शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

गिरणा नदीला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:52 IST

देवळा / खामखेडा : गिरणा नदीला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या एक महिन्यापासून गिरणा नदीपात्र कोरडे झाल्याने नदीकाठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. चालू वर्षी उशिरा पाऊस झाल्याने पुढे विहिरींना व नदीला पाणी राहील, या आशेवर शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात रब्बी पिकाची लागवड केली आहे. परंतु शिवारातील विहिरींचे पाणी कमी झाले आहे.

ठळक मुद्देपिण्याच्या पाण्यासह जनवारांचा प्रश्न सुटला

देवळा / खामखेडा : गिरणा नदीला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या एक महिन्यापासून गिरणा नदीपात्र कोरडे झाल्याने नदीकाठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. चालू वर्षी उशिरा पाऊस झाल्याने पुढे विहिरींना व नदीला पाणी राहील, या आशेवर शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात रब्बी पिकाची लागवड केली आहे. परंतु शिवारातील विहिरींचे पाणी कमी झाले आहे.

गिरणा परिसरातील शेती ही गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नदीपात्र कोरडे झाल्याने नदीकाठावरील विहिरी कोरडया झाल्याने शेतातील पिकांना पाणी कमी पडू लागले होते. पिके पाण्याअभावी करपू लागली होती. दरवर्षी गिरणा नदीचे पाणी जानेवारी महिन्यापर्यंत वाहाते, परंतु चालू वर्षी डिसेंबर महिन्यापासून गिरणा नदीचे पाणी कमी होऊन हळूहळू नदीपात्रातील पाणी कमी होऊ झाल्याने जानेवारी महिन्यातच गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्याने नदी काठावरील गावांना पाणी पुरवठा असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याची टँचाई जणू लागली होती. फेब्रुवारी महिन्यात गिरणा नदीला पाणी सोडण्यात आले होते. परंतु पाणी बंद केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात नदीपात्रातील पाणी कमी झाले आणि नदीचे पात्र कोरडे झाले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून गिरणा नदीच्या काठावरील गावांना पाणी टंचाई जाणवू लागली होती. गिरणा परिसरातील शेती ही गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नदीच्या काठावरील गावातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी नदीपात्रालागत विहिरी खोदून लाखो रुपये खर्च करून पाईप लाईन केल्या आहेत. तेव्हा नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने नदी काठावरील विहिरी कोरडया झाल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासवून लागली होती.पिकांना मुबलक पाणीदेवळा तालुक्यात काही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड उशिरा केली आहे. परंतु नदीपात्रात कोरडे झाल्याने नदीकाठावरील विहिरी कोरड्या झाल्याने पिकांना पाणी कसे घ्यावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. तसेच शिवारातील विहिरी कोरड्या झाल्याने गाई, मेंढ्या, बकऱ्या आदींना पाणी कोठे पाजावे, हा प्रश्न पशुपालकांना पडला होता. परतू गिरणा नदीला पाणी सोडल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा सध्या तरी सुटला असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाला आहे.

टॅग्स :Waterपाणीagricultureशेती