शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सातगाव योजना दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे

By admin | Updated: February 14, 2016 23:20 IST

दिलासा : उन्हाळ्यात पाणीटंचाईपासून होणार सुटका

गुळवंच : बारागावपिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे असून, यामुळे योजनेत सहभागी असणाऱ्या गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येत्या महिनाभरात योजना सुरळीत होणार असून, त्यामुळे उन्हाळ्यात या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. युती शासनाच्या काळात बारागावपिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. योजनेची सर्व कामे पूर्ण झाली होती. मात्र पाण्याचा उद्भव चुकल्याने योजना सहा महिन्यात बंद पडली होती. शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला होता. २००२ पासून सदर योजना बंद पडली होती. दुरुस्ती निधीतून निमगाव-सिन्नर, गुळवंच, हिवरगाव व सुळेवाडी या चार गावांना भविष्यातील वाढीव लोकसंख्येचा विचार करून नवीन जलकुंभ बांधण्यात आले आहे. या जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. नांदूरमधमेश्वर व के.पा.नगर येथे जलशुद्धीकरण केंद्राचे काम नियोजित असून, नांदूरमधमेश्वर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. केपानगर येथे जागेच्या वादामुळे प्रत्यक्ष कामास विलंब होत आहे. याबाबत आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समिती गटनेते उदय सांगळे तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.महिनाभरात बिगर फिल्टरचे पाणी योजनेत सहभागी गावांमध्ये पोहचण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे गेल्या चार वर्षांपासून टॅँकरने पुरवठा सुरू असलेल्या निमगाव-सिन्नर, बारागावपिंप्री, पाटपिंप्री या गावांना योजनेचे पाणी मिळाल्यास ही गावे पाणीटंचाईसह टॅँकरमुक्त होणार आहेत. जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा परिसरातील विहिरींमध्ये शिल्लक असल्याने मार्चअखेरीस गुळवंच, सुळेवाडी, केपानगर, हिवरगाव या ठिकाणीही टॅँकरची गरज भासणार असल्याचे चित्र आहे. यामुळे बारागावपिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा ग्रामस्थ बाळगून आहेत. (वार्ताहर)