शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

टंचाई निवारणाची कामे कागदावरच

By admin | Updated: February 17, 2016 23:59 IST

कामांना मंजुरीची प्रतीक्षा : प्रशासनाचे आस्ते कदम

नाशिक : उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या भीषण पाणीटंचाईचा वेळेतच मुकाबला करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टंचाई कृती आराखड्यातील दुसऱ्या टप्प्यातील कामे अद्यापही कागदावरच असून, जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद अशा दोन कार्यालयांमध्येच कामांचे प्रस्ताव फिरत असल्याने यंदाही टंचाईग्रस्त गावांची तहान फक्त टॅँकरद्वारेच भागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आॅक्टोबरमध्येच टंचाई कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे शासनाचे स्थायी आदेश आहेत, परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांना ‘तहान लागल्यावर विहीर खणण्याची’ सवय असल्यामुळे यंदाही डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेने टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. दरम्यान, आॅक्टोबर ते डिसेंबर हा टंचाई आराखड्यातील पहिल्या टप्प्यात एकही काम जिल्ह्यात टंचाई निवारणाचे होऊ शकले नाही, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात (जानेवारी ते मार्च) भेडसाविणाऱ्या संभाव्य टंचाईचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुमारे अकरा कोटी रुपये खर्चाच्या कामांचे प्रस्ताव वेळेत सादर होऊन त्यांना तत्काळ मंजुरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच, प्रत्यक्षात त्याबाबतही प्रशासनाची वाटचाल संथगतीने सुरू आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत अकरा कोटी रुपयांच्या कामांमध्ये विंधन विहिरी, नळ पाणी योजना दुरुस्ती व तात्पुरत्या नळ पाणी योजना अशी कामे सुचविण्यात येऊन जिल्हा परिषदेने नळ दुरुस्तीचे ३१ प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले, परंतु ज्या गावांमध्ये योजना राबविण्यात येणार, त्या गावांमधील टंचाईच्या परिस्थितीचे पुन्हा अवलोकन करण्याची सूचना करून जिल्हाधिकाऱ्यांनी सदरचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे परत पाठविले. प्रस्तावांच्या या प्रवासात निम्मा फेब्रुवारी महिना उलटून गेला असून, अजूनही जिल्हा परिषदेने ३१ प्रस्तावांपैकी निम्मेच फेरप्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. हे प्रस्तावही मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे कामे सुरू होण्यास मार्च उजाडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)