शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

मननशक्तीमुळेच विज्ञानाची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:25 IST

मनन-चिंतनाची शक्ती माणसाला मिळाली म्हणून तो ‘माणूस’ आहे. मनन करणे हा शरीर किंवा इंद्रियांचा धर्म नाही तर तो बुद्धी अथवा मनाचा धर्म आहे. चिंतन, विवेक, विचार करण्याची व अंतर्मुख होऊ न जीवनाचे निरीक्षण करण्याची शक्ती माणसाकडे आहे. या शक्तीमुळचे विज्ञान आज प्रगल्भ झाले आहे. माणसाच्या वैचारिक अशा अंतरंगातील मननशक्तीमुळे विज्ञानाची घोडदौड सुरू असल्याचे प्रतिपादन श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.

नाशिक : मनन-चिंतनाची शक्ती माणसाला मिळाली म्हणून तो ‘माणूस’ आहे. मनन करणे हा शरीर किंवा इंद्रियांचा धर्म नाही तर तो बुद्धी अथवा मनाचा धर्म आहे. चिंतन, विवेक, विचार करण्याची व अंतर्मुख होऊ न जीवनाचे निरीक्षण करण्याची शक्ती माणसाकडे आहे. या शक्तीमुळचे विज्ञान आज प्रगल्भ झाले आहे. माणसाच्या वैचारिक अशा अंतरंगातील मननशक्तीमुळे विज्ञानाची घोडदौड सुरू असल्याचे प्रतिपादन श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.  गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात शिवशक्ती ज्ञानपीठाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेला सोमवारी (दि. ६) प्रारंभ करण्यात आला. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सरस्वती यांनी ‘मनोनिग्रह’ विषयावर गुंफले. यावेळी ते म्हणाले, माणूस ज्या विवेकशक्तीमुळे माणूस आहे, ती विवेकशक्ती त्याला मिळालेली दुर्लभ अशी देणगी आहे. यामुळेच तो ‘माणूस’ म्हणून ओळखला जातो. बहिरंगाने माणूस म्हणून जगणे म्हणजे जीवन नव्हे, तर माणसातला ‘माणूस’ असल्याची जाणीव ठेवून जगणे म्हणजे माणसाचे जगणे होय. एक माणूस म्हणून जेव्हा व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक जीवन तो जगतो तेव्हा खरोखर बहिरंगाच्या विकासाने त्याचे जीवन विकसित झालेले आहे का या प्रश्नाचे उत्तर मिळते. बहिरंगाने समृद्ध, विद्वत्ता मिळविल्यामुळे किंवा प्रजोत्पत्ती केली म्हणून तो माणूस झाला असे नाही, तर माणसाच्या मनाच्या वैचारिक शक्तीमुळे तो माणूस म्हणून ओळखला जातो, असे स्वरूपानंद यावेळी म्हणाले.व्यावहारिक ज्ञान, पांडित्य, विद्वत्ता, समृद्धी, प्रतिष्ठा, मान-सन्मान, ज्ञान आत्मसात केले म्हणजे माणसाचा विकास झाला असे आपण आजपर्यंत ऐकत आलो; मात्र हा विकास केवळ बहिरंगाने झालेला असतो. बहिरंगाने माणूस म्हणून जगणे म्हणजे जगणे मुळीच नाही. माणसातला ‘माणूस’ आज नष्ट होतोय, अशी खंत स्वरूपानंद यांनी यावेळी व्यक्त केली.