शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

सप्तशृंगगड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार? बी. राधाकृष्णन : स्वच्छतेबाबत देवी संस्थानसह ग्रामपंचायतीला विचारला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:22 IST

सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील प्लॅस्टिक पिशव्या व स्वच्छतेबाबत जिल्हा अधिकारी यांनी नाराजी व्यक्त करून गड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार, असा प्रश्न जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी विचारला आहे.

ठळक मुद्देकारवाई न केल्याने नाराजी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना

सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील प्लॅस्टिक पिशव्या व स्वच्छतेबाबत जिल्हा अधिकारी यांनी नाराजी व्यक्त करून गड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार, असा प्रश्न जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी विचारला आहे. ग्रामपंचायत व देवी संस्थानने जिल्हा अधिकारी यांना दोन महिन्यात श्रीक्षेत्र सप्तशृंगगड हा प्लॅस्टिकमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते पण याबाबत काही कारवाई न केल्याने नाराजी व्यक्त केली. सप्तशृंगगडावर आज जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व नाशिक येथील वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक पी. रामाराव यांच्या हस्ते सप्तशृंगगडावरील वनविभागाच्या विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांना सर्वत्र प्लॅस्टिकचा कचरा आढळून आला.ग्रामपंचायत सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य गिरीश गवळी, राजेश गवळी, तहसीलदार कैलास चावडे, सहायक जिल्हा अधिकारी अमन मित्तल, उपवन संरक्षक नाशिक रामानुजम, सहायक वनसंरक्षक गायकवाड, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता केदारे यांच्या हस्ते वनविश्रामगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सहायक वनरक्षक गायकवाड, वनक्षेत्रपाल शेख, वनपाल योगीराज निकम, सप्तशृंगगड वनपाल पी.के. देवरे उपस्थित होते. तसेच फनिक्युलर रोप वे ट्रॉलीला भेट देऊन कामांची पाहणी करण्यात आली व काही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे सांगितले व लवकरात लवकर भाविकांसाठी प्रकल्प चालू करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुंबा, रोव वे डायरेक्टर शिव शंकर लातुरे, संपर्कप्रमुख सोमनाथ लातुरे, मॅनेजिंग डायरेक्टर राजू गुरुबक्षानी, रोप वे सुपरवायझर सोपान कोडमंगले आदी उपस्थित होते.कानउघडणीसप्तशृंगगड हे तीर्थक्षेत्र असल्याने हे क्षेत्र प्लॅस्टिकमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते, पण याकडे ग्रामपंचायत व देवी संस्थान गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. यामुळे जिल्हाधिकारी यांनी देवी संस्थानचे व्यवस्थापक व सप्तशृंगगड ग्रामपंचायत सदस्य व संरपच यांची चांगलीच कानउघडणी करीत धारेवर धरले. प्लॅस्टिकमुक्तीचे फलक ठिकठिकाणी लावण्यात यावे जेणेकरून भाविकांना माहिती होईल, असे आदेश देवी संस्थान व ग्रामपंचायतीला देण्यात आले. स्वच्छता व प्लॅस्टिकमुक्तीबाबत दिरंगाई केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.