शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

नाट्यमहोत्सवातून घडतात कलावंतांवर संस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 01:18 IST

कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवणाऱ्या कलावंतांसाठी नाट्यमहोत्सव मोठी संधी असते. नवनवीन कलावंतांना घडविण्याची परंपरा कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रुजली असून, अशा महोत्सवातून चांगले कलाकार घडले पाहिजेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी केले.

ठळक मुद्देकामगार कल्याण मंडळ ६६वा प्राथमिक नाट्यमहोत्सव

नाशिक : कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर पाऊल ठेवणाऱ्या कलावंतांसाठी नाट्यमहोत्सव मोठी संधी असते. नवनवीन कलावंतांना घडविण्याची परंपरा कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून रुजली असून, अशा महोत्सवातून चांगले कलाकार घडले पाहिजेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी केले.प. सा. नाट्यमंदिर येथे महाराष्टÑ कामगार कल्याण मंडळ नाशिक विभाग आयोजित ६६व्या प्राथमिक नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नटराजाला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपीठावर चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, श्रीकांत बेणी, सुनील ढगे आदी उपस्थित होते. यावेळी शिलेदार म्हणाल्या, कामगार कल्याण नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून कलावंतांना चांगली संधी आहे. या माध्यमातून नाट्यक्षेत्राला नक्कीच चांगले कलावंत मिळू शकतात. कलावंतांना अशाप्रकारचे व्यासपीठ मिळणे ही खरोखर चांगली बाब आहे. असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी मेघराज राजे भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले. प्रास्ताविक सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव यांनी केले. आभार मिलिंद पाटील यांनी मानले. परीक्षक म्हणून सुनील देशपांडे, प्रदीप पाटील, संध्या धोपावकर यांनी काम पाहिले.‘आनंद ओवरी’ नाटक सादरसायंकाळी मालेगाव कामगार केंद्राने ‘आनंद ओवरी’ हे दि. वा. मोकाशी लिखित नाटक सादर केले. सुरभी थिएटर प्रस्तुत आनंद ओवरी या नाटकात संत तुकाराम यांच्या वैयक्तिक आयुष्यातील ससेहोलपट दाखविण्यात आली आहे. संत तुकारामाची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्टÑाच्या सांस्कृतिक परपरेचे महान द्योतक आहे. त्यांची अभंगवाणी हीच त्यांची लोकप्रियता आणि ओळख आहे. असे असले तरी त्यांची अंतर्गतदेखील एक ओळख आहे. त्यांनी जे भोगले, सोसले त्यातून त्यांचे तत्त्वज्ञान निर्माण झाले. त्यातून अंभग निर्माण झाले. त्यांच्या आचरणातील बारकावे या नाटकात टिपण्यात आले आहेत. संदीप कोते आणि राजेश शर्मा यांनी भूमिका साकारल्या.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारcultureसांस्कृतिक