शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

सातबारा : नाशिक तालुक्यातील तलाठी कार्यालये ओस तलाठ्यांची भरली ‘शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:10 IST

नाशिक : जानेवारी महिन्यापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याची घोषणा राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली असली तरी, जिल्ह्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे.

ठळक मुद्दे ‘री-ईडीट’चे काम करताना तांत्रिक अडचणीआॅफलाइन कामकाज सुरू

नाशिक : जानेवारी महिन्यापासून संगणकीय सातबारा उतारा देण्याची घोषणा राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली असली तरी, नाशिक जिल्ह्याचे काम अद्यापही अपूर्ण असून, ते पूर्ण करण्यासाठी नाशिक तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकाºयांची दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शाळाच भरू लागली आहे. आॅनलाइन प्रणालीने सातबारा उताºयाचे ‘री-ईडीट’चे काम करताना येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर होत नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून तलाठ्यांनी आॅफलाइन कामकाज सुरू केले असून, ते कितपत यशस्वी होईल याविषयी साशंकता आहे.दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून तलाठी व मंडळ अधिकारी सजेवर जात नसल्याने गावोगावचे कार्यालये ओस पडली असून, शासकीय कामकाजासाठी तलाठी सापडत नसल्याने त्याचा फटका सामान्य नागरिक व शेतकºयांना बसू लागला आहे. तथापि, जनतेच्या त्रासाविषयी देणे-घेणे नसलेल्या प्रशासन व्यवस्थेने तलाठ्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे कानाडोळा केल्यानेच ही परिस्थिती उद्भवली आहे. संगणकीय सातबारा उतारा देण्याचा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असला तरी, त्यासाठी पायाभूत सुविधा देण्यात शासनानेच हात अखडता घेतला आहे. प्रारंभी सदरचे काम करण्यास नाखूष असलेल्या तलाठ्यांनी संगणकीय सातबारा उताºयाचे कामकाज सुरू केल्यानंतर त्यात अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. सॉफ्टवेअरमधील दोष दूर करण्यात बराच कालावधी उलटल्यानंतर सर्व्हर डाउन होण्याचेप्रकार घडल्याने तलाठ्यांना मध्यरात्री उठून कामे करावी लागली. परंतु तरीही हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.नाशिक तालुक्यात सर्वाधिक सुमारे सव्वादोन लाख खातेदार असून, त्यांच्या सातबाºयाचे संगणकीकरणाचे काम झाले आहे, मात्र त्यातील चुका दुरुस्त करण्याचे काम सध्या ‘री-ईडीट’ मॉड्युलमध्ये सुरू आहे. आॅनलाइनप्रणालीने सदरचे काम करावे लागत असले तरी, त्यासाठी इंटरनेटचा स्पीड व सर्व्हरचा प्रश्न कायम असल्यामुळे नाशिक तालुक्याचे दहा टक्केही कामकाज झालेले नाही. अशा परिस्थितीत तलाठी व मंडळ अधिकाºयांना शासनाच्या महसुलाशी संबंधित सर्व कामे बाजूला सारून निव्वळ सातबारा संगणकीकरणाच्या कामात जुंपण्यात आले असून, ४२ तलाठी व ८ मंडळ अधिकारी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपविभागीय अधिकाºयांच्या कार्यालयाच्या वरच्या सभागृहात लॅपटॉपवर कामे करीत आहेत.आॅफलाइन पद्धतीने काम करीत असतानाही दिवसभरातून जेमतेत वीस ते पंचवीस सातबारा उताºयाचेच काम पूर्ण होत आहे.अवघ्या चार तलाठ्यांना लॅपटॉपसंगणकीय सातबारा उताºयाचे काम करणाºया तलाठ्यांना शासनाकडून लॅपटॉप देण्यात येईल, अशी घोेषणा करून तीन ते चार वर्षे उलटली, परंतु तलाठ्यांच्या हाती लॅपटॉप लागले नाहीत, उलट सातबारा संगणकीय करणाच्या कामाचे ओझे वाहणाºया तलाठ्यांनी स्वत:च्या खिशाला तोशीस लावून स्वखर्चाने लॅपटॉप खरेदी केले. काही महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने दोन कोटी रुपये खर्च करून ३५७ लॅपटॉप शासनाच्या माध्यमातून खरेदी केले, परंतु नाशिक तालुक्यातील अवघ्या चार तलाठ्यांनाच त्याचे वाटप करण्यात आले आहे. अन्य तलाठी अद्याप लॅपटॉपच्या प्रतीक्षेत आहेत.