शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांदण दरीची वाट ५ महिन्यांसाठी बंद; कळसुबाई अभयारण्यात वन्यजीव विभागाने घातले निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2022 20:46 IST

पावसाळी पर्यटन

- अझहर शेख

नाशिक : कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील साम्रद गावाजवळील आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सांदण दरीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून नाशिक वन्यजीव विभागाने घोषित केला आहे. 

मागील चार दिवसांपासून भंडारदरा व अभयारण्याच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता सांदण’वाट पर्यटकांकरिता आता थेट नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच अभयारण्यातील गड, किल्ले व धरणाच्या परिसरात रात्रीच्या मुक्कामावर आता बंदी घातली गेली आहे.

नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारितित असलेल्या कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्यात सध्या अतीमुसळधार पाऊस सुरु आहे. नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगर या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक अभयारण्यात वर्षा सहलीसाठी दाखल होतात. मागील दोन वर्षांपासून कोराेनाच्या लाटेमुळे वर्षा सहलींवर निर्बंध होते. 

यावर्षी पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढण्याची श्यक्यता लक्षात घेता वन्यजीव विभागाने निर्बंध घातले आहेत. साम्रद गावाजवळ असलेली सांदण दरी पर्यटकांसाठी येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत बंद राहणार असल्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितले.

अभयारण्याच्या परिसरात नैसर्गिक धबधब्यांचा आनंद लुटताना वन्यजीव विभागाने जे धबधबे सुरक्षित केले आहेत, व त्याच्या वाटा निश्चित केलेल्या आहेत, त्याच भागात पर्यटकांनी जावे, वेगळी वाट ‘धोक्याची’ ठरू शकते, हे लक्षात घ्यावे. जंगलाचा परिसर आणि धो-धो कोसळणारा पाऊस, निसरड्या वाटा, वाढलेले रानगवत यामुळे दुर्घटना घडू शकते. यामुळे वन्यजीव विभागाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

अभयारण्याच्या परिसरात कुठल्याहीप्रकारचे बेभान व बीभत्स असे वर्तन खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा वन्यजीव विभागाने दिला आहे. वर्षा पर्यटनासाठी येताना कोणीही मद्यप्राशनाचा बेत आखू नये, कारण अभयारण्याच्या तपासणी नाक्यांवर तसेच पेट्रोलिंगदरम्यान तपासणी करताना मद्याच्या बाटल्या आढळून आल्यास वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे रणदिवे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकtourismपर्यटन