शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

साहित्य संमेलनाच्या तारखांवर महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:07 IST

नाशिक : नाशिकच्या भूमीत रंगणारे ९४ वे साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चदरम्यान घेणार असल्याचे महामंडळाच्या बैठकीत निश्चित झाले ...

नाशिक : नाशिकच्या भूमीत रंगणारे ९४ वे साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चदरम्यान घेणार असल्याचे महामंडळाच्या बैठकीत निश्चित झाले आहे. साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत या संमेलनाच्या तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. त्याबाबतची अधिकृत घोषणा साहित्य महामंडळाकडून रविवारी करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाला कोणत्याही परिस्थितीत हे संमेलन यंदाच्या आर्थिक वर्षपूर्तीआधीच घ्यायचे होते. त्यानुसार साहित्य संमेलनाची तारीख मार्च महिन्यात अधिकाधिक अखेरच्या टप्प्यात ठेवण्याचे नियोजन महामंडळाने केले होते. त्याप्रमाणे शनिवारी झालेल्या अखिल भारतीय महामंडळाच्या बैठकीत शनिवारी संमेलनाच्या तारखांबाबत चर्चा झाली. त्यात सर्वानुमते २६ ते २८ मार्च या तीन दिवसांची निश्चिती करण्यात आली. शुक्रवार ते रविवार हे दिवस संमेलन आयोजनाच्या दृष्टीने आणि रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीच्या दृष्टीने नेहमीच सोयीस्कर ठरतात. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनासाठीही शुक्रवार (दि. २६ मार्च) ते रविवार (दि. २८ मार्च) या कालावधीतच संमेलन भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यादृष्टीने आतापासून करण्याच्या कामकाजाची आणि विशेष निमंत्रितांच्या निमंत्रणांसाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देशदेखील या बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे आता लोकहितवादी मंडळाच्या धुरीणांसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या हातात आता संमेलनाच्या तयारीसाठी केवळ दोन महिन्यांचाच कालावधी उरणार आहे.

इन्फो

रविवारी अधिकृत घोषणा

संमेलनाच्या अध्यक्ष निवडीसाठी झालेल्या या बैठकीत भारत सासणे, डॉ. जयंत नारळीकर आणि डॉ. जनार्दन वाघमारे या तीन नावांवर प्रदीर्घ काळ खल झाल्याचे समजते. मात्र, संमेलनाध्यक्ष पदाचे अधिकृत नाव आणि अधिकृत तारखांबाबत रविवारी (दि.२४) घोषणा करण्यात येणार आहे.

लोगो

साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.