शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सावरकर चौकाने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: December 10, 2015 00:12 IST

भाजीबाजार : पालिकेने हटविले अतिक्रम

णइंदिरानगर : येथील सावरकर चौकात कृष्णकांत भाजी मार्केट बाहेरील भाजी विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, अधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच पालिका प्रशासनाची धावपळ झाली आणि रविवारी सुटीच्या दिवशी पालिकेने या विक्रेत्यांना तातडीने हटविले, तसेच पुन्हा येथे बेकायदेशीररीत्या व्यवसाय करण्यास मनाई केली आहे.इंदिरानगर येथील सावरकर चौकात अनधिकृत भाजी विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला असून, वाहतुकीस अडथळा होत आहे. याच ठिकाण महापालिकेचे अधिकृत मार्केट आहे. पूर्वी याच ठिकाणी भाजीविक्री करणाऱ्या ४० ते ५० विक्रेत्यांना महापालिकेने अशाच प्रकारे अतिक्रमण करण्यापासून रोखण्यासाठी अधिकृत भाजी मार्केट तयार करून त्यात ओटे बांधून दिले. त्यामुळेच या व्यावसायिकांना तेथे स्थलांतरित करण्यात आले. मात्र आता गेल्या काही वर्षांपासून या मार्केटबाहेर सावरकर चौकात ७० ते ८० विक्रेत्यांनी व्यवसायाला सुरुवात केली असून, त्यामुळे संपूर्ण चौकात रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. या अनधिकृत व्यावसायिकांमुळे मार्केटमध्ये अधिकृत व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवसायावर गंडांतर आले आणि त्यांनी यासंदर्भात विक्रेत्यांनी महापालिकेकडे आणि स्थानिक नगरसेवक दीपाली कुलकर्णी यांंच्याकडे तक्रार केल्यानंतर दखल घेतली जात नसल्याची कैफियत विक्रेत्यांनी मांडल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. त्यानंतर तातडीने पालिकेने दखल घेत रविवारीच (दि.६) अतिक्रमण विरोधी मोहीम राबवित अनधिकृत विक्रेत्यांना हटविले.