शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मननशक्तीमुळेच विज्ञानाची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:25 IST

मनन-चिंतनाची शक्ती माणसाला मिळाली म्हणून तो ‘माणूस’ आहे. मनन करणे हा शरीर किंवा इंद्रियांचा धर्म नाही तर तो बुद्धी अथवा मनाचा धर्म आहे. चिंतन, विवेक, विचार करण्याची व अंतर्मुख होऊ न जीवनाचे निरीक्षण करण्याची शक्ती माणसाकडे आहे. या शक्तीमुळचे विज्ञान आज प्रगल्भ झाले आहे. माणसाच्या वैचारिक अशा अंतरंगातील मननशक्तीमुळे विज्ञानाची घोडदौड सुरू असल्याचे प्रतिपादन श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.

नाशिक : मनन-चिंतनाची शक्ती माणसाला मिळाली म्हणून तो ‘माणूस’ आहे. मनन करणे हा शरीर किंवा इंद्रियांचा धर्म नाही तर तो बुद्धी अथवा मनाचा धर्म आहे. चिंतन, विवेक, विचार करण्याची व अंतर्मुख होऊ न जीवनाचे निरीक्षण करण्याची शक्ती माणसाकडे आहे. या शक्तीमुळचे विज्ञान आज प्रगल्भ झाले आहे. माणसाच्या वैचारिक अशा अंतरंगातील मननशक्तीमुळे विज्ञानाची घोडदौड सुरू असल्याचे प्रतिपादन श्रुतिसागर आश्रमाचे संस्थापक स्वरूपानंद सरस्वती यांनी केले.  गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात शिवशक्ती ज्ञानपीठाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेला सोमवारी (दि. ६) प्रारंभ करण्यात आला. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प सरस्वती यांनी ‘मनोनिग्रह’ विषयावर गुंफले. यावेळी ते म्हणाले, माणूस ज्या विवेकशक्तीमुळे माणूस आहे, ती विवेकशक्ती त्याला मिळालेली दुर्लभ अशी देणगी आहे. यामुळेच तो ‘माणूस’ म्हणून ओळखला जातो. बहिरंगाने माणूस म्हणून जगणे म्हणजे जीवन नव्हे, तर माणसातला ‘माणूस’ असल्याची जाणीव ठेवून जगणे म्हणजे माणसाचे जगणे होय. एक माणूस म्हणून जेव्हा व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक जीवन तो जगतो तेव्हा खरोखर बहिरंगाच्या विकासाने त्याचे जीवन विकसित झालेले आहे का या प्रश्नाचे उत्तर मिळते. बहिरंगाने समृद्ध, विद्वत्ता मिळविल्यामुळे किंवा प्रजोत्पत्ती केली म्हणून तो माणूस झाला असे नाही, तर माणसाच्या मनाच्या वैचारिक शक्तीमुळे तो माणूस म्हणून ओळखला जातो, असे स्वरूपानंद यावेळी म्हणाले.व्यावहारिक ज्ञान, पांडित्य, विद्वत्ता, समृद्धी, प्रतिष्ठा, मान-सन्मान, ज्ञान आत्मसात केले म्हणजे माणसाचा विकास झाला असे आपण आजपर्यंत ऐकत आलो; मात्र हा विकास केवळ बहिरंगाने झालेला असतो. बहिरंगाने माणूस म्हणून जगणे म्हणजे जगणे मुळीच नाही. माणसातला ‘माणूस’ आज नष्ट होतोय, अशी खंत स्वरूपानंद यांनी यावेळी व्यक्त केली.