शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

गिरणा नदीला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:52 IST

देवळा / खामखेडा : गिरणा नदीला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या एक महिन्यापासून गिरणा नदीपात्र कोरडे झाल्याने नदीकाठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. चालू वर्षी उशिरा पाऊस झाल्याने पुढे विहिरींना व नदीला पाणी राहील, या आशेवर शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात रब्बी पिकाची लागवड केली आहे. परंतु शिवारातील विहिरींचे पाणी कमी झाले आहे.

ठळक मुद्देपिण्याच्या पाण्यासह जनवारांचा प्रश्न सुटला

देवळा / खामखेडा : गिरणा नदीला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या एक महिन्यापासून गिरणा नदीपात्र कोरडे झाल्याने नदीकाठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. चालू वर्षी उशिरा पाऊस झाल्याने पुढे विहिरींना व नदीला पाणी राहील, या आशेवर शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात रब्बी पिकाची लागवड केली आहे. परंतु शिवारातील विहिरींचे पाणी कमी झाले आहे.

गिरणा परिसरातील शेती ही गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नदीपात्र कोरडे झाल्याने नदीकाठावरील विहिरी कोरडया झाल्याने शेतातील पिकांना पाणी कमी पडू लागले होते. पिके पाण्याअभावी करपू लागली होती. दरवर्षी गिरणा नदीचे पाणी जानेवारी महिन्यापर्यंत वाहाते, परंतु चालू वर्षी डिसेंबर महिन्यापासून गिरणा नदीचे पाणी कमी होऊन हळूहळू नदीपात्रातील पाणी कमी होऊ झाल्याने जानेवारी महिन्यातच गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्याने नदी काठावरील गावांना पाणी पुरवठा असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याची टँचाई जणू लागली होती. फेब्रुवारी महिन्यात गिरणा नदीला पाणी सोडण्यात आले होते. परंतु पाणी बंद केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात नदीपात्रातील पाणी कमी झाले आणि नदीचे पात्र कोरडे झाले. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून गिरणा नदीच्या काठावरील गावांना पाणी टंचाई जाणवू लागली होती. गिरणा परिसरातील शेती ही गिरणा नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नदीच्या काठावरील गावातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी नदीपात्रालागत विहिरी खोदून लाखो रुपये खर्च करून पाईप लाईन केल्या आहेत. तेव्हा नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने नदी काठावरील विहिरी कोरडया झाल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासवून लागली होती.पिकांना मुबलक पाणीदेवळा तालुक्यात काही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड उशिरा केली आहे. परंतु नदीपात्रात कोरडे झाल्याने नदीकाठावरील विहिरी कोरड्या झाल्याने पिकांना पाणी कसे घ्यावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. तसेच शिवारातील विहिरी कोरड्या झाल्याने गाई, मेंढ्या, बकऱ्या आदींना पाणी कोठे पाजावे, हा प्रश्न पशुपालकांना पडला होता. परतू गिरणा नदीला पाणी सोडल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा सध्या तरी सुटला असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाला आहे.

टॅग्स :Waterपाणीagricultureशेती