शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
2
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
3
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
5
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
6
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
7
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
8
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
9
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
10
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
11
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
12
बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?
13
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
14
शोधत होते दारू, सापडले एक कोटी रुपये; तपासणी नाक्यावर खाजगी बसमध्ये आढळली अवैध रक्कम
15
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
16
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
17
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
18
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
19
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
20
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट

आत्मानंदासाठी धडपडणाऱ्या माणसांसाठी वारी हा एक शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 01:16 IST

सुमारे सातशे वर्षे झालीत. कोणतीही आमंत्रणं न देता अव्याहतपणे प्रत्येक ज्येष्ठ वद्य अष्टमीस पंढरपूरची वारी करण्याकरिता वारकरी मोठ्या संख्येने आळंदीला जमत असतात. प्रचंड उत्साहाने लाखो वारकºयांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी संपन्न होतो. दिंड्या, पताका, टाळमृदंगाच्या गजरात शेकडो वारकरी पायी ही वारी करतात.

प्रा़ डॉ. कमल अहेर - कुवरसुमारे सातशे वर्षे झालीत. कोणतीही आमंत्रणं न देता अव्याहतपणे प्रत्येक ज्येष्ठ वद्य अष्टमीस पंढरपूरची वारी करण्याकरिता वारकरी मोठ्या संख्येने आळंदीला जमत असतात. प्रचंड उत्साहाने लाखो वारकºयांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी संपन्न होतो. दिंड्या, पताका, टाळमृदंगाच्या गजरात शेकडो वारकरी पायी ही वारी करतात. त्यात वयाच्या ओझ्याने वाकलेला, काठी टेकत चालणारा भक्त असतो. तेलमीठ-पीठाचे ओझे डोक्यावर, कडेवर लहान मूल घेऊन चालणारी कष्टकरी स्त्री असते. भोळे भाबडे भक्त असतात. तत्त्वज्ञ असतात. विचारवंत असतात. समाजशास्त्रज्ञहीअसतात.वारकरी संप्रदाय हे उदार, चिंतनशील, संस्कारजन्य भक्तांना सामावून घेणारे उपासनापीठ आहे. धार्मिक प्रबोधनाच्या प्रेरणेतून तो जन्माला आला. ज्ञानेश्वर, तुकाराम इ. संतांचे कार्य केवळ सांप्रदायिक स्वरूपाचे नसून ती एक व्यापक चळवळ होती.पंढरपूरचा पांडुरंग हे त्यांचे उपास्यदैवत. प्रत्येक वारकºयाच्या मनामध्ये असणारी विठ्ठलभेटीची आस वारीतून पूर्ण होते. यात सर्व जातिधर्माचे, पंथाचे स्त्री-पुरुष असतात. जन्मसिद्ध अधिकार, उच्चनीचतेला यात थारा नसतो.आत्मसंस्कार, आत्मानंद, आत्मशोध यासाठी धडपडणाºया माणसासाठी वारी हा एक शोध आहे. कोणत्याही प्रकारच्या अभिमानाला येथे जागा नाही. सर्व प्रकारच्या उपाधी झुगारून ईश्वरापुढे एक माणूस म्हणून नम्र होणे येथे आहे.स्वार्थांधता, जीवघेणी स्पर्धा, कुटुंबसंस्थेचे विघटन, शहरांचे बकालपण, हिंस्रता, सर्वांना वेढून टाकणारा एकाकीपणा या गोष्टी आधुनिक काळात दर दिवशी वाढत आहेत.बौद्धिक विकास झाला; परंतु नैतिकता उंचावली गेली नाही. उलट अलीकडच्या काळात ती क्षीण क्षीण होताना दिसत आहे.‘जे जे भेटे भूत,ते ते मानिजे भगवंत’म्हणून आपली विचारांची कक्षा व्यापक करणारा, निसर्गाचे सान्निध्य लाभल्यामुळे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’चा अनुभव साक्षात करणारा वारी हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. मराठी भाषा, साहित्य-संस्कृती याविषयी स्वत्वाची भावना निर्माण करून सामाजिक सामरस्याची भावना त्यामुळे जागवली जाते. वारकºयाचा भक्तिभावनेने ओथंबलेल्या मनाचा हा अंत:स्तरावरचा प्रवास मला महत्त्वाचा वाटतो.(लेखक संत साहित्याच्या अभ्यासक)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम