शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

आता दोन सत्रात शाळा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:02 IST

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील शाळा अजूनही बंद ठेवण्यात आल्या असून, शाळा कधी सुरू होणार याविषयीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. असे असले तरी शाळा दोन फिजिकल डिस्टन्स राखण्याच्या उद्देशाने महाराष्टÑातील शाळा दोन सत्रात सुरू करण्याची शक्यता आहे. शिक्षक संघ आणि संस्थाचालकांनी याबाबतची अनुकूलताही दर्शविली आहे.

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील शाळा अजूनही बंद ठेवण्यात आल्या असून, शाळा कधी सुरू होणार याविषयीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. असे असले तरी शाळा दोन फिजिकल डिस्टन्स राखण्याच्या उद्देशाने महाराष्टÑातील शाळा दोन सत्रात सुरू करण्याची शक्यता आहे. शिक्षक संघ आणि संस्थाचालकांनी याबाबतची अनुकूलताही दर्शविली आहे.देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सध्या अशा क्षेत्रामधील शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव हा राहणारच असल्याने शाळा सुरू करण्यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शाळा या दोन सत्रात सुरू करण्याबाबतची अनुकूलता दर्शविण्यात आली आहे. कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या संचालकांनी शाळांमध्ये सामासिक अंतर राखण्यासंबंधी मार्गसूची जारी केली असून तशाच प्रकारे सूचना अमलात आणून महाराष्टÑातही शाळा सुरू करण्याबाबतचे विचारमंथन सुरू झाले आहे. कर्नाटक शिक्षण बोर्डाने शाळा दोन सत्रात सुरू करण्याबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षितता तसेच फिजिकल डिस्टन्ससाठी घेतलेले निर्णय महाराष्टÑातही राबविले जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर दोन सत्रात शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण संस्थांना मोठी तयारी करावी लागणार असून, वर्ग खोल्या आणि शिक्षकांची तरतूद अगोदरच करावी लागणार आहे. सकाळचे सत्र ७.५० तर दुपार सत्राची शाळा १२.१० ला सुरू होणार आहे.कर्नाटक सरकारच्या निर्णयानुसार दोन सत्रांमध्ये शाळा भरविण्यात येणार असली तरी शिक्षकांनादेखील एका सत्रात काम करावे लागणार आहे. मात्र पहिली ते सातवी, आठवीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळांमध्ये दोन सत्रात शाळा भरवावी लागणार आहे. आठवी ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक शाळांमध्ये वर्ग खोल्यांची कमतरता असल्यास तेथेदेखील दोन सत्रात शाळा भरवावी, अशी सूचना देण्यात आली आहे. शिक्षकांची कमतरता भासत असेल तर स्थानिक परिसरातील अतिथी शिक्षकांची नेमणूक करता येणार आहे.------------कर्नाटक सरकारने दोन सत्रात शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे . महाराष्ट्रातही सामासिक अंतर राखून, मुलांची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता बघून शाळा दोन सत्रात सुरू करण्यास हरकत नाही. शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक, पालक, शिक्षक यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे.- एस. बी. देशमुख, सचिव,पश्चिम महाराष्टÑ राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे

टॅग्स :Nashikनाशिक