शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

नायगावसह पाच गावांतील वाड्या-वस्त्यांच्या योजनेला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 17:55 IST

सिन्नर : कालबाह्य झालेल्या नायगावसह नऊ गावे पाणी योजनेला जिल्हा परिषदेकडून ४ कोटी ७३ लाख ९६ हजार ४९८ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे योजनेला संजीवनी मिळाली आहे.

सिन्नर : कालबाह्य झालेल्या नायगावसह नऊ गावे पाणी योजनेला जिल्हा परिषदेकडून ४ कोटी ७३ लाख ९६ हजार ४९८ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे योजनेला संजीवनी मिळाली आहे. पाच गावांतील वाड्या-वस्त्यांचाही नव्याने समावेश करण्यात आल्याने ४५ हजार लोकसंख्येला पाणी पुरवठ्याची क्षमता निर्माण झाली आहे. चार वाड्यांवर जलकुंभाची उभारणी होणार असून जलशुद्धीकरण केंद्रातील कालबाह्य यंत्रणाही हटवण्यात येणार आहे.आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या पाठपुराव्यातून योजनेला निधी उपलब्ध झाला. जिल्हा परिषद सदस्या सुनीता सानप, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, गटनेते संग्राम कातकाडे यांनी कामाचा पाठपुरावा केला. पाच ते सात वर्षापूर्वीच कालबाह्य झालेल्या योजनेकडे तत्पूर्वीच निधी उपलब्ध होणे गरजेचे होते. तसे न झाल्याने योजना चालवण्यात विविध अडथळे आले. त्यातच जीवन प्राधिकरणाकडून योजना ताब्यात घेण्यासही लाभार्थी गावांनी नकार दिला. गावांपर्यंत न पोहोचणारे पाणी, अपुरा पाणी पुरवठा, योजनेला जागोजागी असलेली गळती आदी कारणांनी योजना अडखळत सुरु होती. प्राधिकरणाकडे निधी नसल्याने लाभार्थी गावांतील पाणी पुरवठा अडचणीत आला होता.मोहदरी, मोह, जायगाव, वडझिरे, देशवंडी या पाचही गावांना पुरेशा क्षमतेने पाणी देण्यासह संबंधित गावांतील सर्व वाड्या-वस्त्यांचा समावेश योजनेत करण्यात आला आहे. सुमारे ४५ हजार लोकांना पाणी पुरवठ्याची क्षमता यात असेल. जायगाव येथे पंप बसवून पाणी देशवंडी पर्यंत नेण्यासाठीची व्यवस्थाही नवीन कामात असेल.योजनेचे प्रत्येक गावात जलकुंभ आहेत. वस्त्यांचा समावेश झाल्याने वडझिरे येथील नगारा, सांगळे व देशवंडी येथील ठाकरवस्ती, दगड वस्तीवर जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. पाचही गावांतील २० हून अधिक वस्त्यांवर पाणी पोहोचू शकेल. जलशुद्धीकरण केंद्रातील कालबाह्य यंत्रणा हटवण्यात येणार असून जल वाहिन्यांतील गळती दरूस्त करण्याबरोबर फुटलेले व्हॉल्व्हही टाकण्यात येणार आहेत. निधी उपलब्ध झाल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील गावांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Waterपाणी