शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गुंजाळनगरमध्ये स्वच्छतागृहांचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:25 IST

विंचूर प्रकाशा महामार्गालगत असलेल्या गुंजाळनगर सोसायटी कार्यालयासमोरील स्वच्छतागृह परिसरातील अस्वच्छता.   देवळा/गुंजाळनगर : येथे विंचूर प्रकाशा महामार्गालगत असलेल्या सार्वजनिक ...

ठळक मुद्देदुर्गंधी : साफसफाई होत नसल्याची ग्रामस्थांची तक्र ार

विंचूर प्रकाशा महामार्गालगत असलेल्या गुंजाळनगर सोसायटी कार्यालयासमोरील स्वच्छतागृह परिसरातील अस्वच्छता. देवळा/गुंजाळनगर : येथे विंचूर प्रकाशा महामार्गालगत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता होत नसल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. यामुळे या स्वच्छतागृहांची नियमितपणे साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत देशभरात स्वच्छतेचा जागर केला जात आहे. गुंजाळनगर येथे तीन सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत, परंतु त्यांची दुरवस्था झाली आहे. गुंजाळनगर येथे विंचूर प्रकाशा महामार्गालगत गुंजाळनगर विविध कार्यकारी सोसायटीचे कार्यालय असून, समोरच एक सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. रस्त्याने जाणारे पादचारी, तसेच परिसरातील व्यावसायिक व नागरिक या स्वच्छतागृहांचा वापर करतात. या स्वच्छतागृहांची साफसफाई केली जात नाही. यामुळे तेथे अस्वच्छता व दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांना नाकाला रु माल लावूनच स्वच्छतागृहात जावे लागते. जवळपास दुसरे स्वच्छतागृह नसल्यामुळे नाईलाजाने या स्वच्छतागृहांचा नागरिकांना वापर करावा लागतो.नागरिकांचे आरोग्य धोक्यातस्वच्छतागृहासमोरच असलेल्या सोसायटी कार्यालयाचा परिसरदेखील झाडाझुडपांनी वेढलेला असून, आजूबाजूला घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या झाडाझुडपातूनच मार्ग काढत असतानाच स्वच्छतागृहातून येणारी दुर्गंधी सहन करावी लागते. ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची तक्र ार आहे.सदरचे स्वच्छतागृह दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. त्यावेळी नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली होती. कालांतराने ग्रामपंचायतीने या स्वच्छतागृहांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केले. यामुळे हे स्वच्छतागृह दुर्गंधीचे आगर बनले आहे. ग्रामपंचायतीने या स्वच्छतागृहांची नियमितपणे स्वच्छता करावी.- अमोल गुंजाळ, व्यावसायिक, गुंजाळनगर

टॅग्स :Healthआरोग्य