शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

सप्तशृंगगड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार? बी. राधाकृष्णन : स्वच्छतेबाबत देवी संस्थानसह ग्रामपंचायतीला विचारला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:22 IST

सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील प्लॅस्टिक पिशव्या व स्वच्छतेबाबत जिल्हा अधिकारी यांनी नाराजी व्यक्त करून गड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार, असा प्रश्न जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी विचारला आहे.

ठळक मुद्देकारवाई न केल्याने नाराजी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना

सप्तशृंगगड : सप्तशृंगगडावरील प्लॅस्टिक पिशव्या व स्वच्छतेबाबत जिल्हा अधिकारी यांनी नाराजी व्यक्त करून गड प्लॅस्टिकमुक्त कधी होणार, असा प्रश्न जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी विचारला आहे. ग्रामपंचायत व देवी संस्थानने जिल्हा अधिकारी यांना दोन महिन्यात श्रीक्षेत्र सप्तशृंगगड हा प्लॅस्टिकमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते पण याबाबत काही कारवाई न केल्याने नाराजी व्यक्त केली. सप्तशृंगगडावर आज जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन व नाशिक येथील वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक पी. रामाराव यांच्या हस्ते सप्तशृंगगडावरील वनविभागाच्या विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांना सर्वत्र प्लॅस्टिकचा कचरा आढळून आला.ग्रामपंचायत सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य गिरीश गवळी, राजेश गवळी, तहसीलदार कैलास चावडे, सहायक जिल्हा अधिकारी अमन मित्तल, उपवन संरक्षक नाशिक रामानुजम, सहायक वनसंरक्षक गायकवाड, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता केदारे यांच्या हस्ते वनविश्रामगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सहायक वनरक्षक गायकवाड, वनक्षेत्रपाल शेख, वनपाल योगीराज निकम, सप्तशृंगगड वनपाल पी.के. देवरे उपस्थित होते. तसेच फनिक्युलर रोप वे ट्रॉलीला भेट देऊन कामांची पाहणी करण्यात आली व काही ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे सांगितले व लवकरात लवकर भाविकांसाठी प्रकल्प चालू करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले. यावेळी प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुंबा, रोव वे डायरेक्टर शिव शंकर लातुरे, संपर्कप्रमुख सोमनाथ लातुरे, मॅनेजिंग डायरेक्टर राजू गुरुबक्षानी, रोप वे सुपरवायझर सोपान कोडमंगले आदी उपस्थित होते.कानउघडणीसप्तशृंगगड हे तीर्थक्षेत्र असल्याने हे क्षेत्र प्लॅस्टिकमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते, पण याकडे ग्रामपंचायत व देवी संस्थान गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. यामुळे जिल्हाधिकारी यांनी देवी संस्थानचे व्यवस्थापक व सप्तशृंगगड ग्रामपंचायत सदस्य व संरपच यांची चांगलीच कानउघडणी करीत धारेवर धरले. प्लॅस्टिकमुक्तीचे फलक ठिकठिकाणी लावण्यात यावे जेणेकरून भाविकांना माहिती होईल, असे आदेश देवी संस्थान व ग्रामपंचायतीला देण्यात आले. स्वच्छता व प्लॅस्टिकमुक्तीबाबत दिरंगाई केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.