शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

नायगावसह पाच गावांतील वाड्या-वस्त्यांच्या योजनेला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 17:55 IST

सिन्नर : कालबाह्य झालेल्या नायगावसह नऊ गावे पाणी योजनेला जिल्हा परिषदेकडून ४ कोटी ७३ लाख ९६ हजार ४९८ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे योजनेला संजीवनी मिळाली आहे.

सिन्नर : कालबाह्य झालेल्या नायगावसह नऊ गावे पाणी योजनेला जिल्हा परिषदेकडून ४ कोटी ७३ लाख ९६ हजार ४९८ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे योजनेला संजीवनी मिळाली आहे. पाच गावांतील वाड्या-वस्त्यांचाही नव्याने समावेश करण्यात आल्याने ४५ हजार लोकसंख्येला पाणी पुरवठ्याची क्षमता निर्माण झाली आहे. चार वाड्यांवर जलकुंभाची उभारणी होणार असून जलशुद्धीकरण केंद्रातील कालबाह्य यंत्रणाही हटवण्यात येणार आहे.आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या पाठपुराव्यातून योजनेला निधी उपलब्ध झाला. जिल्हा परिषद सदस्या सुनीता सानप, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, गटनेते संग्राम कातकाडे यांनी कामाचा पाठपुरावा केला. पाच ते सात वर्षापूर्वीच कालबाह्य झालेल्या योजनेकडे तत्पूर्वीच निधी उपलब्ध होणे गरजेचे होते. तसे न झाल्याने योजना चालवण्यात विविध अडथळे आले. त्यातच जीवन प्राधिकरणाकडून योजना ताब्यात घेण्यासही लाभार्थी गावांनी नकार दिला. गावांपर्यंत न पोहोचणारे पाणी, अपुरा पाणी पुरवठा, योजनेला जागोजागी असलेली गळती आदी कारणांनी योजना अडखळत सुरु होती. प्राधिकरणाकडे निधी नसल्याने लाभार्थी गावांतील पाणी पुरवठा अडचणीत आला होता.मोहदरी, मोह, जायगाव, वडझिरे, देशवंडी या पाचही गावांना पुरेशा क्षमतेने पाणी देण्यासह संबंधित गावांतील सर्व वाड्या-वस्त्यांचा समावेश योजनेत करण्यात आला आहे. सुमारे ४५ हजार लोकांना पाणी पुरवठ्याची क्षमता यात असेल. जायगाव येथे पंप बसवून पाणी देशवंडी पर्यंत नेण्यासाठीची व्यवस्थाही नवीन कामात असेल.योजनेचे प्रत्येक गावात जलकुंभ आहेत. वस्त्यांचा समावेश झाल्याने वडझिरे येथील नगारा, सांगळे व देशवंडी येथील ठाकरवस्ती, दगड वस्तीवर जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. पाचही गावांतील २० हून अधिक वस्त्यांवर पाणी पोहोचू शकेल. जलशुद्धीकरण केंद्रातील कालबाह्य यंत्रणा हटवण्यात येणार असून जल वाहिन्यांतील गळती दरूस्त करण्याबरोबर फुटलेले व्हॉल्व्हही टाकण्यात येणार आहेत. निधी उपलब्ध झाल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील गावांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Waterपाणी