शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:31 IST

नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९५.९० टक्के इतका लागला. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९०.५६ टक्के इतका लागला.

नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९५.९० टक्के इतका लागला. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा निकाल ९०.५६ टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ७५.२५ टक्के इतका लागला, तर किमान कौशल्य विभागाचा निकाल ७७.२८ टक्के लागला.  विभागातून विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ६५,१७५ इतके आहे. वाणिज्य शाखेतून १९,४४८, तर कला शाखेतून ४८,८०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. किमान कौशल्य अभ्यासक्रमातून ४६२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  दरवर्षीप्रमाणे यंदाही विज्ञान शाखेचा निकाल अधिक लागल्याने यंदा अभियंता शाखेकडे प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. असे असले तरी वाणिज्य शाखांमध्ये निर्माण झालेल्या संधी पाहता वाणिज्य शाखेतील अनेक शाखांकडेदेखील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वळणार असल्याचे एकूणच चित्र आहे.पुरवणी परीक्षा  जुलै-आॅगस्टमध्येविद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये याकरिता जुलै-आॅगस्ट २०१५ मध्ये प्रथमच इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-आॅक्टोबरऐवजी जुलै-आॅगस्टमध्ये घेण्याबाबत मान्यता दिलेली आहे. इयत्ता बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना जुलै-आॅगस्टमध्ये पुरवणी परीक्षा देता येणार आहे.यंदा कॉपीचे सर्वाधिक प्रकारयावर्षी बारावी परीक्षेत अनपेक्षितपणे कॉपीचे प्रकार आढळून आले आहेत. यावर्षी विभागात २२४ इतके कॉपीप्रकार आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १०९ प्रकरणे ही जळगाव जिल्ह्यातच आढळून आली आहेत, तर त्या खालोखाल धुळ्यामध्ये ५३ कॉपीची प्रकरणे आढळून आली. नाशिकमध्ये ३६ कॉपी केसेस समोर आल्या होत्या, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी आठ कॉपी प्रकरणे आढळून आली होती.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८