शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
4
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
5
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
6
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
7
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
8
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
9
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
10
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
11
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
12
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
13
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
14
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
15
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
16
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
17
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
18
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
19
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'

उपाययोजना कागदावरचटंचाई

By admin | Updated: September 11, 2015 01:06 IST

बैठक : लोकप्रतिनिधींनी वाचला तक्रारींचा पाढा

नाशिक : शासन दरबारी टॅँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेले असले तरी तहसीलदारांकडून टॅँकर सुरू करण्यासाठी पाठविलेले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातच पडून राहतात. परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागते. रात्रीचे भारनियमन टाळल्यास दुष्काळामुळे होणाऱ्या चोऱ्या थांबतील यांसह अनेत तक्रारींचा पाढाच टंचाई बैठकीत जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर वाचला.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत टंचाई बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बैठकीस उपस्थित लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला. त्यातही पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असताना अधिकार दिलेले असूनही तहसीलदार टॅँकर मंजूर करीत नसल्याचा आरोप जिल्ह्णातील आमदार-खासदारांनी केला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी १९७२ नंतर प्रथमच असा भीषण दुष्काळ जिल्ह्णात पडला आहे. आता आदिवासी शेतकरीही कर्जबाजारी झाल्याने आत्महत्त्या करीत आहेत. तालुक्यात फिरून पाणीटंचाईबाबत माहिती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले, (प्रतिनिधी)तर आमदार0 राजाभाऊ वाजे यांनी सांगितले की, ११-१२ दिवस पुरेल इतकाच चारा सिन्नर तालुक्यात शिल्लक आहे. चाऱ्याअभावी शेतकरी जनावरांची विक्री करीत आहेत. भोजापूर धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करावे, तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. आमदार दीपिका चव्हाण यांनी बागलाण तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून, तहसीलदारांना अधिकार असतानाही टँकर मंजुरीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले जातात. त्यात वेळ जातो, अशी टीका केली. आमदार जयंत जाधव यांनी तीच री ओढत टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना असूनही प्रत्यक्षात टॅँकर मंजुरीस विलंब होतो. (प्रतिनिधी)सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे टंचाईकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आमदार निर्मल गावित यांनी इगतपुरी तालुक्यातील धरणसाठ्यांचे योग्य नियोजन करावे, पाण्याची आवर्तने सोडण्यावर नियंत्रण हवे. तालुक्यातील पिके व रोपे पावसाअभावी वाया गेली आहेत. आमदार रशीद शेख यांनी सांगितले की, मालेगाव तालुका व शहरासाठी पाण्याचे नियोजन गिरणा धरण व चणकापूर धरणातून करण्यात यावे, चणकापूर धरणातील पाणी मालेगावसाठी राखीव ठेवावे,अशी सूचना केली. आमदार पंकज भुजबळ यांनी चांदवड, येवला, नांदगाव व मालेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. मनमाडच्या पाणीप्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले आहे. नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. आमदार नरहरी झिरवाळ यांनी वाघाड धरणातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडल्यास काही प्रमाणात प्रश्न सुटू शकणार आहे. त्यामुळे वाघाड धरणातून पाणी सोडण्याबाबत आवश्यक त्या सूचना यंत्रणेला देण्यात याव्यात, अशी मागणी केली. खासदार हेमंत गोडसे यांनी पाणी टंचाईबाबत प्रत्यक्ष पाहणी करून सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच आवश्यक त्या गावांमध्ये पाणीटंचाई असल्यास टँकर सुरू करण्याची मागणी केली. आमदार देवयानी फरांदे यांनी सिंहस्थात २५ टक्के महिलांसाठी १०० खाटांचे रुग्णालय असल्याचे सांगताच आमदार जयंत जाधव यांनी त्यांना हा प्रश्न बैठकीचा नाही, असे स्पष्ट केले. जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी पूर्व भागात पाणीटंचाईची समस्या भीषण असल्याचे खरे असले तरी पश्चिम पट्ट्यातही काही भागांत पाणीटंचाई जाणवत असल्याचे सांगितले. तसेच पाणी टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना असले तरी त्यात विलंब होत असल्याची तक्रार केली. तहसीलदारांना विचारल्यावर ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीची गरज असते, असे उत्तर देत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)