शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

अकरावीसाठी आज दुसरी यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:29 IST

नाशिकसह राज्यभरातील प्रमुख शहरांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (दि. २२) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २३ ते २५ जुलैदरम्यान प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

नाशिक : नाशिकसह राज्यभरातील प्रमुख शहरांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (दि. २२) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २३ ते २५ जुलैदरम्यान प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. दुसऱ्या यादीचा कटआॅफ तीन ते चार टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता आहे. दुसºया यादीत प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना विहीत मुदतीत प्रवेश घेणे अनिवार्य असेल.पहिल्या यादीत निवड झालेल्या १५ हजार विद्यार्र्थ्यांपैकी केवळ ८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला. त्यामुळे पहिल्या यादीनंतरचे सात हजार आणि उर्वरित दहा हजार अशा एकूण १७ हजारांहून अधिक विद्यार्थी दुसºया गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्या यादीप्रमाणेच विज्ञान आणि वाणिज्य या दोन्ही शाखांसाठी शहरातील प्रमुख महाविद्यालयांतील कटआॅफ हा जास्त राहण्याची शक्यता आहे. तर उर्वरित महाविद्यालयांत मात्र कटआॅफ खाली येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचे लक्ष दुसºया यादीकडे लागले आहे. पहिल्या यादीत १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील केवळ ८ हजार १७१ विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.पहिली गुणवत्ता यादीत प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या ९ हजार २२ विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य होते. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी मंगळवार (दि. १६) पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत विहीत मुदतीत प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली आहे. प्रथम पसंतीक्रम मिळूनही एक हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे प्रवेश पुढील तीन नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित (ब्लॉक) करण्यात आले आहे. त्यांचा प्रवेश अर्जाचा क्रमांक व दहावीचा सीट क्रमांक ब्लॉक होतील.१५ हजार जागा उपलब्धनाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या २३ हजार ८६० जागा उपलब्ध आहेत. पहिल्या यादीत कला शाखेतील २ हजार ५६३, वाणिज्य शाखेच्या ५ हजार ६२९, तर विज्ञान शाखेच्या ६ हजार ३९६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, दुसºया ते दहाव्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम पसंतीच्या महाविद्यालयासाठी थांबण्याची भूमिका घेतली आहे, त्यांना दुसºया गुणवत्ता यादीची प्रतीक्षा लागलेली आहे. आता १५ हजार जागा उपलब्ध आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी