शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

‘सत्यमेव जयते वॉटर कप’ची बैठक चांदवड : पाणी फाउण्डेशनचा उपक्रम; सहभागाविषयी माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:19 IST

अभिनेता आमीर खानने सुरू केलेल्या पाणी फाउण्डेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत चांदवड तालुक्याची निवड झाली आहे. या स्पर्धेतील सहभागी गावांना दूरगामी फायदा होणार आहे.

ठळक मुद्देचांदवड तालुक्याची निवडराज्यस्तरापर्यंत गावाचे नाव पोहोचविण्याची संधी उपक्र म यशस्वी करावा

चांदवड : अभिनेता आमीर खानने सुरू केलेल्या पाणी फाउण्डेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत चांदवड तालुक्याची निवड झाली आहे.या स्पर्धेतील सहभागी गावांना दूरगामी फायदा होणार आहे. त्यामुळे ग्रामस्तरावरील प्रत्येक घटकाने कोणताही अहंभाव न बाळगता तसेच राजकीय मतभेद बाजूला सारून स्पर्धेत एकदिलाने सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी केले. चांदवड येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात पाणी फाउण्डेशनच्या वॉटर कप स्पर्धेतील सहभागासाठी आयोजित मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती डॉ. नितीन गांगुर्डे होते.व्यासपीठावर तहसीलदार शरद मंडलीक, जि. प. सदस्य डॉ. सयाजीराव गायकवाड, डॉ. आत्माराम कुंभार्डे, कविता धाकराव, पं. स. उपसभापती अमोल भालेराव, सदस्य निर्मला आहेर, शिवाजी सोनवणे, देवीदास अहेर आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी भंडारे पुढे म्हणाले की, स्पर्धेतील सहभागाला प्रोत्साहन म्हणून अधिकारी स्वत: गावागावात जाऊन श्रमदान करणार आहेत. राज्यस्तरापर्यंत गावाचे नाव पोहोचविण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्ताने उपलब्ध झाली असून, यात जास्तीत जास्त गावांनी हिरिरीने सहभाग घ्यावा व चांदवड तालुक्यात हा उपक्र म यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी पाणी फाउण्डेशनचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक गणेश मांडेकर यांनी स्पर्धेचे आयोजन व सहभागाविषयी सविस्तर माहिती दिली. गावात श्रमदानातून काम उभे करावयाचे असून, त्यासाठी कोणताही निधी दिला अथवा घेतला जाणार नाही. सहभागी गावांपैकी उत्कृष्ट काम करणाºया गावास प्रथम क्र मांकाचे ७५ लाख, द्वितीय क्रमांकाचे ५० लाख, तृतीय क्र मांकाचे ४० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाºया गावास १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी स्पर्धेसाठी करावयाची कामे व कामांना दिले जाणारे गुण याविषयी माहिती दिली. यावेळी डॉ. आत्माराम कुंभार्डे, डॉ. नितीन गांगुर्डे, पं. स. सदस्य शिवाजी सोनवणे, तालुका कृषी अधिकारी विजय पवार आदींनी मार्गदर्शन करून जास्तीत जास्त गावांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. महेश न्याहारकर, दत्तात्रय वाघचौरे, मनोज शिंदे, प्रभाकर ठाकरे आदींनी विविध सूचना करून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी ‘दुष्काळाशी दोन हात ’ ही ४० मिनिटांची चित्रफीत दाखविण्यात आली.बैठकीचा समारोप ज्ञानेश्वर सपकाळे यांनी केला. बैठकीस सुकदेव जाधव, नंदू चौधरी, अनिल पाटील, उत्तम ठोंबरे, राजेश गांगुर्डे, प्रा. सचिन निकम, गीता झाल्टे, विजय गांगुर्डे, विजूनाना शेळके, रवि पूरकर, बाळासाहेब कोठुळे, सागर आहिरे आदींसह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी आदी उपस्थित होते.ग्रामसभेत ठरावया स्पर्धेसाठी निवड झालेल्या ७५ तालुक्यांमध्ये चांदवड व सिन्नर तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, या तालुक्यातील गावांनी सहभागी होण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी अर्ज भरून द्यावयाचा आहे. त्यानंतर अर्ज क्र .दोन भरून ग्रामसभेत ठराव मंजूर करु न त्यात सक्र ीय सहभाग घेणाºया किमान पाच जणांची नावे द्यावयाची आहेत त्यात किमान २ महिला असणे आवश्यक आहे. त्यांना चार दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल, त्यानंतरच त्या गावाचा खºया अर्थाने स्पर्धेत सहभाग होणार आहे.