शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:42 IST

लोहोणेर : नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील चार तालुक्यांचे विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना अर्थात ‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. कारखान्याच्या संरक्षक भिंतींना अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे, तर अनेक ठिकाणी भिंतच पडल्याने कारखान्यातील कोट्यवधींची मालमत्ता धोक्यात आली असून, येथील प्रशासनाने तत्काळ भिंतींची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लोहोणेर : नाशिक जिल्ह्यातील कसमादे परिसरातील चार तालुक्यांचे विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना अर्थात ‘वसाका’ची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. कारखान्याच्या संरक्षक भिंतींना अनेक ठिकाणी भगदाड पडले आहे, तर अनेक ठिकाणी भिंतच पडल्याने कारखान्यातील कोट्यवधींची मालमत्ता धोक्यात आली असून, येथील प्रशासनाने तत्काळ भिंतींची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.‘वसाका’तील सुरक्षा कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने ते पुरेशा संख्येने कामांवर येत नाहीत. २८ हजार सभासद असलेल्या व ३०० कोटींची स्थावर मालमत्ता असलेल्या वसाकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सन २०१७-२०१८ मध्ये धाराशिव या उद्योग समूहाला महाराष्ट्र राज्य शिखर बॅँकेने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने २५ वर्षांसाठी भाडे कराराने कारखाना चालावयास दिला. सन २०१७-२०१८ मध्ये कामगारांशी करार करण्यावरून वाद निर्माण झाले. त्यामुळे हंगाम संपण्यापूर्वीच कारखाना बंद पडला.वसाका सुरू करण्याची मागणीएकीकडे वसाकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, एक नव्हे तर तबल पाच ते सहा ठिकाणी या भिंतीला भगदाड पडले आहे. सध्या बंदावस्थेत असतानाही वसाका सुरू करण्यासाठी कामगारांच्या वतीने शर्र्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.धाराशिव कारखाना प्रशासनाने लवकर पुढाकार घेऊन कामगार संघटनेशी कामगार उपायुक्त यांच्यासमोर झालेल्या लेखी चर्चेनुसार त्वरित करार करून कारखाना सुरू करण्यासाठी पुढे यावे, अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात येत असल्याची माहिती वसाका कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी दिली आहे.१ गतवर्षी धाराशिवच्या संचालक मंडळाने कारखाना सुरू न केल्याने कामगार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. अशा परिस्थितीत या वर्षी वसाका सुरू होईल या आशेवर शेतकरी, कामगार आस लावून बसले आहेत. वसाकाच्या स्थावर मालमत्तेच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने सहा महिन्यांपूर्वी अवसायकाची नेमणूक केलेली आहे. त्यांच्यावर वसाकाची यंत्रसामग्री सुरक्षित व ‘जैसै थे’ ठेवण्याची जबाबदारी असूनही मालमत्तेचे नुकसान होत आहे.२ सुरक्षा रक्षकांची संख्या मर्यादित असल्या कारणाने व त्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने ते कामांवर येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांना २४ तास सगळीकडे लक्ष देता येत नसल्याने कारखाना कार्यस्थळावरील दक्षिण बाजूला असलेली दगडी संरक्षक भिंत जागोजागी पडली आहे.३ लोखंडी गज व दगडाचा वापर करून बांधण्यात आलेली दगडी भिंत कशी पडली याबाबत शंका व चर्चांना उधाण आले आहे. सन २०११-२०१२मध्ये बांधलेल्या संरक्षक भिंतींसाठी सुमारे दीड ते दोन कोटी रु पये खर्च करण्यात आला होता. मात्र, आता या भिंतींची अवस्था पाहिल्यावर सभासद व कामगारांचा संताप अनावर होत आहे.सहकार क्षेत्रातील संस्थांची आज केविलवाणी अवस्था झाली असून, वसाकाला ऊर्जितावस्था प्राप्त होणे गरजेचे आहे. संरक्षण भिंत पाच ते सहा ठिकाणी भगदाड पडले असून, या प्रकरणी अवसायकांनी लक्ष घालण्याची गरज आहे.- प्रभाकर पाटील,ऊस उत्पादक संघर्ष समिती, वसाकावसाकाच्या भिंतीला भगदाड पडले असून, याप्रकरणी चौकशी करण्यात यावी. वसाका सुरू करण्यासाठी सर्वतोपरी एकत्रित प्रयत्न करण्यात यावेत.- अशोक देवरे,कामगार युनियन अध्यक्ष, वसाकावसाकाच्या संरक्षण भिंतीची अवस्था बिकट आहे. सदरची भिंत पडली नसून पाडल्याचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत योग्य ती चौकशी करण्यात यावी.- कुबेर जाधव,कार्याध्यक्ष वसाका युनियनधाराशिवने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतलेल्या वसाका कारखान्याच्या संरक्षण भिंतीला भगदाड पडले असून, सदर भगदाड त्वरित बुजविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.- अभिजित पाटील,अध्यक्ष, धाराशिव युनिट

टॅग्स :Nashikनाशिक