शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

टंचाई निवारणाची कामे कागदावरच

By admin | Updated: February 17, 2016 23:59 IST

कामांना मंजुरीची प्रतीक्षा : प्रशासनाचे आस्ते कदम

नाशिक : उन्हाळ्यात भेडसाविणाऱ्या भीषण पाणीटंचाईचा वेळेतच मुकाबला करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टंचाई कृती आराखड्यातील दुसऱ्या टप्प्यातील कामे अद्यापही कागदावरच असून, जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा परिषद अशा दोन कार्यालयांमध्येच कामांचे प्रस्ताव फिरत असल्याने यंदाही टंचाईग्रस्त गावांची तहान फक्त टॅँकरद्वारेच भागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आॅक्टोबरमध्येच टंचाई कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे शासनाचे स्थायी आदेश आहेत, परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांना ‘तहान लागल्यावर विहीर खणण्याची’ सवय असल्यामुळे यंदाही डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषदेने टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. दरम्यान, आॅक्टोबर ते डिसेंबर हा टंचाई आराखड्यातील पहिल्या टप्प्यात एकही काम जिल्ह्यात टंचाई निवारणाचे होऊ शकले नाही, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात (जानेवारी ते मार्च) भेडसाविणाऱ्या संभाव्य टंचाईचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सुमारे अकरा कोटी रुपये खर्चाच्या कामांचे प्रस्ताव वेळेत सादर होऊन त्यांना तत्काळ मंजुरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच, प्रत्यक्षात त्याबाबतही प्रशासनाची वाटचाल संथगतीने सुरू आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत अकरा कोटी रुपयांच्या कामांमध्ये विंधन विहिरी, नळ पाणी योजना दुरुस्ती व तात्पुरत्या नळ पाणी योजना अशी कामे सुचविण्यात येऊन जिल्हा परिषदेने नळ दुरुस्तीचे ३१ प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले, परंतु ज्या गावांमध्ये योजना राबविण्यात येणार, त्या गावांमधील टंचाईच्या परिस्थितीचे पुन्हा अवलोकन करण्याची सूचना करून जिल्हाधिकाऱ्यांनी सदरचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे परत पाठविले. प्रस्तावांच्या या प्रवासात निम्मा फेब्रुवारी महिना उलटून गेला असून, अजूनही जिल्हा परिषदेने ३१ प्रस्तावांपैकी निम्मेच फेरप्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत. हे प्रस्तावही मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे कामे सुरू होण्यास मार्च उजाडण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)