शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वाळू माफियांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून गाड्या पळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:57 IST

शासनाने यंदा गौणखनिजातून मिळणा-या वसुलीत मोठी वाढ केली आहे. परंतु दुसरीकडे न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्यामुळे वाळूचे लिलाव करून त्यातून मिळणारे उत्पन्नापासून महसूल खात्याला मुकावे लागले आहे

ठळक मुद्दे पकडलेल्या गाड्याच पुन्हा दंड न भरता पळवून नेण्याचे प्रकार वाहतुकदाराला पाच लाख रूपये दंड भरण्याची नोटीसही दिली

नाशिक : गौणखनिजाची व विशेष करून वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणा-यांच्या विरोधात प्रशासनाने मोहिम उघडून दिवस रात्र वाळूच्या गाड्या पकडण्याचे काम केले जात असताना पकडलेल्या गाड्याच पुन्हा दंड न भरता पळवून नेण्याचे प्रकार वाळू माफियांकडून केले जात असून, विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातूनच गाड्या पळविण्याची हिम्मत त्यांनी दाखविल्यामुळे प्रशासनही त्यापुढे हतबल झाले आहे.शासनाने यंदा गौणखनिजातून मिळणा-या वसुलीत मोठी वाढ केली आहे. परंतु दुसरीकडे न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्यामुळे वाळूचे लिलाव करून त्यातून मिळणारे उत्पन्नापासून महसूल खात्याला मुकावे लागले आहे. असे असले तरी, वाळू माफियांकडून चोरी, छुप्या पद्धतीने बेकायदेशीर वाळूची वाहतूक केली जात असून, ती रोखण्यासाठी व त्यातून पाच पट दंडाची वसुली करण्यासाठी महसूल खात्याने पथक गठीत केले आहेत. प्रत्येक तहसिल कार्यालयाच्या हद्दीत असे पथके कार्यान्वित असून, त्यांच्याकडून दिवस-रात्र महत्वाच्या रस्त्यांवर लक्ष ठेवून गौणखनिजाचे वाहतूक करणारे वाहने पकडली जात आहे. नाशिक तालुक्याच्या पथकाने अशाच प्रकारे काही दिवसांपुर्वी एम. एच. ०४ एफ ४०८२ व एम. एच. ०४ एफडी ८७०३ ही वाहने पकडून नाशिक तहसिलदार कार्यालयाच्या आवारात आणून उभी केली होती. संबंधित तलाठी व मंडळ अधिका-यांनी या गाड्यांचे पंचनामे करून वाहतुकदाराला पाच लाख रूपये दंड भरण्याची नोटीसही दिली होती. परंतु दंड न भरताच प्रशाासनाची नजर चुकवून सदरच्या दोन्ही मालट्रक वाळू माफियांनी पळवून नेले आहेत. विशेष म्हणजे पकडलेल्या गाड्या दंड न भरताच पळून गेल्याची बाब नाशिक तहसिल व प्रभारी प्रातांच्या निदर्शनास दोन दिवसांनी आली आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून वाळूच्या गाड्या पळवून नेण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापुर्वी नाशिक तहसिल कार्यालयाचे कुलूप तोडून संगणक व प्रिंटर चोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे तत्कालीन प्रांत अधिका-यांनी नाशिक तहसिलच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी कार्यालयाच्या आवारात सीसीटिव्ही कॅमेरे लावले आहेत व स्वत: तहसिल कार्यालयानेही कॅमेरे लावलेले असताना आवारातून अवजड दोन मालट्रक पळवून नेण्यात आल्याने सर्वच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक