शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार ; मुलांना पाठविण्यास पालकांमध्ये धाकधुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:13 IST

नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, कोरोना लसीकरणालाही जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे ४ जानेवारीपासून ...

नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, कोरोना लसीकरणालाही जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. त्यामुळे ४ जानेवारीपासून शहरासह जिल्हाभरात सुरू करण्यात आलेल्या नववी ते बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरू झालेल्या शाळांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याने शासनाने पाचवी ते आठविच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षण विभागानेही शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे, नववी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन पंधरवडा उलटला असून, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि कोरोनाचा कमी झालेला प्रभाव लक्षात घेऊन शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात येत आहे.

पॉईंटर-

जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या

पाचवी - १,२२,७४३

सहावी - १,२०,६४५

सातवी - १,१८,३३२

आठवी - १,१५,९१०

जिल्ह्यातील शाळा - ५६२६

जिल्ह्यातील शिक्षक -१२, ३२४

इन्फो-

नववी ते बारावीचे वर्ग सुरू झालेल्या शाळांमध्ये जवळपास ७० ते ८० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याच्या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे शिक्षण विभागाकडून व्यक्त होत आहे. त्यामुळेच यासंदर्भात शासनाचा निर्णय जाहीर होताच शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.

कोट-१

शैक्षणिक वर्ष पूर्ण होत आले असताना शाळा सुरु करण्याची घाई कशासाठी ? शासनाने लसीकरण पूर्ण होऊन द्यावे. त्यानंतर पाचवीपासूनचे वर्ग सुरू करणे आवश्यक आहे.

-विलास पवार, पालक

कोट-२

कोरोनाची लस आली आहे तर प्रथम लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. तसेच शैक्षणिक वर्षही पूर्ण होत आले आहे. त्यामुळे आता पुढील वर्षातच शाळा सुरू करणे आवश्यक आहे.

- राजेश जाधव, पालक

कोट-३

लस आली असली तरी कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे संपला नाही, त्यामुळे लसीकरणानंतरच शाळा सुरू करण्याचे नियोजन होणे आवश्यक आहे. पाचवीचे विद्यार्थी शाळांमध्ये सुरक्षाविषयक काळजी घेऊ शकतील का याचा विचार होणे आवश्यक आहे.

-सुभाष पाटील,पालक

कोट -

शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. नववी ते बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीच्या वर्गांनाही मिळण्याची अपेक्षा आहे.

- नितीन उपासणी, शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग

(फोटो-०४पीएचजेएन६२)