शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:31 IST

नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९५.९० टक्के इतका लागला. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९०.५६ टक्के इतका लागला.

नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९५.९० टक्के इतका लागला. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९०.५६ टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ७५.२५ टक्के इतका लागला, तर किमान कौशल्य विभागाचा निकाल ७७.२८ टक्के लागला.  विभागातून विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ६५,१७५ इतके आहे. वाणिज्य शाखेतून १९,४४८, तर कला शाखेतून ४८,८०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. किमान कौशल्य अभ्यासक्रमातून ४६२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  दरवर्षीप्रमाणे यंदाही विज्ञान शाखेचा निकाल अधिक लागल्याने यंदा अभियंता शाखेकडे प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. असे असले तरी वाणिज्य शाखांमध्ये निर्माण झालेल्या संधी पाहता वाणिज्य शाखेतील अनेक शाखांकडेदेखील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वळणार असल्याचे एकूणच चित्र आहे.पुरवणी परीक्षा  जुलै-आॅगस्टमध्येविद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याकरिता जुलै-आॅगस्ट २०१५ मध्ये प्रथमच इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-आॅक्टोबरऐवजी जुलै-आॅगस्टमध्ये घेण्याबाबत मान्यता दिलेली आहे. इयत्ता बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना जुलै-आॅगस्टमध्ये पुरवणी परीक्षा देता येणार आहे.यंदा कॉपीचे सर्वाधिक प्रकारयावर्षी बारावी परीक्षेत अनपेक्षितपणे कॉपीचे प्रकार आढळून आले आहेत. यावर्षी विभागात २२४ इतके कॉपीप्रकार आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १०९ प्रकरणे ही जळगाव जिल्ह्यातच आढळून आली आहेत, तर त्या खालोखाल धुळ्यामध्ये ५३ कॉपीची प्रकरणे आढळून आली. नाशिकमध्ये ३६ कॉपी केसेस समोर आल्या होत्या, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी आठ कॉपी प्रकरणे आढळून आली होती.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८