शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘कश्यपी’ची सुरक्षितता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:26 IST

नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरण परिसर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, अतिउत्साही व मद्यपीच्या टोळ्यांच्या वावरामुळे परिसरात अनेक दुर्घटना कायम घडू लागल्या आहेत. धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लावण्यात आलेले तसेच धरणाच्या पाणी क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करणारे मार्गदर्शक फलकाची टवाळखोरांनी नासधूस केली आहे.

ठळक मुद्देटवाळखोरांचा उपद्रव । मार्गदर्शक फलकाची नासधूस; कारवाईची मागणी

गंगापूर : नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरण परिसर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, अतिउत्साही व मद्यपीच्या टोळ्यांच्या वावरामुळे परिसरात अनेक दुर्घटना कायम घडू लागल्या आहेत. धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लावण्यात आलेले तसेच धरणाच्या पाणी क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करणारे मार्गदर्शक फलकाची टवाळखोरांनी नासधूस केली आहे. टवाळखोरांच्या या वाढत्या उपद्रवाकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असून, त्यामुळे नसल्याने परिसरातील हॉटेलचालकांनी धरणाच्या परिसरात शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे.नाशिक तालुक्यातील पश्चिम भागात बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणावर कायमच शहरी पर्यटकांची गर्दी असते. डोंगरी भागात निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या कश्यपी धरणाच्या परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. मांसाहार व ताजे मासे व हौशी पर्यटकांसाठी मिळतात, त्यामुळे निवांत रम्य परिसर म्हणून मौजेसाठी अनेकजण याठिकाणी येतात. मात्र या भागात उत्साही व टवाळखोरांचा मुक्तवावर असल्याने हा परिसर अतिशय धोकेदायक व संवेदनशील बनला आहे. धरणांचा परिसर कचरामुक्त असायला हवा, मात्र पर्यटकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर व दारूच्या बाटल्यांचा खच कायम आढळतो. सध्या धरणाला भरपूर पाणी असून, अनेक अतिउत्साही तरुण पाण्याचा अंदाज न बांधता उड्या घेतात त्यातून दुर्घटना घडल्या आहेत. तर महिला, तरुणींच्या छेडछाडीचे प्रकारही या ठिकाणी घडू लागल्याने या भागात आता एकटे दुकटे फिरणे धोकेदायक बनले आहेत.पर्यटकांच्या जिवाची काळजी व धरणाची सुरक्षितता लक्षात घेता, धरण परिसरात धोकेदायक ठिकाणी प्रतिबंध करणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र टवाळखोरांकडून या फलकांची मोडतोड करण्यात आली आहे.या भागातील पर्यटकांची वाढती संख्या व सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांची कायमस्वरूपी गस्त असावी, अशी मागणी धोंडेगाव व कश्यपीनगरच्या नागरिकांनी केली आहे.दुर्घटनेची शक्यताधरणांचा परिसर कचरामुक्त असायला हवा, मात्र पर्यटकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर व दारूच्या बाटल्यांचा खच कायम आढळतो. सध्या धरणाला भरपूर पाणी असून, अनेक अतिउत्साही तरुण पाण्याचा अंदाज न बांधता उड्या घेतात त्यातून दुर्घटना घडल्या आहेत. तर महिला, तरुणींच्या छेडछाडीचे प्रकारही या ठिकाणी घडू लागल्याने या भागात आता एकटे दुकटे फिरणे धोकेदायक बनले आहेत.कश्यपी धरणावर येणाºया पर्यटकांचा प्रकल्पग्रस्तांना काही फायदा नाही. धरणासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. अशात या भागात वाढते पर्यटन व टवाळखोरांचा नेहमीच्या उच्छादामुळे धरणांचे फलकही असुरक्षित आहेत. त्यामुळे या भागात कायम पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. यासंदर्भात आम्ही प्रशासनाला पत्रही दिले आहे.- सोमनाथ बेंडकोळी, धोंडेगाव

टॅग्स :Damधरण