शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

नायगावसह पाच गावांतील वाड्या-वस्त्यांच्या योजनेला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 17:55 IST

सिन्नर : कालबाह्य झालेल्या नायगावसह नऊ गावे पाणी योजनेला जिल्हा परिषदेकडून ४ कोटी ७३ लाख ९६ हजार ४९८ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे योजनेला संजीवनी मिळाली आहे.

सिन्नर : कालबाह्य झालेल्या नायगावसह नऊ गावे पाणी योजनेला जिल्हा परिषदेकडून ४ कोटी ७३ लाख ९६ हजार ४९८ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे योजनेला संजीवनी मिळाली आहे. पाच गावांतील वाड्या-वस्त्यांचाही नव्याने समावेश करण्यात आल्याने ४५ हजार लोकसंख्येला पाणी पुरवठ्याची क्षमता निर्माण झाली आहे. चार वाड्यांवर जलकुंभाची उभारणी होणार असून जलशुद्धीकरण केंद्रातील कालबाह्य यंत्रणाही हटवण्यात येणार आहे.आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या पाठपुराव्यातून योजनेला निधी उपलब्ध झाला. जिल्हा परिषद सदस्या सुनीता सानप, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, गटनेते संग्राम कातकाडे यांनी कामाचा पाठपुरावा केला. पाच ते सात वर्षापूर्वीच कालबाह्य झालेल्या योजनेकडे तत्पूर्वीच निधी उपलब्ध होणे गरजेचे होते. तसे न झाल्याने योजना चालवण्यात विविध अडथळे आले. त्यातच जीवन प्राधिकरणाकडून योजना ताब्यात घेण्यासही लाभार्थी गावांनी नकार दिला. गावांपर्यंत न पोहोचणारे पाणी, अपुरा पाणी पुरवठा, योजनेला जागोजागी असलेली गळती आदी कारणांनी योजना अडखळत सुरु होती. प्राधिकरणाकडे निधी नसल्याने लाभार्थी गावांतील पाणी पुरवठा अडचणीत आला होता.मोहदरी, मोह, जायगाव, वडझिरे, देशवंडी या पाचही गावांना पुरेशा क्षमतेने पाणी देण्यासह संबंधित गावांतील सर्व वाड्या-वस्त्यांचा समावेश योजनेत करण्यात आला आहे. सुमारे ४५ हजार लोकांना पाणी पुरवठ्याची क्षमता यात असेल. जायगाव येथे पंप बसवून पाणी देशवंडी पर्यंत नेण्यासाठीची व्यवस्थाही नवीन कामात असेल.योजनेचे प्रत्येक गावात जलकुंभ आहेत. वस्त्यांचा समावेश झाल्याने वडझिरे येथील नगारा, सांगळे व देशवंडी येथील ठाकरवस्ती, दगड वस्तीवर जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. पाचही गावांतील २० हून अधिक वस्त्यांवर पाणी पोहोचू शकेल. जलशुद्धीकरण केंद्रातील कालबाह्य यंत्रणा हटवण्यात येणार असून जल वाहिन्यांतील गळती दरूस्त करण्याबरोबर फुटलेले व्हॉल्व्हही टाकण्यात येणार आहेत. निधी उपलब्ध झाल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील गावांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Waterपाणी