शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

आत्मानंदासाठी धडपडणाऱ्या माणसांसाठी वारी हा एक शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 01:16 IST

सुमारे सातशे वर्षे झालीत. कोणतीही आमंत्रणं न देता अव्याहतपणे प्रत्येक ज्येष्ठ वद्य अष्टमीस पंढरपूरची वारी करण्याकरिता वारकरी मोठ्या संख्येने आळंदीला जमत असतात. प्रचंड उत्साहाने लाखो वारकºयांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी संपन्न होतो. दिंड्या, पताका, टाळमृदंगाच्या गजरात शेकडो वारकरी पायी ही वारी करतात.

प्रा़ डॉ. कमल अहेर - कुवरसुमारे सातशे वर्षे झालीत. कोणतीही आमंत्रणं न देता अव्याहतपणे प्रत्येक ज्येष्ठ वद्य अष्टमीस पंढरपूरची वारी करण्याकरिता वारकरी मोठ्या संख्येने आळंदीला जमत असतात. प्रचंड उत्साहाने लाखो वारकºयांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी संपन्न होतो. दिंड्या, पताका, टाळमृदंगाच्या गजरात शेकडो वारकरी पायी ही वारी करतात. त्यात वयाच्या ओझ्याने वाकलेला, काठी टेकत चालणारा भक्त असतो. तेलमीठ-पीठाचे ओझे डोक्यावर, कडेवर लहान मूल घेऊन चालणारी कष्टकरी स्त्री असते. भोळे भाबडे भक्त असतात. तत्त्वज्ञ असतात. विचारवंत असतात. समाजशास्त्रज्ञहीअसतात.वारकरी संप्रदाय हे उदार, चिंतनशील, संस्कारजन्य भक्तांना सामावून घेणारे उपासनापीठ आहे. धार्मिक प्रबोधनाच्या प्रेरणेतून तो जन्माला आला. ज्ञानेश्वर, तुकाराम इ. संतांचे कार्य केवळ सांप्रदायिक स्वरूपाचे नसून ती एक व्यापक चळवळ होती.पंढरपूरचा पांडुरंग हे त्यांचे उपास्यदैवत. प्रत्येक वारकºयाच्या मनामध्ये असणारी विठ्ठलभेटीची आस वारीतून पूर्ण होते. यात सर्व जातिधर्माचे, पंथाचे स्त्री-पुरुष असतात. जन्मसिद्ध अधिकार, उच्चनीचतेला यात थारा नसतो.आत्मसंस्कार, आत्मानंद, आत्मशोध यासाठी धडपडणाºया माणसासाठी वारी हा एक शोध आहे. कोणत्याही प्रकारच्या अभिमानाला येथे जागा नाही. सर्व प्रकारच्या उपाधी झुगारून ईश्वरापुढे एक माणूस म्हणून नम्र होणे येथे आहे.स्वार्थांधता, जीवघेणी स्पर्धा, कुटुंबसंस्थेचे विघटन, शहरांचे बकालपण, हिंस्रता, सर्वांना वेढून टाकणारा एकाकीपणा या गोष्टी आधुनिक काळात दर दिवशी वाढत आहेत.बौद्धिक विकास झाला; परंतु नैतिकता उंचावली गेली नाही. उलट अलीकडच्या काळात ती क्षीण क्षीण होताना दिसत आहे.‘जे जे भेटे भूत,ते ते मानिजे भगवंत’म्हणून आपली विचारांची कक्षा व्यापक करणारा, निसर्गाचे सान्निध्य लाभल्यामुळे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’चा अनुभव साक्षात करणारा वारी हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. मराठी भाषा, साहित्य-संस्कृती याविषयी स्वत्वाची भावना निर्माण करून सामाजिक सामरस्याची भावना त्यामुळे जागवली जाते. वारकºयाचा भक्तिभावनेने ओथंबलेल्या मनाचा हा अंत:स्तरावरचा प्रवास मला महत्त्वाचा वाटतो.(लेखक संत साहित्याच्या अभ्यासक)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम