शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वेतन होत नसल्याने सुरक्षा कर्मचारी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 23:30 IST

गेल्या अकरा महिन्यांपासून कामगार व व्यवस्थापन मंडळ यांच्यातील अंतर्गत वादामुळे बंद असलेल्या वसाका कारखान्याची सुमारे चारशे कोटींची मालमत्ता सांभाळणाऱ्या पंधरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून भाडेकरू संस्था धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थपनेकडून वेतन मिळाले नसल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देलोहोणेर : भाडेकरू संस्था धाराशिव व्यवस्थापनेविरुद्ध तक्रार

लोहोणेर : गेल्या अकरा महिन्यांपासून कामगार व व्यवस्थापन मंडळ यांच्यातील अंतर्गत वादामुळे बंद असलेल्या वसाका कारखान्याचीसुमारे चारशे कोटींची मालमत्ता सांभाळणाऱ्या पंधरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून भाडेकरू संस्था धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थपनेकडून वेतन मिळाले नसल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.यासंदर्भात एमएससी बँक, कामगार आयुक्त, सहकार सचिव, प्रांताधिकारी, धाराशिव कारखाना व्यवस्थापन मंडळ यांना निवेदनदेऊनही दखल न घेतल्याने या कर्मचाºयांनी संताप व्यक्त केला आहे. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा डीव्हीपी ग्रुपच्या धाराशिव कारखान्यास सुमारे २५ वर्षांसाठी भाड्याने दिला आहे. येथील कर्मचारी व कारखान्याची करोडो रु पयांची मालमत्ता बेवारस सोडण्यात आली आहे. सदरची मालमत्ता येथील सुरक्षा रक्षक कमी संख्या असतानाही डोळ्यात तेल घालून रात्र - दिवस सांभाळत आहेत.भाडेकरू संस्थेने पाठ फिरवली. आता या कारखान्याची सर्वस्वी जबाबदारी एमएससी बँकेकडे आहे. मात्र बँकेच्या संबंधित अधिकारी वर्गाने या कारखान्याकडे व संबंधित कर्मचाºयांच्या मागण्यांकडे डोळेझाक केली आहे. यामुळे या कर्मचाºयांचे सुमारे सात महिन्यांचे पगार थकले असून, सदर कर्मचाºयांचे संसार उघड्यावर पडल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.या संदर्भात संबंधित सुरक्षा कर्मचाºयांनी एमएससी बँक, कामगार आयुक्त, सहकार सचिव, प्रांताधिकारी धाराशिव कारखाना व्यवस्थापनमंडळ यांना निवेदन देऊन वेतनाची मागणी केली आहे. निवेदनावर शांताराम सूर्यवंशी, नंदलाल सोनवणे, सुनील गुंजाळ, शंकर पाटील, विनायक जाधव, मधुकर आहिरे, अण्णासाहेब कवडे, शांताराम पूरकर, देवीदास पवार, बापू आहेर, साहेबराव पाटील, नरेंद्र पवार, दिनेश ठाकरे, विशाल निकम, राहुल देवरे, गफूर तांबोळी आदींच्या स्वाक्षºया आहेत.कामगार संघटना-व्यवस्थापन मंडळात वादभाडेकरू संस्थेने सन २०१८-१९ चा गळीत हंगाम सुरू केला, मात्र सदरचा हंगाम हा २२ जानेवारी रोजी कामगार संघटना व भाडेकरू संस्था व्यवस्थापन मंडळ यांच्या अंतर्गत वादामुळे बंद पडला. तेव्हापासून ते आतापर्यंत सुमारे बारा महिन्यांच्या कालावधीत सुमारे चारशे करोड रु पयांची ही मालमत्ता येथील सुरक्षा रक्षक इमाने इतबारे सांभाळत आहेत. संप काळात या कर्मचाºयांना साखर व मोलेसेस विकून काही प्रमाणात पगार देण्यात आला. मात्र गेल्या सात महिन्यांपासून या बंद असलेल्या कारखान्याकडे भाडेकरू संस्था अथवा मालकी हक्क असलेल्या एमएससी बँकेच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने