शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आत्मानंदासाठी धडपडणाऱ्या माणसांसाठी वारी हा एक शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 01:16 IST

सुमारे सातशे वर्षे झालीत. कोणतीही आमंत्रणं न देता अव्याहतपणे प्रत्येक ज्येष्ठ वद्य अष्टमीस पंढरपूरची वारी करण्याकरिता वारकरी मोठ्या संख्येने आळंदीला जमत असतात. प्रचंड उत्साहाने लाखो वारकºयांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी संपन्न होतो. दिंड्या, पताका, टाळमृदंगाच्या गजरात शेकडो वारकरी पायी ही वारी करतात.

प्रा़ डॉ. कमल अहेर - कुवरसुमारे सातशे वर्षे झालीत. कोणतीही आमंत्रणं न देता अव्याहतपणे प्रत्येक ज्येष्ठ वद्य अष्टमीस पंढरपूरची वारी करण्याकरिता वारकरी मोठ्या संख्येने आळंदीला जमत असतात. प्रचंड उत्साहाने लाखो वारकºयांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी संपन्न होतो. दिंड्या, पताका, टाळमृदंगाच्या गजरात शेकडो वारकरी पायी ही वारी करतात. त्यात वयाच्या ओझ्याने वाकलेला, काठी टेकत चालणारा भक्त असतो. तेलमीठ-पीठाचे ओझे डोक्यावर, कडेवर लहान मूल घेऊन चालणारी कष्टकरी स्त्री असते. भोळे भाबडे भक्त असतात. तत्त्वज्ञ असतात. विचारवंत असतात. समाजशास्त्रज्ञहीअसतात.वारकरी संप्रदाय हे उदार, चिंतनशील, संस्कारजन्य भक्तांना सामावून घेणारे उपासनापीठ आहे. धार्मिक प्रबोधनाच्या प्रेरणेतून तो जन्माला आला. ज्ञानेश्वर, तुकाराम इ. संतांचे कार्य केवळ सांप्रदायिक स्वरूपाचे नसून ती एक व्यापक चळवळ होती.पंढरपूरचा पांडुरंग हे त्यांचे उपास्यदैवत. प्रत्येक वारकºयाच्या मनामध्ये असणारी विठ्ठलभेटीची आस वारीतून पूर्ण होते. यात सर्व जातिधर्माचे, पंथाचे स्त्री-पुरुष असतात. जन्मसिद्ध अधिकार, उच्चनीचतेला यात थारा नसतो.आत्मसंस्कार, आत्मानंद, आत्मशोध यासाठी धडपडणाºया माणसासाठी वारी हा एक शोध आहे. कोणत्याही प्रकारच्या अभिमानाला येथे जागा नाही. सर्व प्रकारच्या उपाधी झुगारून ईश्वरापुढे एक माणूस म्हणून नम्र होणे येथे आहे.स्वार्थांधता, जीवघेणी स्पर्धा, कुटुंबसंस्थेचे विघटन, शहरांचे बकालपण, हिंस्रता, सर्वांना वेढून टाकणारा एकाकीपणा या गोष्टी आधुनिक काळात दर दिवशी वाढत आहेत.बौद्धिक विकास झाला; परंतु नैतिकता उंचावली गेली नाही. उलट अलीकडच्या काळात ती क्षीण क्षीण होताना दिसत आहे.‘जे जे भेटे भूत,ते ते मानिजे भगवंत’म्हणून आपली विचारांची कक्षा व्यापक करणारा, निसर्गाचे सान्निध्य लाभल्यामुळे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’चा अनुभव साक्षात करणारा वारी हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. मराठी भाषा, साहित्य-संस्कृती याविषयी स्वत्वाची भावना निर्माण करून सामाजिक सामरस्याची भावना त्यामुळे जागवली जाते. वारकºयाचा भक्तिभावनेने ओथंबलेल्या मनाचा हा अंत:स्तरावरचा प्रवास मला महत्त्वाचा वाटतो.(लेखक संत साहित्याच्या अभ्यासक)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम