शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सातगाव योजना दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे

By admin | Updated: February 14, 2016 23:20 IST

दिलासा : उन्हाळ्यात पाणीटंचाईपासून होणार सुटका

गुळवंच : बारागावपिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे असून, यामुळे योजनेत सहभागी असणाऱ्या गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येत्या महिनाभरात योजना सुरळीत होणार असून, त्यामुळे उन्हाळ्यात या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. युती शासनाच्या काळात बारागावपिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. योजनेची सर्व कामे पूर्ण झाली होती. मात्र पाण्याचा उद्भव चुकल्याने योजना सहा महिन्यात बंद पडली होती. शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला होता. २००२ पासून सदर योजना बंद पडली होती. दुरुस्ती निधीतून निमगाव-सिन्नर, गुळवंच, हिवरगाव व सुळेवाडी या चार गावांना भविष्यातील वाढीव लोकसंख्येचा विचार करून नवीन जलकुंभ बांधण्यात आले आहे. या जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. नांदूरमधमेश्वर व के.पा.नगर येथे जलशुद्धीकरण केंद्राचे काम नियोजित असून, नांदूरमधमेश्वर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. केपानगर येथे जागेच्या वादामुळे प्रत्यक्ष कामास विलंब होत आहे. याबाबत आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समिती गटनेते उदय सांगळे तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.महिनाभरात बिगर फिल्टरचे पाणी योजनेत सहभागी गावांमध्ये पोहचण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे गेल्या चार वर्षांपासून टॅँकरने पुरवठा सुरू असलेल्या निमगाव-सिन्नर, बारागावपिंप्री, पाटपिंप्री या गावांना योजनेचे पाणी मिळाल्यास ही गावे पाणीटंचाईसह टॅँकरमुक्त होणार आहेत. जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा परिसरातील विहिरींमध्ये शिल्लक असल्याने मार्चअखेरीस गुळवंच, सुळेवाडी, केपानगर, हिवरगाव या ठिकाणीही टॅँकरची गरज भासणार असल्याचे चित्र आहे. यामुळे बारागावपिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा ग्रामस्थ बाळगून आहेत. (वार्ताहर)