शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

द्राक्षे पंढरीतील बळीराजा व्यापाऱ्यांच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 18:27 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला संपूर्ण जिल्ह्यात धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जवळ जवळ ८० टक्के शेतकरी वर्गाने द्राक्षे ...

ठळक मुद्देलखमापूर : लॉकडाउनची शेतकरी वर्गाने घेतली मोठी धास्ती

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला संपूर्ण जिल्ह्यात धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जवळ जवळ ८० टक्के शेतकरी वर्गाने द्राक्षे पिकांला पसंती दिली आहे. तसेच शेतीसी निगडीत व्यवसाय करीत आहे. परंतु सध्याच्या मितीला दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्ग अतिशय खडतर मार्गातुन द्राक्षे पिके वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करीत आहे.दिंडोरी तालुक्यात द्राक्षे व उस हे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.त्यात नगदी पैसा मिळुन देणारे पिक द्राक्षे वर्षभर मेहनत करून घेतले जाते. तेव्हा उत्पन्नांचे पैसे हातात पडतात. भरपूर भांडवल, अतिशय महागडे औषधे, मोठ्या प्रमाणात खर्च, हे सर्व समीकरण जुळून द्राक्षे पिक घेतले जाते. परंतु तयार झालेले द्राक्षे जेव्हा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्याची वेळ येते. तेव्हा मात्र द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गाला मोठी कसरत करावी लागते.                     शेतकरी वर्गाची खरी लुटमार सुरु होते, ती द्राक्षे तयार झाल्यानंतर व्यापारी शोधण्यापासुन त्यात चांगला व्यापारी मिळणे, त्याने फसवणूक न करता चांगला भाव मिळून देणे हे महत्वाचे ठरत आहे. आता तर द्राक्षे पिके तयार झाल्यानंतर दलालीमुळे आपल्या द्राक्षे पिकांला चांगला भाव मिळावा म्हणून दलालांच्या विनवण्या कराव्या लागतात. त्याकरिता टक्केवारीची भाषा बोलण्यात येऊन नविन अमिष दाखविण्यात येते. दुसरीकडे परप्रान्तीय व्यापारी दलालांना जास्त कमीशनचे अमिष दाखवून शेतकरी वर्गाकडून द्राक्षे माल विकत घेतात. प्रत्यक्ष माल काढण्याच्या वेळी चांगला भाव देण्याचा व सूरुवातीला चांगला द्राक्षे माल काढून घ्यायचा नंतर मात्र माल लवकर खराब होतो व आहे, भाव नाही,मालाला उठाव नाही, बाजारपेठेत माल विकला जात नाही अशी वेगवेगळे बहाणे करून अर्धवट बाग काढणी बंद करणे. हा अर्धवट शिल्लक राहिलेला माल दुसरा कोणी व्यापारी घेत नाही. मग मिळले त्या कवडीमोल भावाने पैसा पदरात पाडून घेण्याकरीता शेतकरी माल देण्यासाठी तयार होतो.निर्यातीसाठी द्राक्षे उत्पादनांसाठी उत्पादकांना कमीत कमी ३० ते ४० रुपये प्रति किलो सरासरी खर्च पडतो.तसेच अनेक अस्मानी व सुलतानी संकटे, वातावरणातील बदलाव, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, अशा शंभर संकटातून बागा वाचून द्राक्ष निर्यातीसाठी तयार होतात. आणि तेव्हा शेतकऱ्यांना मोठा ज्या निर्यातदार संस्थेशी किंवा कंपनीशी द्राक्षविक्रीचा व्यवहार केलेला असेल, त्या कंपनीचा कर्मचारी स्वतः बागेत येऊन माल योग्य तयार झाला की नाही यांची खात्री करून घेतात.              द्राक्षांमध्ये कोणताही विषारी रासायनिक अंश शिल्लक नाही. याची खात्री करून घेतात.तसेच यासाठी द्राक्षांची नमुने तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठविले जातात.त्यासाठी खर्चाचे वेगवेगळ्या स्वरूपाची रक्कम आकारली जाते. हा खर्च देखील शेतकरी वर्गाच्या माथी टाकला जातो.प्रत्यक्षात दोन-दोन महिने उलटून गेले तरी पैसे मिळत नाही. बँकेचे चेक दिले तर अपुरी रक्कमेमुळे बाऊन्स होतात. असे अनेक संकटे द्राक्षे पंढरीतील शेतकरी वर्गाला भोगावे लागत आहे. त्यामुळे सध्या द्राक्षे उत्पादक बळीराजा ला चांगल्या व प्रामाणिक व्यापारी वर्गाची प्रतिक्षा लागली आहे.(१३ ग्रेप्स १)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी