना प्रशासनाने लवकर पुढाकार घेऊन कामगार संघटनेशी कामगार उपायुक्त यांच्यासमोर झालेल्या लेखी चर्चेनुसार त्वरित करार करून कारखाना सुरू करण्यासाठी पुढे यावे, अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात येत असल्याची माहिती वसाका कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी दिली आहे.१ गतवर्षी धाराशिवच्या संचालक मंडळाने कारखाना सुरू न केल्याने कामगार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. अशा परिस्थितीत या वर्षी वसाका सुरू होईल या आशेवर शेतकरी, कामगार आस लावून बसले आहेत. वसाकाच्या स्थावर मालमत्तेच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने सहा महिन्यांपूर्वी अवसायकाची नेमणूक केलेली आहे. त्यांच्यावर वसाकाची यंत्रसामग्री सुरक्षित व ‘जैसै थे’ ठेवण्याची जबाबदारी असूनही मालमत्तेचे नुकसान होत आहे.२ सुरक्षा रक्षकांची संख्या मर्यादित असल्या कारणाने व त्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने ते कामांवर येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांना २४ तास सगळीकडे लक्ष देता येत नसल्याने कारखाना कार्यस्थळावरील दक्षिण बाजूला असलेली दगडी संरक्षक भिंत जागोजागी पडली आहे.३ लोखंडी गज व दगडाचा वापर करून बांधण्यात आलेली दगडी भिंत कशी पडली याबाबत शंका व चर्चांना उधाण आले आहे. सन २०११-२०१२मध्ये बांधलेल्या संरक्षक भिंतींसाठी सुमारे दीड ते दोन कोटी रु पये खर्च करण्यात आला होता. मात्र, आता या भिंतींची अवस्था पाहिल्यावर सभासद व कामगारांचा संताप अनावर होत आहे.सहकार क्षेत्रातील संस्थांची आज केविलवाणी अवस्था झाली असून, वसाकाला ऊर्जितावस्था प्राप्त होणे गरजेचे आहे. संरक्षण भिंत पाच ते सहा ठिकाणी भगदाड पडले असून, या प्रकरणी अवसायकांनी लक्ष घालण्याची गरज आहे.- प्रभाकर पाटील,ऊस उत्पादक संघर्ष समिती, वसाकावसाकाच्या भिंतीला भगदाड पडले असून, याप्रकरणी चौकशी करण्यात यावी. वसाका सुरू करण्यासाठी सर्वतोपरी एकत्रित प्रयत्न करण्यात यावेत.- अशोक देवरे,कामगार युनियन अध्यक्ष, वसाकावसाकाच्या संरक्षण भिंतीची अवस्था बिकट आहे. सदरची भिंत पडली नसून पाडल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत योग्य ती चौकशी करण्यात यावी.- कुबेर जाधव,कार्याध्यक्ष वसाका युनियनधाराशिवने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतलेल्या वसाका कारखान्याच्या संरक्षण भिंतीला भगदाड पडले असून, सदर भगदाड त्वरित बुजविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.- अभिजित पाटील,अध्यक्ष, धाराशिव युनिट

टॅग्स :Nashikनाशिक