शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

‘कश्यपी’ची सुरक्षितता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:26 IST

नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरण परिसर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, अतिउत्साही व मद्यपीच्या टोळ्यांच्या वावरामुळे परिसरात अनेक दुर्घटना कायम घडू लागल्या आहेत. धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लावण्यात आलेले तसेच धरणाच्या पाणी क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करणारे मार्गदर्शक फलकाची टवाळखोरांनी नासधूस केली आहे.

ठळक मुद्देटवाळखोरांचा उपद्रव । मार्गदर्शक फलकाची नासधूस; कारवाईची मागणी

गंगापूर : नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरण परिसर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, अतिउत्साही व मद्यपीच्या टोळ्यांच्या वावरामुळे परिसरात अनेक दुर्घटना कायम घडू लागल्या आहेत. धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लावण्यात आलेले तसेच धरणाच्या पाणी क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करणारे मार्गदर्शक फलकाची टवाळखोरांनी नासधूस केली आहे. टवाळखोरांच्या या वाढत्या उपद्रवाकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असून, त्यामुळे नसल्याने परिसरातील हॉटेलचालकांनी धरणाच्या परिसरात शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे.नाशिक तालुक्यातील पश्चिम भागात बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणावर कायमच शहरी पर्यटकांची गर्दी असते. डोंगरी भागात निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या कश्यपी धरणाच्या परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. मांसाहार व ताजे मासे व हौशी पर्यटकांसाठी मिळतात, त्यामुळे निवांत रम्य परिसर म्हणून मौजेसाठी अनेकजण याठिकाणी येतात. मात्र या भागात उत्साही व टवाळखोरांचा मुक्तवावर असल्याने हा परिसर अतिशय धोकेदायक व संवेदनशील बनला आहे. धरणांचा परिसर कचरामुक्त असायला हवा, मात्र पर्यटकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर व दारूच्या बाटल्यांचा खच कायम आढळतो. सध्या धरणाला भरपूर पाणी असून, अनेक अतिउत्साही तरुण पाण्याचा अंदाज न बांधता उड्या घेतात त्यातून दुर्घटना घडल्या आहेत. तर महिला, तरुणींच्या छेडछाडीचे प्रकारही या ठिकाणी घडू लागल्याने या भागात आता एकटे दुकटे फिरणे धोकेदायक बनले आहेत.पर्यटकांच्या जिवाची काळजी व धरणाची सुरक्षितता लक्षात घेता, धरण परिसरात धोकेदायक ठिकाणी प्रतिबंध करणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र टवाळखोरांकडून या फलकांची मोडतोड करण्यात आली आहे.या भागातील पर्यटकांची वाढती संख्या व सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांची कायमस्वरूपी गस्त असावी, अशी मागणी धोंडेगाव व कश्यपीनगरच्या नागरिकांनी केली आहे.दुर्घटनेची शक्यताधरणांचा परिसर कचरामुक्त असायला हवा, मात्र पर्यटकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर व दारूच्या बाटल्यांचा खच कायम आढळतो. सध्या धरणाला भरपूर पाणी असून, अनेक अतिउत्साही तरुण पाण्याचा अंदाज न बांधता उड्या घेतात त्यातून दुर्घटना घडल्या आहेत. तर महिला, तरुणींच्या छेडछाडीचे प्रकारही या ठिकाणी घडू लागल्याने या भागात आता एकटे दुकटे फिरणे धोकेदायक बनले आहेत.कश्यपी धरणावर येणाºया पर्यटकांचा प्रकल्पग्रस्तांना काही फायदा नाही. धरणासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. अशात या भागात वाढते पर्यटन व टवाळखोरांचा नेहमीच्या उच्छादामुळे धरणांचे फलकही असुरक्षित आहेत. त्यामुळे या भागात कायम पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. यासंदर्भात आम्ही प्रशासनाला पत्रही दिले आहे.- सोमनाथ बेंडकोळी, धोंडेगाव

टॅग्स :Damधरण