शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

वेतन होत नसल्याने सुरक्षा कर्मचारी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 23:30 IST

गेल्या अकरा महिन्यांपासून कामगार व व्यवस्थापन मंडळ यांच्यातील अंतर्गत वादामुळे बंद असलेल्या वसाका कारखान्याची सुमारे चारशे कोटींची मालमत्ता सांभाळणाऱ्या पंधरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून भाडेकरू संस्था धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थपनेकडून वेतन मिळाले नसल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देलोहोणेर : भाडेकरू संस्था धाराशिव व्यवस्थापनेविरुद्ध तक्रार

लोहोणेर : गेल्या अकरा महिन्यांपासून कामगार व व्यवस्थापन मंडळ यांच्यातील अंतर्गत वादामुळे बंद असलेल्या वसाका कारखान्याचीसुमारे चारशे कोटींची मालमत्ता सांभाळणाऱ्या पंधरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून भाडेकरू संस्था धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थपनेकडून वेतन मिळाले नसल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.यासंदर्भात एमएससी बँक, कामगार आयुक्त, सहकार सचिव, प्रांताधिकारी, धाराशिव कारखाना व्यवस्थापन मंडळ यांना निवेदनदेऊनही दखल न घेतल्याने या कर्मचाºयांनी संताप व्यक्त केला आहे. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा डीव्हीपी ग्रुपच्या धाराशिव कारखान्यास सुमारे २५ वर्षांसाठी भाड्याने दिला आहे. येथील कर्मचारी व कारखान्याची करोडो रु पयांची मालमत्ता बेवारस सोडण्यात आली आहे. सदरची मालमत्ता येथील सुरक्षा रक्षक कमी संख्या असतानाही डोळ्यात तेल घालून रात्र - दिवस सांभाळत आहेत.भाडेकरू संस्थेने पाठ फिरवली. आता या कारखान्याची सर्वस्वी जबाबदारी एमएससी बँकेकडे आहे. मात्र बँकेच्या संबंधित अधिकारी वर्गाने या कारखान्याकडे व संबंधित कर्मचाºयांच्या मागण्यांकडे डोळेझाक केली आहे. यामुळे या कर्मचाºयांचे सुमारे सात महिन्यांचे पगार थकले असून, सदर कर्मचाºयांचे संसार उघड्यावर पडल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.या संदर्भात संबंधित सुरक्षा कर्मचाºयांनी एमएससी बँक, कामगार आयुक्त, सहकार सचिव, प्रांताधिकारी धाराशिव कारखाना व्यवस्थापनमंडळ यांना निवेदन देऊन वेतनाची मागणी केली आहे. निवेदनावर शांताराम सूर्यवंशी, नंदलाल सोनवणे, सुनील गुंजाळ, शंकर पाटील, विनायक जाधव, मधुकर आहिरे, अण्णासाहेब कवडे, शांताराम पूरकर, देवीदास पवार, बापू आहेर, साहेबराव पाटील, नरेंद्र पवार, दिनेश ठाकरे, विशाल निकम, राहुल देवरे, गफूर तांबोळी आदींच्या स्वाक्षºया आहेत.कामगार संघटना-व्यवस्थापन मंडळात वादभाडेकरू संस्थेने सन २०१८-१९ चा गळीत हंगाम सुरू केला, मात्र सदरचा हंगाम हा २२ जानेवारी रोजी कामगार संघटना व भाडेकरू संस्था व्यवस्थापन मंडळ यांच्या अंतर्गत वादामुळे बंद पडला. तेव्हापासून ते आतापर्यंत सुमारे बारा महिन्यांच्या कालावधीत सुमारे चारशे करोड रु पयांची ही मालमत्ता येथील सुरक्षा रक्षक इमाने इतबारे सांभाळत आहेत. संप काळात या कर्मचाºयांना साखर व मोलेसेस विकून काही प्रमाणात पगार देण्यात आला. मात्र गेल्या सात महिन्यांपासून या बंद असलेल्या कारखान्याकडे भाडेकरू संस्था अथवा मालकी हक्क असलेल्या एमएससी बँकेच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने