शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सातबारा : नाशिक तालुक्यातील तलाठी कार्यालये ओस तलाठ्यांची भरली ‘शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:10 IST

नाशिक : जानेवारी महिन्यापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याची घोषणा राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली असली तरी, जिल्ह्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे.

ठळक मुद्दे ‘री-ईडीट’चे काम करताना तांत्रिक अडचणीआॅफलाइन कामकाज सुरू

नाशिक : जानेवारी महिन्यापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याची घोषणा राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली असली तरी, नाशिक जिल्ह्याचे काम अद्यापही अपूर्ण असून, ते पूर्ण करण्यासाठी नाशिक तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाºयांची दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शाळाच भरू लागली आहे. आॅनलाइन प्रणालीने सातबारा उताºयाचे ‘री-ईडीट’चे काम करताना येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर होत नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून तलाठ्यांनी आॅफलाइन कामकाज सुरू केले असून, ते कितपत यशस्वी होईल याविषयी साशंकता आहे.दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून तलाठी व मंडळ अधिकारी सजेवर जात नसल्याने गावोगावचे कार्यालये ओस पडली असून, शासकीय कामकाजासाठी तलाठी सापडत नसल्याने त्याचा फटका सामान्य नागरिक व शेतकºयांना बसू लागला आहे. तथापि, जनतेच्या त्रासाविषयी देणे-घेणे नसलेल्या प्रशासन व्यवस्थेने तलाठ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे कानाडोळा केल्यानेच ही परिस्थिती उद्भवली आहे. संगणकीय सातबारा उतारा देण्याचा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी, त्यासाठी पायाभूत सुविधा देण्यात शासनानेच हात अखडता घेतला आहे. प्रारंभी सदरचे काम करण्यास नाखूष असलेल्या तलाठ्यांनी संगणकीय सातबारा उताºयाचे कामकाज सुरू केल्यानंतर त्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. सॉफ्टवेअरमधील दोष दूर करण्यात बराच कालावधी उलटल्यानंतर सर्व्हर डाउन होण्याचेप्रकार घडल्याने तलाठ्यांना मध्यरात्री उठून कामे करावी लागली. परंतु तरीही हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.नाशिक तालुक्यात सर्वाधिक सुमारे सव्वादोन लाख खातेदार असून, त्यांच्या सातबाºयाचे संगणकीकरणाचे काम झाले आहे, मात्र त्यातील चुका दुरुस्त करण्याचे काम सध्या ‘री-ईडीट’ मॉड्युलमध्ये सुरू आहे. आॅनलाइनप्रणालीने सदरचे काम करावे लागत असले तरी, त्यासाठी इंटरनेटचा स्पीड व सर्व्हरचा प्रश्न कायम असल्यामुळे नाशिक तालुक्याचे दहा टक्केही कामकाज झालेले नाही. अशा परिस्थितीत तलाठी व मंडळ अधिकाºयांना शासनाच्या महसुलाशी संबंधित सर्व कामे बाजूला सारून निव्वळ सातबारा संगणकीकरणाच्या कामात जुंपण्यात आले असून, ४२ तलाठी व ८ मंडळ अधिकारी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपविभागीय अधिकाºयांच्या कार्यालयाच्या वरच्या सभागृहात लॅपटॉपवर कामे करीत आहेत.आॅफलाइन पद्धतीने काम करीत असतानाही दिवसभरातून जेमतेत वीस ते पंचवीस सातबारा उताºयाचेच काम पूर्ण होत आहे.अवघ्या चार तलाठ्यांना लॅपटॉपसंगणकीय सातबारा उताºयाचे काम करणाºया तलाठ्यांना शासनाकडून लॅपटॉप देण्यात येईल, अशी घोेषणा करून तीन ते चार वर्षे उलटली, परंतु तलाठ्यांच्या हाती लॅपटॉप लागले नाहीत, उलट सातबारा संगणकीय करणाच्या कामाचे ओझे वाहणाºया तलाठ्यांनी स्वत:च्या खिशाला तोशीस लावून स्वखर्चाने लॅपटॉप खरेदी केले. काही महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने दोन कोटी रुपये खर्च करून ३५७ लॅपटॉप शासनाच्या माध्यमातून खरेदी केले, परंतु नाशिक तालुक्यातील अवघ्या चार तलाठ्यांनाच त्याचे वाटप करण्यात आले आहे. अन्य तलाठी अद्याप लॅपटॉपच्या प्रतीक्षेत आहेत.