शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

उपाययोजना कागदावरचटंचाई

By admin | Updated: September 11, 2015 01:06 IST

बैठक : लोकप्रतिनिधींनी वाचला तक्रारींचा पाढा

नाशिक : शासन दरबारी टॅँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेले असले तरी तहसीलदारांकडून टॅँकर सुरू करण्यासाठी पाठविलेले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातच पडून राहतात. परिणामी पाण्यासाठी भटकंती करावी लागते. रात्रीचे भारनियमन टाळल्यास दुष्काळामुळे होणाऱ्या चोऱ्या थांबतील यांसह अनेत तक्रारींचा पाढाच टंचाई बैठकीत जिल्ह्णातील लोकप्रतिनिधींनी जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर वाचला.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत टंचाई बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बैठकीस उपस्थित लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला. त्यातही पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असताना अधिकार दिलेले असूनही तहसीलदार टॅँकर मंजूर करीत नसल्याचा आरोप जिल्ह्णातील आमदार-खासदारांनी केला. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी १९७२ नंतर प्रथमच असा भीषण दुष्काळ जिल्ह्णात पडला आहे. आता आदिवासी शेतकरीही कर्जबाजारी झाल्याने आत्महत्त्या करीत आहेत. तालुक्यात फिरून पाणीटंचाईबाबत माहिती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले, (प्रतिनिधी)तर आमदार0 राजाभाऊ वाजे यांनी सांगितले की, ११-१२ दिवस पुरेल इतकाच चारा सिन्नर तालुक्यात शिल्लक आहे. चाऱ्याअभावी शेतकरी जनावरांची विक्री करीत आहेत. भोजापूर धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करावे, तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. आमदार दीपिका चव्हाण यांनी बागलाण तालुक्यात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असून, तहसीलदारांना अधिकार असतानाही टँकर मंजुरीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले जातात. त्यात वेळ जातो, अशी टीका केली. आमदार जयंत जाधव यांनी तीच री ओढत टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना असूनही प्रत्यक्षात टॅँकर मंजुरीस विलंब होतो. (प्रतिनिधी)सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे टंचाईकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. आमदार निर्मल गावित यांनी इगतपुरी तालुक्यातील धरणसाठ्यांचे योग्य नियोजन करावे, पाण्याची आवर्तने सोडण्यावर नियंत्रण हवे. तालुक्यातील पिके व रोपे पावसाअभावी वाया गेली आहेत. आमदार रशीद शेख यांनी सांगितले की, मालेगाव तालुका व शहरासाठी पाण्याचे नियोजन गिरणा धरण व चणकापूर धरणातून करण्यात यावे, चणकापूर धरणातील पाणी मालेगावसाठी राखीव ठेवावे,अशी सूचना केली. आमदार पंकज भुजबळ यांनी चांदवड, येवला, नांदगाव व मालेगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. मनमाडच्या पाणीप्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले आहे. नांदगाव ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. आमदार नरहरी झिरवाळ यांनी वाघाड धरणातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडल्यास काही प्रमाणात प्रश्न सुटू शकणार आहे. त्यामुळे वाघाड धरणातून पाणी सोडण्याबाबत आवश्यक त्या सूचना यंत्रणेला देण्यात याव्यात, अशी मागणी केली. खासदार हेमंत गोडसे यांनी पाणी टंचाईबाबत प्रत्यक्ष पाहणी करून सर्वेक्षण करण्यात यावे, तसेच आवश्यक त्या गावांमध्ये पाणीटंचाई असल्यास टँकर सुरू करण्याची मागणी केली. आमदार देवयानी फरांदे यांनी सिंहस्थात २५ टक्के महिलांसाठी १०० खाटांचे रुग्णालय असल्याचे सांगताच आमदार जयंत जाधव यांनी त्यांना हा प्रश्न बैठकीचा नाही, असे स्पष्ट केले. जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी पूर्व भागात पाणीटंचाईची समस्या भीषण असल्याचे खरे असले तरी पश्चिम पट्ट्यातही काही भागांत पाणीटंचाई जाणवत असल्याचे सांगितले. तसेच पाणी टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना असले तरी त्यात विलंब होत असल्याची तक्रार केली. तहसीलदारांना विचारल्यावर ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीची गरज असते, असे उत्तर देत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)