शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

सातगाव योजना दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे

By admin | Updated: February 14, 2016 23:20 IST

दिलासा : उन्हाळ्यात पाणीटंचाईपासून होणार सुटका

गुळवंच : बारागावपिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे असून, यामुळे योजनेत सहभागी असणाऱ्या गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. येत्या महिनाभरात योजना सुरळीत होणार असून, त्यामुळे उन्हाळ्यात या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. युती शासनाच्या काळात बारागावपिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. योजनेची सर्व कामे पूर्ण झाली होती. मात्र पाण्याचा उद्भव चुकल्याने योजना सहा महिन्यात बंद पडली होती. शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला होता. २००२ पासून सदर योजना बंद पडली होती. दुरुस्ती निधीतून निमगाव-सिन्नर, गुळवंच, हिवरगाव व सुळेवाडी या चार गावांना भविष्यातील वाढीव लोकसंख्येचा विचार करून नवीन जलकुंभ बांधण्यात आले आहे. या जलकुंभाचे काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. नांदूरमधमेश्वर व के.पा.नगर येथे जलशुद्धीकरण केंद्राचे काम नियोजित असून, नांदूरमधमेश्वर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. केपानगर येथे जागेच्या वादामुळे प्रत्यक्ष कामास विलंब होत आहे. याबाबत आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समिती गटनेते उदय सांगळे तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत.महिनाभरात बिगर फिल्टरचे पाणी योजनेत सहभागी गावांमध्ये पोहचण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे गेल्या चार वर्षांपासून टॅँकरने पुरवठा सुरू असलेल्या निमगाव-सिन्नर, बारागावपिंप्री, पाटपिंप्री या गावांना योजनेचे पाणी मिळाल्यास ही गावे पाणीटंचाईसह टॅँकरमुक्त होणार आहेत. जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा परिसरातील विहिरींमध्ये शिल्लक असल्याने मार्चअखेरीस गुळवंच, सुळेवाडी, केपानगर, हिवरगाव या ठिकाणीही टॅँकरची गरज भासणार असल्याचे चित्र आहे. यामुळे बारागावपिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा ग्रामस्थ बाळगून आहेत. (वार्ताहर)