शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा नदीला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:52 IST

देवळा / खामखेडा : गिरणा नदीला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या एक महिन्यापासून गिरणा नदीपात्र कोरडे झाल्याने नदीकाठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. चालू वर्षी उशिरा पाऊस झाल्याने पुढे विहिरींना व नदीला पाणी राहील, या आशेवर शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात रब्बी पिकाची लागवड केली आहे. परंतु शिवारातील विहिरींचे पाणी कमी झाले आहे.

ठळक मुद्देपिण्याच्या पाण्यासह जनवारांचा प्रश्न सुटला

देवळा / खामखेडा : गिरणा नदीला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या एक महिन्यापासून गिरणा नदीपात्र कोरडे झाल्याने नदीकाठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. चालू वर्षी उशिरा पाऊस झाल्याने पुढे विहिरींना व नदीला पाणी राहील, या आशेवर शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात रब्बी पिकाची लागवड केली आहे. परंतु शिवारातील विहिरींचे पाणी कमी झाले आहे.

गिरणा परिसरातील शेती ही गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नदीपात्र कोरडे झाल्याने नदीकाठावरील विहिरी कोरडया झाल्याने शेतातील पिकांना पाणी कमी पडू लागले होते. पिके पाण्याअभावी करपू लागली होती. दरवर्षी गिरणा नदीचे पाणी जानेवारी महिन्यापर्यंत वाहाते, परंतु चालू वर्षी डिसेंबर महिन्यापासून गिरणा नदीचे पाणी कमी होऊन हळूहळू नदीपात्रातील पाणी कमी होऊ झाल्याने जानेवारी महिन्यातच गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्याने नदी काठावरील गावांना पाणी पुरवठा असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याची टँचाई जणू लागली होती. फेब्रुवारी महिन्यात गिरणा नदीला पाणी सोडण्यात आले होते. परंतु पाणी बंद केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात नदीपात्रातील पाणी कमी झाले आणि नदीचे पात्र कोरडे झाले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून गिरणा नदीच्या काठावरील गावांना पाणी टंचाई जाणवू लागली होती. गिरणा परिसरातील शेती ही गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नदीच्या काठावरील गावातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी नदीपात्रालागत विहिरी खोदून लाखो रुपये खर्च करून पाईप लाईन केल्या आहेत. तेव्हा नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने नदी काठावरील विहिरी कोरडया झाल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासवून लागली होती.पिकांना मुबलक पाणीदेवळा तालुक्यात काही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड उशिरा केली आहे. परंतु नदीपात्रात कोरडे झाल्याने नदीकाठावरील विहिरी कोरड्या झाल्याने पिकांना पाणी कसे घ्यावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. तसेच शिवारातील विहिरी कोरड्या झाल्याने गाई, मेंढ्या, बकऱ्या आदींना पाणी कोठे पाजावे, हा प्रश्न पशुपालकांना पडला होता. परतू गिरणा नदीला पाणी सोडल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा सध्या तरी सुटला असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाला आहे.

टॅग्स :Waterपाणीagricultureशेती