शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

सेवाभाव जपणारे सरदार चौक मित्रमंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:28 IST

पंचवटी धार्मिक क्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. पंचवटीला पौराणिक महत्त्व असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी एकत्रित यावे याच हेतूने १९२५ रोजी सरदार चौक मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सव स्थापनेला सुरुवात करण्यात आली.

पंचवटी धार्मिक क्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. पंचवटीला पौराणिक महत्त्व असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी एकत्रित यावे याच हेतूने १९२५ रोजी सरदार चौक मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सव स्थापनेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळचे युवा नेतृत्व तत्कालीन स्वातंत्र्य सैनिक सदूभाऊ भोरे, भीमाशंकर अदयप्रभू, शंकरनाना भोरे, परशराम महंकाळे, शंकरराव गुंडे आदी मंडळींनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मंडळ सुरू केले. सुरुवातीला सध्याच्या सरदार चौक पोलीस चौकीच्या जागी गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करून उत्सव सुरू केला. त्यावेळी लोकनाट्य, पौराणिक देखावे साकारून नागरिकांना एकत्रितपणे आणण्याचा प्रयत्न केला. मंडळाचे यंदा गणेशोत्सव स्थापनेचे ९३ वे वर्ष आहे. पंचवटी परिसराला पौराणिक महत्त्व असल्याने आतापर्यंत धार्मिक देखावे सादरीकरण केले आहे. मंडळातर्फे गणेशोत्सव व महाराष्ट्र दिन असे वर्षातून दोनवेळा रक्तदान शिबिर राबविले जाते. याशिवाय मोफत आरोग्य तपासणी, विविध धार्मिक कार्यक्र म राबविले जातात.दरवर्षी खंबाळे येथील अनाथ बालक आश्रमातील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप केले जाते. गणेशोत्सव वर्गणीतून जमा झालेल्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम गणेशोत्सवाला, ३० टक्के रक्कम सामाजिक उपक्रम तर उरलेल्या रकमेतून पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून वापरली जाते.  अलीकडे (कै.) रमेशशेठ भोरे व (कै.) संजय अदयप्रभू यांनी या मंडळाचे नेतृत्व केले. सध्या मंडळाचे कामकाज मन्नासेठ अदयप्रभू, सुनील महंकाळे, राजेंद्र भोरे, राजेश भोरे, महेश महंकाळे, राजूसेठ अदयप्रभू, बंटी भोरे, रवींद्र अदयप्रभू, चिंटू भोरे, अमित भोरे, गणेश भोरे आदी बघत आहेत.