शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यमहोत्सवातून घडतात कलावंतांवर संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 01:18 IST

कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवणाऱ्या कलावंतांसाठी नाट्यमहोत्सव मोठी संधी असते. नवनवीन कलावंतांना घडविण्याची परंपरा कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रुजली असून, अशा महोत्सवातून चांगले कलाकार घडले पाहिजेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी केले.

ठळक मुद्देकामगार कल्याण मंडळ ६६वा प्राथमिक नाट्यमहोत्सव

नाशिक : कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवणाऱ्या कलावंतांसाठी नाट्यमहोत्सव मोठी संधी असते. नवनवीन कलावंतांना घडविण्याची परंपरा कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रुजली असून, अशा महोत्सवातून चांगले कलाकार घडले पाहिजेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी केले.प. सा. नाट्यमंदिर येथे महाराष्टÑ कामगार कल्याण मंडळ नाशिक विभाग आयोजित ६६व्या प्राथमिक नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराजाला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, श्रीकांत बेणी, सुनील ढगे आदी उपस्थित होते. यावेळी शिलेदार म्हणाल्या, कामगार कल्याण नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून कलावंतांना चांगली संधी आहे. या माध्यमातून नाट्यक्षेत्राला नक्कीच चांगले कलावंत मिळू शकतात. कलावंतांना अशाप्रकारचे व्यासपीठ मिळणे ही खरोखर चांगली बाब आहे. असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी मेघराज राजे भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले. प्रास्ताविक सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव यांनी केले. आभार मिलिंद पाटील यांनी मानले. परीक्षक म्हणून सुनील देशपांडे, प्रदीप पाटील, संध्या धोपावकर यांनी काम पाहिले.‘आनंद ओवरी’ नाटक सादरसायंकाळी मालेगाव कामगार केंद्राने ‘आनंद ओवरी’ हे दि. वा. मोकाशी लिखित नाटक सादर केले. सुरभी थिएटर प्रस्तुत आनंद ओवरी या नाटकात संत तुकाराम यांच्या वैयक्तिक आयुष्यातील ससेहोलपट दाखविण्यात आली आहे. संत तुकारामाची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्टÑाच्या सांस्कृतिक परपरेचे महान द्योतक आहे. त्यांची अभंगवाणी हीच त्यांची लोकप्रियता आणि ओळख आहे. असे असले तरी त्यांची अंतर्गतदेखील एक ओळख आहे. त्यांनी जे भोगले, सोसले त्यातून त्यांचे तत्त्वज्ञान निर्माण झाले. त्यातून अंभग निर्माण झाले. त्यांच्या आचरणातील बारकावे या नाटकात टिपण्यात आले आहेत. संदीप कोते आणि राजेश शर्मा यांनी भूमिका साकारल्या.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारcultureसांस्कृतिक