शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

सेवाभाव जपणारे सरदार चौक मित्रमंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:28 IST

पंचवटी धार्मिक क्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. पंचवटीला पौराणिक महत्त्व असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी एकत्रित यावे याच हेतूने १९२५ रोजी सरदार चौक मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सव स्थापनेला सुरुवात करण्यात आली.

पंचवटी धार्मिक क्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. पंचवटीला पौराणिक महत्त्व असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी एकत्रित यावे याच हेतूने १९२५ रोजी सरदार चौक मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सव स्थापनेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळचे युवा नेतृत्व तत्कालीन स्वातंत्र्य सैनिक सदूभाऊ भोरे, भीमाशंकर अदयप्रभू, शंकरनाना भोरे, परशराम महंकाळे, शंकरराव गुंडे आदी मंडळींनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मंडळ सुरू केले. सुरुवातीला सध्याच्या सरदार चौक पोलीस चौकीच्या जागी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करून उत्सव सुरू केला. त्यावेळी लोकनाट्य, पौराणिक देखावे साकारून नागरिकांना एकत्रितपणे आणण्याचा प्रयत्न केला. मंडळाचे यंदा गणेशोत्सव स्थापनेचे ९३ वे वर्ष आहे. पंचवटी परिसराला पौराणिक महत्त्व असल्याने आतापर्यंत धार्मिक देखावे सादरीकरण केले आहे. मंडळातर्फे गणेशोत्सव व महाराष्ट्र दिन असे वर्षातून दोनवेळा रक्तदान शिबिर राबविले जाते. याशिवाय मोफत आरोग्य तपासणी, विविध धार्मिक कार्यक्र म राबविले जातात.दरवर्षी खंबाळे येथील अनाथ बालक आश्रमातील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप केले जाते. गणेशोत्सव वर्गणीतून जमा झालेल्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम गणेशोत्सवाला, ३० टक्के रक्कम सामाजिक उपक्रम तर उरलेल्या रकमेतून पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून वापरली जाते.  अलीकडे (कै.) रमेशशेठ भोरे व (कै.) संजय अदयप्रभू यांनी या मंडळाचे नेतृत्व केले. सध्या मंडळाचे कामकाज मन्नासेठ अदयप्रभू, सुनील महंकाळे, राजेंद्र भोरे, राजेश भोरे, महेश महंकाळे, राजूसेठ अदयप्रभू, बंटी भोरे, रवींद्र अदयप्रभू, चिंटू भोरे, अमित भोरे, गणेश भोरे आदी बघत आहेत.