शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

By admin | Updated: December 24, 2016 21:07 IST

भूकंपाचे केंद्रबिंदू असलेलया पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव ,डोल्हार माळ परिसरात पहाटेच्या वेळी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकामध्ये एकच धावपळ झाली.

ऑनलाइन लोकमत 

पेठ, दि. 24- भूकंपाचे केंद्रबिंदू असलेलया  पेठ तालुक्यातील गोंदे,  भायगाव ,डोल्हार माळ परिसरात पहाटेच्या वेळी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकामध्ये एकच धावपळ झाली. शनिवारी पहाटे 2 ते 4वाजे दरम्यान  या परिसरात जामिन हादरल्याचे जाणवले.4ते 5 वेळा भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 
 
या गावातीत घरांच्या कडया वाजल्या तसेच भांडी पडली या प्रकाराने परिसरातील गाव वस्त्यावरील नागरिक घराबाहेर पडले.  धक्का सौम्य असल्याने कुठल्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तीय हानी झाली नाही. या बाबतची खबर पोलीस पाटील यांनी तहसिल प्रशासनास दिल्याने ग्रामसेवक व मंडळ अधिकारी दळवी यांनी घटना स्थळी जाऊन परिस्थीतीची पाहाणी केली.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले. भुकंपाचा धक्का सौम्य असल्याने त्याची नोंद मेरीच्या भुकंपमापन यंत्रावर झाली नसल्याचे सांगण्यात आले.
 
भूकंपमापक यंत्र प्रतिक्षेतच
पेठ तालुक्याच्या गोंदे व भायगांव परिसरात गतवीस वर्षापासून वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्याने या भागात भूकंपमापक यंत्र बसवण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र शासनदरबारी अद्यापही ही मागणी प्रतिक्षेत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.