शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सांदण दरीची वाट ५ महिन्यांसाठी बंद; कळसुबाई अभयारण्यात वन्यजीव विभागाने घातले निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 20:46 IST

पावसाळी पर्यटन

- अझहर शेख

नाशिक : कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील साम्रद गावाजवळील आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सांदण दरीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून नाशिक वन्यजीव विभागाने घोषित केला आहे. 

मागील चार दिवसांपासून भंडारदरा व अभयारण्याच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता सांदण’वाट पर्यटकांकरिता आता थेट नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच अभयारण्यातील गड, किल्ले व धरणाच्या परिसरात रात्रीच्या मुक्कामावर आता बंदी घातली गेली आहे.

नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितित असलेल्या कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात सध्या अतीमुसळधार पाऊस सुरु आहे. नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगर या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक अभयारण्यात वर्षा सहलीसाठी दाखल होतात. मागील दोन वर्षांपासून कोराेनाच्या लाटेमुळे वर्षा सहलींवर निर्बंध होते. 

यावर्षी पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढण्याची श्यक्यता लक्षात घेता वन्यजीव विभागाने निर्बंध घातले आहेत. साम्रद गावाजवळ असलेली सांदण दरी पर्यटकांसाठी येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत बंद राहणार असल्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितले.

अभयारण्याच्या परिसरात नैसर्गिक धबधब्यांचा आनंद लुटताना वन्यजीव विभागाने जे धबधबे सुरक्षित केले आहेत, व त्याच्या वाटा निश्चित केलेल्या आहेत, त्याच भागात पर्यटकांनी जावे, वेगळी वाट ‘धोक्याची’ ठरू शकते, हे लक्षात घ्यावे. जंगलाचा परिसर आणि धो-धो कोसळणारा पाऊस, निसरड्या वाटा, वाढलेले रानगवत यामुळे दुर्घटना घडू शकते. यामुळे वन्यजीव विभागाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

अभयारण्याच्या परिसरात कुठल्याहीप्रकारचे बेभान व बीभत्स असे वर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा वन्यजीव विभागाने दिला आहे. वर्षा पर्यटनासाठी येताना कोणीही मद्यप्राशनाचा बेत आखू नये, कारण अभयारण्याच्या तपासणी नाक्यांवर तसेच पेट्रोलिंगदरम्यान तपासणी करताना मद्याच्या बाटल्या आढळून आल्यास वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे रणदिवे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकtourismपर्यटन