शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

मननशक्तीमुळेच विज्ञानाची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:25 IST

मनन-चिंतनाची शक्ती माणसाला मिळाली म्हणून तो ‘माणूस’ आहे. मनन करणे हा शरीर किंवा इंद्रियांचा धर्म नाही तर तो बुद्धी अथवा मनाचा धर्म आहे. चिंतन, विवेक, विचार करण्याची व अंतर्मुख होऊ न जीवनाचे निरीक्षण करण्याची शक्ती माणसाकडे आहे. या शक्तीमुळचे विज्ञान आज प्रगल्भ झाले आहे. माणसाच्या वैचारिक अशा अंतरंगातील मननशक्तीमुळे विज्ञानाची घोडदौड सुरू असल्याचे प्रतिपादन श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.

नाशिक : मनन-चिंतनाची शक्ती माणसाला मिळाली म्हणून तो ‘माणूस’ आहे. मनन करणे हा शरीर किंवा इंद्रियांचा धर्म नाही तर तो बुद्धी अथवा मनाचा धर्म आहे. चिंतन, विवेक, विचार करण्याची व अंतर्मुख होऊ न जीवनाचे निरीक्षण करण्याची शक्ती माणसाकडे आहे. या शक्तीमुळचे विज्ञान आज प्रगल्भ झाले आहे. माणसाच्या वैचारिक अशा अंतरंगातील मननशक्तीमुळे विज्ञानाची घोडदौड सुरू असल्याचे प्रतिपादन श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.  गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात शिवशक्ती ज्ञानपीठाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेला सोमवारी (दि. ६) प्रारंभ करण्यात आला. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सरस्वती यांनी ‘मनोनिग्रह’ विषयावर गुंफले. यावेळी ते म्हणाले, माणूस ज्या विवेकशक्तीमुळे माणूस आहे, ती विवेकशक्ती त्याला मिळालेली दुर्लभ अशी देणगी आहे. यामुळेच तो ‘माणूस’ म्हणून ओळखला जातो. बहिरंगाने माणूस म्हणून जगणे म्हणजे जीवन नव्हे, तर माणसातला ‘माणूस’ असल्याची जाणीव ठेवून जगणे म्हणजे माणसाचे जगणे होय. एक माणूस म्हणून जेव्हा व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक जीवन तो जगतो तेव्हा खरोखर बहिरंगाच्या विकासाने त्याचे जीवन विकसित झालेले आहे का या प्रश्नाचे उत्तर मिळते. बहिरंगाने समृद्ध, विद्वत्ता मिळविल्यामुळे किंवा प्रजोत्पत्ती केली म्हणून तो माणूस झाला असे नाही, तर माणसाच्या मनाच्या वैचारिक शक्तीमुळे तो माणूस म्हणून ओळखला जातो, असे स्वरूपानंद यावेळी म्हणाले.व्यावहारिक ज्ञान, पांडित्य, विद्वत्ता, समृद्धी, प्रतिष्ठा, मान-सन्मान, ज्ञान आत्मसात केले म्हणजे माणसाचा विकास झाला असे आपण आजपर्यंत ऐकत आलो; मात्र हा विकास केवळ बहिरंगाने झालेला असतो. बहिरंगाने माणूस म्हणून जगणे म्हणजे जगणे मुळीच नाही. माणसातला ‘माणूस’ आज नष्ट होतोय, अशी खंत स्वरूपानंद यांनी यावेळी व्यक्त केली.