शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:42 IST

लोहोणेर : नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील चार तालुक्यांचे विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना अर्थात ‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. कारखान्याच्या संरक्षक भिंतींना अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे, तर अनेक ठिकाणी भिंतच पडल्याने कारखान्यातील कोट्यवधींची मालमत्ता धोक्यात आली असून, येथील प्रशासनाने तत्काळ भिंतींची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लोहोणेर : नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील चार तालुक्यांचे विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना अर्थात ‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. कारखान्याच्या संरक्षक भिंतींना अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे, तर अनेक ठिकाणी भिंतच पडल्याने कारखान्यातील कोट्यवधींची मालमत्ता धोक्यात आली असून, येथील प्रशासनाने तत्काळ भिंतींची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.‘वसाका’तील सुरक्षा कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने ते पुरेशा संख्येने कामांवर येत नाहीत. २८ हजार सभासद असलेल्या व ३०० कोटींची स्थावर मालमत्ता असलेल्या वसाकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सन २०१७-२०१८ मध्ये धाराशिव या उद्योग समूहाला महाराष्ट्र राज्य शिखर बॅँकेने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने २५ वर्षांसाठी भाडे कराराने कारखाना चालावयास दिला. सन २०१७-२०१८ मध्ये कामगारांशी करार करण्यावरून वाद निर्माण झाले. त्यामुळे हंगाम संपण्यापूर्वीच कारखाना बंद पडला.वसाका सुरू करण्याची मागणीएकीकडे वसाकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, एक नव्हे तर तबल पाच ते सहा ठिकाणी या भिंतीला भगदाड पडले आहे. सध्या बंदावस्थेत असतानाही वसाका सुरू करण्यासाठी कामगारांच्या वतीने शर्र्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.धाराशिव कारखाना प्रशासनाने लवकर पुढाकार घेऊन कामगार संघटनेशी कामगार उपायुक्त यांच्यासमोर झालेल्या लेखी चर्चेनुसार त्वरित करार करून कारखाना सुरू करण्यासाठी पुढे यावे, अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात येत असल्याची माहिती वसाका कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी दिली आहे.१ गतवर्षी धाराशिवच्या संचालक मंडळाने कारखाना सुरू न केल्याने कामगार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. अशा परिस्थितीत या वर्षी वसाका सुरू होईल या आशेवर शेतकरी, कामगार आस लावून बसले आहेत. वसाकाच्या स्थावर मालमत्तेच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने सहा महिन्यांपूर्वी अवसायकाची नेमणूक केलेली आहे. त्यांच्यावर वसाकाची यंत्रसामग्री सुरक्षित व ‘जैसै थे’ ठेवण्याची जबाबदारी असूनही मालमत्तेचे नुकसान होत आहे.२ सुरक्षा रक्षकांची संख्या मर्यादित असल्या कारणाने व त्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने ते कामांवर येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांना २४ तास सगळीकडे लक्ष देता येत नसल्याने कारखाना कार्यस्थळावरील दक्षिण बाजूला असलेली दगडी संरक्षक भिंत जागोजागी पडली आहे.३ लोखंडी गज व दगडाचा वापर करून बांधण्यात आलेली दगडी भिंत कशी पडली याबाबत शंका व चर्चांना उधाण आले आहे. सन २०११-२०१२मध्ये बांधलेल्या संरक्षक भिंतींसाठी सुमारे दीड ते दोन कोटी रु पये खर्च करण्यात आला होता. मात्र, आता या भिंतींची अवस्था पाहिल्यावर सभासद व कामगारांचा संताप अनावर होत आहे.सहकार क्षेत्रातील संस्थांची आज केविलवाणी अवस्था झाली असून, वसाकाला ऊर्जितावस्था प्राप्त होणे गरजेचे आहे. संरक्षण भिंत पाच ते सहा ठिकाणी भगदाड पडले असून, या प्रकरणी अवसायकांनी लक्ष घालण्याची गरज आहे.- प्रभाकर पाटील,ऊस उत्पादक संघर्ष समिती, वसाकावसाकाच्या भिंतीला भगदाड पडले असून, याप्रकरणी चौकशी करण्यात यावी. वसाका सुरू करण्यासाठी सर्वतोपरी एकत्रित प्रयत्न करण्यात यावेत.- अशोक देवरे,कामगार युनियन अध्यक्ष, वसाकावसाकाच्या संरक्षण भिंतीची अवस्था बिकट आहे. सदरची भिंत पडली नसून पाडल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत योग्य ती चौकशी करण्यात यावी.- कुबेर जाधव,कार्याध्यक्ष वसाका युनियनधाराशिवने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतलेल्या वसाका कारखान्याच्या संरक्षण भिंतीला भगदाड पडले असून, सदर भगदाड त्वरित बुजविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.- अभिजित पाटील,अध्यक्ष, धाराशिव युनिट

टॅग्स :Nashikनाशिक