शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नायगावसह पाच गावांतील वाड्या-वस्त्यांच्या योजनेला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 17:55 IST

सिन्नर : कालबाह्य झालेल्या नायगावसह नऊ गावे पाणी योजनेला जिल्हा परिषदेकडून ४ कोटी ७३ लाख ९६ हजार ४९८ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे योजनेला संजीवनी मिळाली आहे.

सिन्नर : कालबाह्य झालेल्या नायगावसह नऊ गावे पाणी योजनेला जिल्हा परिषदेकडून ४ कोटी ७३ लाख ९६ हजार ४९८ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे योजनेला संजीवनी मिळाली आहे. पाच गावांतील वाड्या-वस्त्यांचाही नव्याने समावेश करण्यात आल्याने ४५ हजार लोकसंख्येला पाणी पुरवठ्याची क्षमता निर्माण झाली आहे. चार वाड्यांवर जलकुंभाची उभारणी होणार असून जलशुद्धीकरण केंद्रातील कालबाह्य यंत्रणाही हटवण्यात येणार आहे.आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या पाठपुराव्यातून योजनेला निधी उपलब्ध झाला. जिल्हा परिषद सदस्या सुनीता सानप, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, गटनेते संग्राम कातकाडे यांनी कामाचा पाठपुरावा केला. पाच ते सात वर्षापूर्वीच कालबाह्य झालेल्या योजनेकडे तत्पूर्वीच निधी उपलब्ध होणे गरजेचे होते. तसे न झाल्याने योजना चालवण्यात विविध अडथळे आले. त्यातच जीवन प्राधिकरणाकडून योजना ताब्यात घेण्यासही लाभार्थी गावांनी नकार दिला. गावांपर्यंत न पोहोचणारे पाणी, अपुरा पाणी पुरवठा, योजनेला जागोजागी असलेली गळती आदी कारणांनी योजना अडखळत सुरु होती. प्राधिकरणाकडे निधी नसल्याने लाभार्थी गावांतील पाणी पुरवठा अडचणीत आला होता.मोहदरी, मोह, जायगाव, वडझिरे, देशवंडी या पाचही गावांना पुरेशा क्षमतेने पाणी देण्यासह संबंधित गावांतील सर्व वाड्या-वस्त्यांचा समावेश योजनेत करण्यात आला आहे. सुमारे ४५ हजार लोकांना पाणी पुरवठ्याची क्षमता यात असेल. जायगाव येथे पंप बसवून पाणी देशवंडी पर्यंत नेण्यासाठीची व्यवस्थाही नवीन कामात असेल.योजनेचे प्रत्येक गावात जलकुंभ आहेत. वस्त्यांचा समावेश झाल्याने वडझिरे येथील नगारा, सांगळे व देशवंडी येथील ठाकरवस्ती, दगड वस्तीवर जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. पाचही गावांतील २० हून अधिक वस्त्यांवर पाणी पोहोचू शकेल. जलशुद्धीकरण केंद्रातील कालबाह्य यंत्रणा हटवण्यात येणार असून जल वाहिन्यांतील गळती दरूस्त करण्याबरोबर फुटलेले व्हॉल्व्हही टाकण्यात येणार आहेत. निधी उपलब्ध झाल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील गावांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Waterपाणी