शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

कळवण तालुक्याला द्वितीय क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:07 IST

पंचायतराज संस्थामध्ये प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कळवण तालुक्याला विभागस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.

ठळक मुद्देपंचायतराज : उत्कृष्ट व्यवस्थापन आणि विकासाचा गौरव

नाशिक : पंचायतराज संस्थामध्ये प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कळवण तालुक्याला विभागस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. त्याचप्रमाणे मानव संपदामधील उत्कृष्ट काम केल्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी तसेच निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.पंचायतराज संस्थांमध्ये प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाºया जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत पुरस्कार देण्यात येतो. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्याला विभागस्तरावरील द्वितीय क्र मांकाचा पुरस्कार देण्यात आला.या सोहळ्यास ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता उपस्थित होते. राज्यातील पंचायत राज संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी २००५-२००६ पासून यशवंत पंचायत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे. हे पुरस्कार राज्य व विभागीय स्तरावर जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीला दिले जातात. सोबतच गुणवंत कर्मचाºयांनासुद्धा पुरस्कृत करण्यात येते.कळवण तालुक्याला विभागस्तरावरील द्वितीय क्र मांकाचा पुरस्कार करण्यात आला. कळवण पंचायत समितीचे सभापती लालजी जाधव, गटविकास अधिकारी डोंगर बहिरम, उपसभापती विजय शिरसाठ, सहायक गटविकास अधिकारीएस. एस. जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला.मानव संपदेच्या कामामुळे जिल्ह्याचा सन्मानआस्थापना विषयक सर्व बाबी भरण्यासाठी मानव संपदा प्रणाली वापरण्यात येत आहे. शासनाने प्रायोगिक तत्त्वावर यासाठी नागपूर जिल्ह्याची निवड केली होती; मात्र तेथे सदरचे काम पूर्ण झाले नाही. डॉ. गिते यांनी शासनाकडे पाठपुरावा करून नाशिक जिल्हा यामध्ये घ्यावा यासाठी पुढाकार घेतला. शासनाने मे महिन्यात मंजुरी दिल्यानंतर जुलै महिन्यातच जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे १७ हजारांच्या वर सेवापुस्तक आॅनलाइन करण्यात आले. यामध्ये रजा, विविध प्रकारचे लाभ आदी आस्थापनाविषयक बाबींची माहिती भरण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. मानव संपदात नाशिक जिल्हा राज्यात प्रथम क्र मांकावर आहे.

टॅग्स :Governmentसरकारpanchayat samitiपंचायत समिती