शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शाळेची भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:37 IST

मुसळधार पावसामुळे कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत कोसळली. त्यामुळे धोकादायक शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

ठळक मुद्देरवळजी येथील घटना : धोकादायक शाळांचा प्रश्न ऐरणीवर

पाळे खुर्द : मुसळधार पावसामुळे कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत कोसळली. त्यामुळे धोकादायक शाळांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.या शाळेची पूर्ण इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. अधिक पाऊस झाला तर संपूर्ण इमारत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे़ सदर शाळेची इमारत पुन्हा नव्याने बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सदर इमारतीची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. शौचालय व प्रसाधनगृहातदेखील घाणीचे साम्राज्य आहे. शाळेच्या परिसरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. शासनाने लॉकडाऊन घोषित केला असला तरी शिक्षण विभागाकडून शाळेंची पाहणी होत नाही. पाच महिन्यापासुन शाळा बेवारस पडल्या असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.जिल्हा परिषदेच्या सुमारे ३३०० शाळा आहेत. त्यातील सुमारे १५० शाळांच्या इमारती भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. २६०च्या शाळा इमारती धोकादायक असल्याचे सांगितले जाते. बऱ्याच शाळा इमारतींना पावसाळ्यात गळती लागते. विद्यार्थ्यांना वर्ग खोल्यांमध्ये बसायला जागा राहत नाही.दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींबाबत चर्चा होते. प्रत्यक्षात किरकोळ डागडुजी करत वेळ निभावून नेली जाते. शाळांच्या धोकादायक इमारतीबाबत जिल्हा परिषद प्रशासनासह लोकप्रतिनिधीही उदासीन असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे.मागील एक वर्षापूर्वी रवळजी शालेय समितीने ठराव करून संबंधित विभाग व जिल्हा परिषद इमारत व दळणवळण विभागास सदर शाळेत वर्ग न भरविणे व दुसरीकडे पर्यायी व्यवस्था करण्याचा ठराव पाठविला आहे. परंतु शालेय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे़ त्याचप्रमाणे रवळजी शाळेत पहिती ते सातवीपर्यंत वर्ग असून, ३०० ते ३२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शाळेत सुमारे ७ ते ८ शिक्षक असून, एकही शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. मुख्याध्यापकपण प्रभारी असून, मुख्याध्यापकांची जागा रिक्त आहे. शिक्षणाधिकारी यांचेसुद्धा लक्ष नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. या प्रकाराची गंभीर दखल न घेतल्यास लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा इशारा बबन वाघ, गोकुळ जाधव, बाळासाहेब जाधव, प्रकाश भालेराव, प्रवीण गांगुर्डे आदींनी दिला आहे़

टॅग्स :Schoolशाळा