शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

दहा व्यक्ती, पाच संस्थांना मिळणार संत रविदास पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:10 IST

नाशिक : यापूर्वी एक व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जाणार संत रविदास पुरस्कार सध्या पाच व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जात असून यापुढे हा पुरस्कार १० व्यक्ती आणि पाच संस्थांना देण्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी (दि. २४) केली.  शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला संत ...

नाशिक : यापूर्वी एक व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जाणार संत रविदास पुरस्कार सध्या पाच व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जात असून यापुढे हा पुरस्कार १० व्यक्ती आणि पाच संस्थांना देण्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी (दि. २४) केली.  शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला संत रविदास यांच्या जीवनचरित्रावर आधारित धड्याचाही पुन्हा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार असून, प्रत्येक विभागात संत रविदास भवनाच्या कामाला या वर्षीच सुरुवात होणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.  राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे संस्थेच्या वर्धापन दिनासोबतच माजी मंत्री बबन घोलप यांच्या कला व राजकीय क्षेत्रातील कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून ‘त्रिवेणी संगम’ सोहळ्याच्या माध्यमातून सोमवारी बबन घोलप यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सूर्याचार्य कृष्णदेवनंदगिरी महाराज, आमदार भाऊसाहेब कांबळे, रामचंद्र अवसारे, सीमा हिरे, योगेश घोलप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर आदी उपस्थित होते. राजकुमार बडोले म्हणाले, सरकार वंचितांच्या पाठीशी आहे. दरम्यान, सत्काराला उत्तर देताना बबन घोलप यांनी अन्य महामंडळांच्या तुलनेत रविदास महामंडळावर अन्याय होत असल्याचे सांगत इतर महामंडळांप्रमाणेच रविदास महामंडळाच्या लाभांर्थ्यांनाही सोयीसुविधा व योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी केली, तर आमदार योगेश घालप यांना बबन घोलप यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी बोलताना भावना अनावर झाल्याचे दिसून आले. प्रास्ताविक दत्तात्रय गोतीसे यांनी केले. सूत्रसंचालन शंताराम कारंडे यांनी केले.चर्मकार आयोगासाठी पाठपुरावाराज्यात चर्मकार आयोग स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. आयोगाला राज्याची मंजुरी मिळाली असून, केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर लवकरच केंद्र व राज्य चर्मकार आयोग स्थापन करण्याचे आश्वासन राजकुमार बडोले यांनी दिले. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र व राज्यात बाबू जगजीवन राम यांच्या नावाने हा आयोग स्थापन करण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Babanrao Gholapबबनराव घोलपRajkumar Badoleराजकुमार बडोले