शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

‘कश्यपी’ची सुरक्षितता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:26 IST

नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरण परिसर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, अतिउत्साही व मद्यपीच्या टोळ्यांच्या वावरामुळे परिसरात अनेक दुर्घटना कायम घडू लागल्या आहेत. धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लावण्यात आलेले तसेच धरणाच्या पाणी क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करणारे मार्गदर्शक फलकाची टवाळखोरांनी नासधूस केली आहे.

ठळक मुद्देटवाळखोरांचा उपद्रव । मार्गदर्शक फलकाची नासधूस; कारवाईची मागणी

गंगापूर : नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरण परिसर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, अतिउत्साही व मद्यपीच्या टोळ्यांच्या वावरामुळे परिसरात अनेक दुर्घटना कायम घडू लागल्या आहेत. धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लावण्यात आलेले तसेच धरणाच्या पाणी क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करणारे मार्गदर्शक फलकाची टवाळखोरांनी नासधूस केली आहे. टवाळखोरांच्या या वाढत्या उपद्रवाकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असून, त्यामुळे नसल्याने परिसरातील हॉटेलचालकांनी धरणाच्या परिसरात शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे.नाशिक तालुक्यातील पश्चिम भागात बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणावर कायमच शहरी पर्यटकांची गर्दी असते. डोंगरी भागात निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या कश्यपी धरणाच्या परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. मांसाहार व ताजे मासे व हौशी पर्यटकांसाठी मिळतात, त्यामुळे निवांत रम्य परिसर म्हणून मौजेसाठी अनेकजण याठिकाणी येतात. मात्र या भागात उत्साही व टवाळखोरांचा मुक्तवावर असल्याने हा परिसर अतिशय धोकेदायक व संवेदनशील बनला आहे. धरणांचा परिसर कचरामुक्त असायला हवा, मात्र पर्यटकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर व दारूच्या बाटल्यांचा खच कायम आढळतो. सध्या धरणाला भरपूर पाणी असून, अनेक अतिउत्साही तरुण पाण्याचा अंदाज न बांधता उड्या घेतात त्यातून दुर्घटना घडल्या आहेत. तर महिला, तरुणींच्या छेडछाडीचे प्रकारही या ठिकाणी घडू लागल्याने या भागात आता एकटे दुकटे फिरणे धोकेदायक बनले आहेत.पर्यटकांच्या जिवाची काळजी व धरणाची सुरक्षितता लक्षात घेता, धरण परिसरात धोकेदायक ठिकाणी प्रतिबंध करणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र टवाळखोरांकडून या फलकांची मोडतोड करण्यात आली आहे.या भागातील पर्यटकांची वाढती संख्या व सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांची कायमस्वरूपी गस्त असावी, अशी मागणी धोंडेगाव व कश्यपीनगरच्या नागरिकांनी केली आहे.दुर्घटनेची शक्यताधरणांचा परिसर कचरामुक्त असायला हवा, मात्र पर्यटकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर व दारूच्या बाटल्यांचा खच कायम आढळतो. सध्या धरणाला भरपूर पाणी असून, अनेक अतिउत्साही तरुण पाण्याचा अंदाज न बांधता उड्या घेतात त्यातून दुर्घटना घडल्या आहेत. तर महिला, तरुणींच्या छेडछाडीचे प्रकारही या ठिकाणी घडू लागल्याने या भागात आता एकटे दुकटे फिरणे धोकेदायक बनले आहेत.कश्यपी धरणावर येणाºया पर्यटकांचा प्रकल्पग्रस्तांना काही फायदा नाही. धरणासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. अशात या भागात वाढते पर्यटन व टवाळखोरांचा नेहमीच्या उच्छादामुळे धरणांचे फलकही असुरक्षित आहेत. त्यामुळे या भागात कायम पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. यासंदर्भात आम्ही प्रशासनाला पत्रही दिले आहे.- सोमनाथ बेंडकोळी, धोंडेगाव

टॅग्स :Damधरण